शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

आंबेजोगाई जिल्हा केव्हा होणार?

By admin | Updated: June 25, 2016 04:06 IST

आम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीआम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांनी दिल्ली सफरीत राजनाथ सिंह व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांनीही या विद्यार्थ्याचे वय विचारात घेत हसत हसत प्रतिप्रश्न विचारला, २५ वर्षांपासून? तू २५ वर्षांपासून ही मागणी कशी काय करू शकतो? त्यावर मुलाने उत्तर दिले, की माझ्या आधीपासून लोक ही मागणी करीत आहेत. तेव्हा राजनाथ सिंह यांना हसू आवरले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांना लोकमतच्या व्यवस्थापनाने हवाई सफर घडविली. त्यात महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमधील शाळकरी मुलांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी मुंबईहून ही मुले दिल्लीला पोहोचली. एका विद्यार्थ्याने लातूरमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधत या शहराचा दौरा करण्याची विनंती केली असता राजनाथ सिंह म्हणाले, की आता लातूरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. पाण्याची समस्या सोडविली जाईल. या छोटेखानी भेटीत गृहमंत्र्यांनी सर्व मुलांना एकेक पार्कर पेन भेट दिला. याप्रसंगी लोकमतचे व्हाइस प्रेसिडेंट (वितरण) वसंत आवारे, भारत माने (कोल्हापूर), देवीदास वैद्य (अहमदनगर), शैलेंद्र राजपूत (जळगाव), प्रशांत अरक (औरंगाबाद), संजय गुल्हाने (नागपूर), शीलेश शर्मा, नबीन सिन्हा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत, अजित तिवारी उपस्थित होते.खूप अभ्यास करा, चांगले राहा. स्वत: महान बनत देशाला महान बनवा, असा संदेश राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय चांगला असून, लोकमत वृत्तपत्र समूह सर्वांना परिचित आहे. खा. विजय दर्डा आमचे परमस्नेही आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.प्रभूंनी जागवल्या आठवणीरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपल्या बालवयातल्या आठवणींसह मुलांसमोर भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. पाठोपाठ विद्यार्थ्यांनी मुंबईच्या लोकलपासून रेल्वेसंबंधी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना त्यांनी मनमोकळी आणि दिलखुलास उत्तरेही दिली. देशाच्या राजधानीत क्वचितच जमणारी ही अनोखी मैफील उत्तरोत्तर रंगतच गेली. रेल्वेमंत्र्यांनी जवळपास तासभर मुलांशी संवाद साधला. त्याचबरोबर लोकमतने आयोजित केलेल्या हवाई सफर उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.