शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
2
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब
3
IND vs SA Womens World Cup 2025 Final :आफ्रिकेनं जिंकला टॉस, फायनल जिंकण्यासाठी टीम इंडिया सेट करणार टार्गेट
4
"दिल्लीमध्ये बसून गणित करणाऱ्यांनी येऊन बघावं, हवा कोणत्या दिशेची आहे?"; PM मोदींकडून बिहारच्या जनतेला मोठी आश्वासनं
5
'गाझा' नंतर आता इस्रायलची नजर या मुस्लिम देशावर, भयंकर हल्ला करण्याची धमकी
6
Rahul Gandhi : राहुल गांधींनी मासे पकडण्यासाठी तलावात मारली उडी अन्...; Video तुफान व्हायरल
7
टीनएजर्ससाठी अलर्ट! सुंदर दिसण्याची हौस भलतीच महागात; 'स्किनकेअर'ची क्रेझ धोकादायक
8
IND vs AUS : टिम डेविडची वादळी खेळी! पठ्ठ्यानं मोडला सूर्या दादाचा मोठा विक्रम
9
कामगाराच्या खात्यात चुकून आले ₹८७,०००००, त्याने बोनस म्हणून उडवले, बॉसवर आली डोक्यावर हात मारण्याची वेळ 
10
iPhone 16: आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर २५००० रुपये वाचवा; कुठं मिळतोय इतका स्वस्त?
11
६० का लगता नही कहीं से! अक्षय कुमारच्या शाहरुखला हटके शुभेच्छा; म्हणाला, "शकल से ४०..."
12
"56 इंचाची छाती असून, अमेरिकेपुढे झुकतात", राहुल गांधींचा पंतप्रधान मोदींवर निशाणा
13
युक्रेनकडून रशियावर भीषण ड्रोनहल्ला, तुआप्से बंदरात घडवला मोठा विध्वंस, ऑईल टर्मिलन जळाले  
14
PM किसानचा २१वा हप्ता कधी येणार? मोठी अपडेट समोर! 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाहीत २००० रुपये
15
‘सत्याचा मोर्चा’त शरद पवारांचे विधान; शिंदे गटाचे नेते म्हणाले, “५० वर्ष सत्ता भोगली...”
16
मुंबईतील कॉन्सर्टवेळी 'मिस्ट्री मॅन'सोबत दिसली मलायका अरोरा, नेटकरी म्हणाले, "अर्जुनपेक्षा भारी..."
17
"मोदी आणि अमित शाह यांना तर हरवू शकत नाहीत, म्हणून..."; खर्गेंच्या संघावरील बंदीच्या मागणीवर बाबा रामदेव यांची तिखट प्रतिक्रिया
18
IND-W vs SA-W Final : टॉस आधी पावसाची बॅटिंग! मेगा फायनलमध्ये ५०-५० षटकांचा खेळ होणार का?
19
रेखा झुनझुनवाला यांची हिस्सेदारी असलेल्या कंपनीला मोठी ऑर्डर; शेअर्स रॉकेट वेगाने धावणार?
20
तंत्रज्ञानाची किमया! चित्रपट पाहत असताना...; Apple वॉचमुळे वाचला २६ वर्षीय तरुणाचा जीव

बारामती जिल्हा होणार कधी?

By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST

ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामती
ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने भौगोलिकदृष्टय़ा विस्ताराने मोठय़ा असलेल्या नगर व पुणो जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे अस्तित्वात कधी येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: पुणो जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे पुणो जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा अस्तित्वात येणार, याची चर्चा मागील 2क् ते 22 वर्षापासून आहे. परंतु, यावर शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 
साधारणत: 1991 पासून पुणो व नगर जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणो जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा समावेश करून बारामती जिल्हा निर्मिती करण्याच्या हालचाली 1991 पासून सुरू आहेत. परंतु, त्यावर अंतिम निर्णय होत नाही. 
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या 12 डिसेंबर 2क्12 मध्ये या तारखेचे औचित्य साधून बारामती जिल्हा घोषित करण्याच्या हालचाली होत्या. मात्र, त्या वेळी निर्णय झाला नाही. सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला. पुणो जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मूळ प्रस्ताव त्यापूर्वी होता.  त्यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, कर्जत या तालुक्यांचा समावेश केला होता. त्यानंतर पुन्हा दौंडचा समावेश केला. त्याचबरोबर बारामती जिल्ह्याची निर्मिती झालीच, तर पुरंदर तालुक्याचादेखील  यामध्ये समावेश करावा, अशा हालचाली सुरू झाल्या. जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व कार्यालय बारामतीत सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्या तालुक्यांचा बारामती जिल्ह्यामध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव आहे. त्यांचे अंतर साधारणत: 5क् ते 6क् किलोमीटर इतके आहे. त्यामुळे महसुली कामासह अन्य महत्त्वाच्या कामांना गती येईल, नागरिकांचे प्रश्न सुटतील.  
 
4पुणो, अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा विस्तारलेल्या या जिल्ह्यांचे विभाजन करणोदेखील महत्त्वाचे आहे. पुण्यापासून इंदापूरचे शेवटचे गाव 17क् किलोमीटर आहे. त्यामुळे कोणत्याही महसुली अथवा अन्य कामांसाठी जाण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रस होतो. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस, कर्जत तालुक्यांना बारामती मध्यवर्ती ठिकाण आहे.
 
4जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सर्व शासकीय कार्यालये बारामतीमध्ये सुरू झाली आहेत. त्यासाठी नवीन मध्यवर्ती इमारत उभारण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे परिमंडल कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त सत्रन्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये बारामतीमध्ये आहेत. त्याबरोबर आरटीओ, कृषी, आरोग्य आदी विभागीय कार्यालयांचा कारभार बारामतीतून सुरू आहे.
 
4 पुणो, नगर जिल्ह्याचेदेखील विभाजन होण्याच्या हालचालींना वेग येईल. त्यानुसार ‘बारामती जिल्हा’ अस्तित्वात येण्याची चर्चा पुन्हा वाढली आहे. मात्र, बारामती जिल्ह्यात समावेश करण्यासाठी माळशिरस, फलटण, पुरंदरच्या राजकीय मंडळींचा विरोध आहे, असे सांगितले जात आहे.  परंतु, या तालुक्यांना बारामती जिल्ह्याची निर्मिती झाल्यास फायदाच होणार आहे.