शहरं
Join us  
Trending Stories
1
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
2
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
3
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
4
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
5
चिनी मालाने दिला दगा, पहलगाम हल्ल्यानंतर तब्बल ९६ दिवस लपलेले दहशतवादी असे सापडले
6
Nitin Shete: नितीन शेटे यांच्या मृत्यूचे कारण वेगळेच? पोलीस अधीक्षकांनी केला महत्त्वाचा खुलासा
7
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
8
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
9
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
10
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
11
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
12
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
13
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
14
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
15
कुठे फेडशील हे पाप? मैत्रिणीसोबत फिरायला गेल्याचा जाब विचारला म्हणून पत्नीला पेटवून दिले!
16
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
17
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
18
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
19
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
20
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!

बारामती जिल्हा होणार कधी?

By admin | Updated: June 19, 2014 23:35 IST

ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे.

महेंद्र कांबळे ल्ल बारामती
ठाणो जिल्ह्याचे विभाजन करण्यास राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. याच अनुषंगाने भौगोलिकदृष्टय़ा विस्ताराने मोठय़ा असलेल्या नगर व पुणो जिल्ह्याचे विभाजन करून नवीन जिल्हे अस्तित्वात कधी येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. विशेषत: पुणो जिल्ह्याचे क्षेत्रफळ मोठे आहे. त्यामुळे पुणो जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्हा अस्तित्वात येणार, याची चर्चा मागील 2क् ते 22 वर्षापासून आहे. परंतु, यावर शासनस्तरावर कोणत्याही हालचाली झालेल्या नाहीत. 
साधारणत: 1991 पासून पुणो व नगर जिल्ह्याचे विभाजन करून बारामती जिल्ह्याची निर्मिती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पुणो जिल्ह्यातील बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदरसह सातारा जिल्ह्यातील फलटण, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस, नगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्याचा समावेश करून बारामती जिल्हा निर्मिती करण्याच्या हालचाली 1991 पासून सुरू आहेत. परंतु, त्यावर अंतिम निर्णय होत नाही. 
राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांच्या 12 डिसेंबर 2क्12 मध्ये या तारखेचे औचित्य साधून बारामती जिल्हा घोषित करण्याच्या हालचाली होत्या. मात्र, त्या वेळी निर्णय झाला नाही. सर्व चर्चाना पूर्णविराम मिळाला. पुणो जिल्ह्याचे विभाजन करण्याचा मूळ प्रस्ताव त्यापूर्वी होता.  त्यामध्ये बारामती, इंदापूर, फलटण, माळशिरस, कर्जत या तालुक्यांचा समावेश केला होता. त्यानंतर पुन्हा दौंडचा समावेश केला. त्याचबरोबर बारामती जिल्ह्याची निर्मिती झालीच, तर पुरंदर तालुक्याचादेखील  यामध्ये समावेश करावा, अशा हालचाली सुरू झाल्या. जिल्हा निर्मितीच्या दृष्टीने आवश्यक असलेले सर्व कार्यालय बारामतीत सुरू करण्यात आले आहेत. तसेच, ज्या तालुक्यांचा बारामती जिल्ह्यामध्ये समावेश होण्याचा प्रस्ताव आहे. त्यांचे अंतर साधारणत: 5क् ते 6क् किलोमीटर इतके आहे. त्यामुळे महसुली कामासह अन्य महत्त्वाच्या कामांना गती येईल, नागरिकांचे प्रश्न सुटतील.  
 
4पुणो, अहमदनगर जिल्हा विस्ताराने मोठा आहे. त्यामुळे भौगोलिकदृष्टय़ा विस्तारलेल्या या जिल्ह्यांचे विभाजन करणोदेखील महत्त्वाचे आहे. पुण्यापासून इंदापूरचे शेवटचे गाव 17क् किलोमीटर आहे. त्यामुळे कोणत्याही महसुली अथवा अन्य कामांसाठी जाण्यासाठी नागरिकांना मानसिक त्रस होतो. त्यामुळे बारामती, दौंड, इंदापूर, पुरंदर, फलटण, माळशिरस, कर्जत तालुक्यांना बारामती मध्यवर्ती ठिकाण आहे.
 
4जिल्ह्याच्या ठिकाणी असणारे सर्व शासकीय कार्यालये बारामतीमध्ये सुरू झाली आहेत. त्यासाठी नवीन मध्यवर्ती इमारत उभारण्यात आली आहे. महावितरण कंपनीचे परिमंडल कार्यालय, अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालय, पोलीस प्रशिक्षण केंद्र, अतिरिक्त सत्रन्यायालय आदी महत्त्वाची कार्यालये बारामतीमध्ये आहेत. त्याबरोबर आरटीओ, कृषी, आरोग्य आदी विभागीय कार्यालयांचा कारभार बारामतीतून सुरू आहे.
 
4 पुणो, नगर जिल्ह्याचेदेखील विभाजन होण्याच्या हालचालींना वेग येईल. त्यानुसार ‘बारामती जिल्हा’ अस्तित्वात येण्याची चर्चा पुन्हा वाढली आहे. मात्र, बारामती जिल्ह्यात समावेश करण्यासाठी माळशिरस, फलटण, पुरंदरच्या राजकीय मंडळींचा विरोध आहे, असे सांगितले जात आहे.  परंतु, या तालुक्यांना बारामती जिल्ह्याची निर्मिती झाल्यास फायदाच होणार आहे.