शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
5
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
6
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
7
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
8
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
9
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
10
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
11
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
12
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
13
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
14
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
15
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
17
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
18
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
19
Vijay Hazare Trophy : हिटमॅनचा हिट शो जारी! मुंबईच्या संघाकडून खेळण्यासाठी मैदानात उतरला अन्...
20
३१ डिसेंबरला उघडणार या वर्षाचा अखेरचा आयपीओ; प्राईज बँड ₹९०, पाहा GMP सह अनेक डिटेल्स
Daily Top 2Weekly Top 5

जागेचे हस्तांतरण होणार कधी?

By admin | Updated: December 21, 2014 00:20 IST

उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला

शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय : शासकीय अनास्थेचा फटकायोगेश पांडे -नागपूरउपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी अंतिम करण्यात आलेल्या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया अद्यापही पूर्ण झालेली नाही. ‘एनआयटी’ने या जागेसाठी सुमारे साडेएकवीस कोटी रुपयाचा दर निश्चित केला असून ही रक्कम २५ डिसेंबर पर्यंत भरण्यासंदर्भात शासनाला कळविले आहे. परंतु अद्याप या निधीसंदर्भात अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. कामाच्या या कासवगतीमुळे महाविद्यालय पुढील शैक्षणिक सत्रात तरी सुरू होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत आहे.गोंडवाना विद्यापीठाच्या निर्मितीनंतर चंद्रपूर येथील राजीव गांधी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय नागपूर विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातून बाहेर झाले. त्यानंतर उपराजधानीत शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय असावे ही मागणी जोर धरायला लागली होती. या प्रस्तावाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळायलाच बरीच प्रतीक्षा करावी लागली. ३ जून २०१४ रोजी यासंदर्भात शासन निर्णय जारी करण्यात आला. प्रस्तावित शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयासाठी कामठी रोड येथील ‘आॅटोमोटिव्ह’ चौकाजवळील मौजा वांजरी परिसरातील ७.४७ एकर जागा अंतिम करण्यात आली. परंतु अद्यापपर्यंत ही जागादेखील तंत्रशिक्षण संचालनालयाला मिळालेली नाही. ‘एनआयटी’च्या अखत्यारितील या जागेच्या हस्तांतरणाची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. २०१४-१५ या शैक्षणिक वर्षातच भाड्याच्या इमारतीत तरी अभ्यासक्रम सुरू होतील, असे आश्वासन तंत्रशिक्षण संचालनालयाकडून देण्यात आले होते. परंतु अद्याप जागाच हाती न आल्यामुळे पुढील प्रशासकीय प्रक्रिय अडकलेली आहे. जागा मिळाल्यानंतर ‘एआयसीटीई’ला महाविद्यालयाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे जागा तंत्रशिक्षण संचालनालयाच्या ताब्यात येणार तरी कधी, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.या जागेचा दर २६ कोटी ६१ लाख रुपये निश्चित करण्यात आला आहे. या निधीसंदर्भात राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यासाठी राज्य शासनाने अद्याप निर्णय घेतलेला नाही. या संथगतीमुळे नवीन वर्षाच्या सुरुवातीला जागा जरी ताब्यात आली, तरी ‘एआयसीटीई’ची मंजुरी मिळेपर्यंत पुढील शैक्षणिक सत्र सुरू होऊन जाण्याची शक्यता आहे. यासंदर्भात तंत्रशिक्षण संचालनालयाचे विभागीय सहसंचालक गुलाबराव ठाकरे यांच्याशी संपर्क साधला असता संबंधित मुद्यावर शासनाला निर्णय घ्यायचा आहे. त्यामुळे मी बोलणे योग्य होणार नाही, असे प्रतिपादन त्यांनी केले.