शहरं
Join us  
Trending Stories
1
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
2
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
3
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
4
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
5
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
6
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
7
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
8
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
9
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
10
टेक इंडस्ट्री हादरली! AI मुळे २०२५ मध्ये १.२० लाख नोकऱ्या संपुष्टात; कर्मचारी कपातीत कोणती कंपनी पुढे?
11
डाव्यांच्या गडाला हादरे! माजी आयपीएस आर. श्रीलेखा तिरुवनंतपुरमच्या महापौर होण्याची शक्यता, केरळमध्ये भाजपला मोठे यश  
12
इंडिगोचे संकट वाढले! ८२९ प्रवासी सामुहिक खटला दाखल करणार, एअरलाईन्सवर नामुष्की...
13
मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री शिंदे यांचे संघस्थानी नमन, अजित पवार गटासह काही आमदार-मंत्र्यांची मात्र दांडी
14
हवा बिघडली अन् वारे फिरले; धुराने कोंडला मुंबईकरांचा श्वास! धूळ, धुके, धुराच्या संयुक्त मिश्रणाने प्रदूषणात वाढ
15
'१९ डिसेंबरला देशात सर्वात मोठा राजकीय भूकंप होणार, भारताचा पंतप्रधान मराठी माणूस बनणार', पृथ्वीराज चव्हाणांचे भाकीत!
16
जॉन सीनाने शेवटचा सामना 'मुद्दाम' गमावला? गुंथरकडून पराभव, रिंगला किस करून घेतला WWE चा निरोप...
17
काँग्रेसचं पुनरागमन, भाजपाचा चंचुप्रवेश आणि डाव्यांना धक्का, केरळमधील राजकीय हवा बदलतेय?
18
'या' छोट्या देशाचा चीन-भारतासारख्या बलाढ्या देशांना धोबीपछाड! फंड उभारण्यात आशियात १ नंबरला
19
सुदानमध्ये संयुक्त राष्ट्राच्या तळावर क्रूर ड्रोन हल्ला; ६ बांगलादेशी पीसकीपर्स ठार, ८ गंभीर जखमी; युनो महासचिवकडून तीव्र निषेध
Daily Top 2Weekly Top 5

पक्षकार्यासाठी पैसा आणायचा कोठून?

By admin | Updated: July 8, 2017 03:18 IST

कर्जमाफी आणि जीएसटीवरून सरकारच्या विरोधात वातावरण तयार करायचे, जिल्ह्या-जिल्ह्यात बैठका लावायच्या, कार्यक्रम घ्यायचे हे सगळे

अतुल कुलकर्णी/लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कर्जमाफी आणि जीएसटीवरून सरकारच्या विरोधात वातावरण तयार करायचे, जिल्ह्या-जिल्ह्यात बैठका लावायच्या, कार्यक्रम घ्यायचे हे सगळे मान्य आहे. पण यासाठी पैसा आणायचा कोठून, असा सवाल राज्यभरातून आलेल्या जिल्हाध्यक्षांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांना केला. मात्र जिल्हाध्यक्षांनी सक्रिय झाले पाहिजे, असे सांगून हा विषय फार वाढू दिला नाही.मुंबईत टिळक भवन येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व प्रदेश पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राजकीय परिस्थितीचा जिल्हानिहाय आढावा घेण्यात आला. या वेळी माजी मंत्री सुरेश शेट्टी, आ. बस्वराज पाटील, भाई जगताप, सचिन सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.फडणवीस सरकारने काँग्रेसच्या दबावामुळेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. पण या कर्जमाफीत सरकारने कशी खोट आणली, याची माहिती गावागावात होर्डिंग्जवर लावावी. तसेच गावपातळीवर मोहीम हाती घेऊन सरकारविरोधी वातावरण तयार करावे, असे बैठकीत ठरले. जीएसटीमुळे व्यापाऱ्यांचे कसे हाल होत आहेत आणि त्यामुळे छोट्या उद्योगांची कशी अडचण होणार आहे हे सांगण्यासाठी व्यापक मोहीम पक्षाने हाती घेण्याचे ठरवले आहे. त्यासाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांचे मुंबई व नागपूर यासह आणखी एका शहरात कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत. चिदंबरम यांच्या महाराष्ट्र दोऱ्याची सुरुवात भिवंडी येथून करून तेथील छोट्या उद्योगांना वास्तवाची जाणीव करून द्यायची असाही निर्णय या बैठकीत झाला. परंतु या सगळ्या कामासाठी निधी कसा उभा करायचा, असा सवाल काही जिल्हाध्यक्षांनी उपस्थित केला. त्यावर निधी उभा करावा लागेल, असे खा. चव्हाण यांनी सांगितले. तर काही पदाधिकाऱ्यांनी आपणहून पक्षासाठी निधी दिल्याचे एका नेत्याने सांगितले. त्यांची नावे काय, असे विचारले असता नावे छापून बाकीच्यांची अडचण कशाला करता, असेही तो नेता म्हणाला.नव्यांना संधी कधी मिळणार?पक्षात जुन्या नेत्यांनीच जागा अडवून ठेवल्या आहेत. त्यामुळे नव्यांना संधी मिळत नाही, मग पक्ष वाढणार कसा, असा सूरही पक्षाच्या नेत्यांमध्ये उमटला. येत्या काळात ब्लॉक व जिल्हास्तरावरची ५० टक्के पदे नवीन लोकांना द्यायची अशी चर्चा पक्षात सुरू असली तरी त्याला दिल्लीची मान्यता मिळाल्याशिवाय पुढे काहीही होणार नाही, असे एका नेत्याने स्पष्ट केले.