शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
5
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
6
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
7
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
8
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
9
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
10
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
11
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
12
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
13
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
14
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
15
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
16
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
17
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
18
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
20
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा

जाहीर झालेले हमीभाव तरी बाजारात कोठे मिळतात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 09:07 IST

चर्चा : गेली चार वर्षे खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देण्याचे वचन पूर्ण केलेच नाही. यावर्षी १८-१९ च्या खरीप पिकांचे हमीभाव खर्चावर ५० टक्के नफा जोडून जाहीर केले. 

- विजय जावंधिया  (शेतकरी नेते)

पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ च्या निवडणूक प्रचारात जाहीर भाषणात म्हणायचे की, डॉ. मनमोहनसिंग यांचे धोरण ‘मर जवान मर किसान’ असे आहे. माझे सरकार स्थापन झाल्यावर आम्ही खर्चावर ५० टक्के नफा जोडून शेतीमालाचे भाव देऊ मग शेतकरी आत्महत्या का करील? जनता म्हणायची नाही करणार... नाही करणार! या परिस्थितीत काहीच बदल झाला नाही. कारण २०१४-१८ पर्यंत शेतमालाचे हमीभाव ५० टक्के नफा जोडून जाहीर करण्यात आलेच नाही. जे हमीभाव जाहीर झाले तेही बाजारात मिळाले नाहीत.

उदाहरणार्थ सोयाबीनचा हमीभाव ३ हजार ५० रुपये होता. तर बाजारभाव २५०० ते २८०० रुपये होता. तुरीचा हमीभाव ५४०० रुपये प्रतिक्विंटल तर बाजारात ३ हजार ते ३ हजार ५०० रुपये, कापसाचा हमीभाव ४३२० रुपये तर बाजारात ४ हजार ते ४ हजार २०० रुपये होता. भुईमुगाचा भाव ४,४५० रुपये तर बाजारात ३ हजार ५०० रुपये होता. केंद्र सरकारच्या कृषी मूल्य आयोगाने जाहीर केलेले हमीभाव परवडणारे कधीच नव्हते. त्या जाहीर होणाऱ्या भावाचे महत्त्व हेच की, त्यापेक्षा कमी भाव झाले तरी सरकार कमीत कमी त्या भावाचे संरक्षण देईल.

यापूर्वीच्या काळात बाजारात हमीभावापेक्षा जास्त भाव होते म्हणून सरकारला शेतमालाची खरेदी मोठ्या प्रमाणात करावी लागत नव्हती. दुसरा महत्त्वाचा मुद्दा मोदी निवडणुकीच्या काळात म्हणायचे रुपयाचे अवमूल्यन होत आहे. त्या काळात ६२-६३ रुपयांचा डॉलर हा विनिमय दर होता. भाजपचा दावा होता की, आम्ही सत्तेवर आल्यावर ४० रुपयांचा १ डॉलर हा विनिमय दर होईल. परंतु ७२.५० ते ७३ रुपये १ डॉलर असा विनिमय दर आहे. 

गेली चार वर्षे खर्चावर ५० टक्के नफा जोडून भाव देण्याचे वचन पूर्ण केलेच नाही. यावर्षी १८-१९ च्या खरीप पिकांचे हमीभाव खर्चावर ५० टक्के नफा जोडून जाहीर केले. ही स्वतंत्र भारतातील विक्रमी भाववाढ आहे, असाही प्रचार होत आहे. २००८-०९ च्या निवडणूक वर्षात डॉ. मनमोहनसिंग सरकारने सर्व शेतमालाचे हमीभाव २८ टक्के ते ५० टक्क्यांपर्यंत वाढविले होते. उदाहरण कापसाचा हमीभाव २ हजार ३० रुपयांचा ३ हजार रुपये, धानाचा ६५० रुपयांचा भाव ८५० रुपये, सोयाबीनचा १ हजार ५० रुपयांचा भाव १ हजार ३५० रुपये केला होता. मोदी यांनी जी भाववाढ जाहीर केली आहे ती अशी आहे.

कापूस ४ हजार ३२० रुपयांवरून ५ हजार ४५० रुपये, धानाचा भाव १ हजार ५५० रुपयांवरून १ हजार ७५० रुपये, सोयाबीनचा भाव ३ हजार ५० रुपयांवरून ३ हजार ३९९ रुपये. यावरून हे स्पष्ट होईल की मनमोहनसिंग सरकारने जाहीर केलेल्या भाववाढीपेक्षा ही वाढ कमी आहे. त्या काळात देशातील व जगातील बाजारात कापूस भावात प्रचंड मंदी होती. कारण महाराष्ट्रात सरकारने सर्व कापूस नाफेड व सी.सी.आय.च्या मार्फत खरेदी केला होता.

आता महत्त्वाचा मुद्दा आहे की, जरी जाहीर झालेले हमीभाव डॉ. स्वामीनाथन यांनी शिफारस केलेल्या सी-२ उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा जोडून नाही. परंतु जे जाहीर झाले आहेत ते तरी बाजारात मिळतील का? हा खरा लाख मोलाचा प्रश्न आहे. खरिपाच्या उडीद-मुगाची आवक बाजारात सुरू झाली. मात्र जाहीर केलेला हमीभाव ५ हजार ६०० व ६ हजार ९७५ रुपये मिळत नाही.        

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीAgriculture Sectorशेती क्षेत्रCentral Governmentकेंद्र सरकार