शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

आंबेजोगाई जिल्हा केव्हा होणार?

By admin | Updated: June 25, 2016 04:06 IST

आम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो

प्रमोद गवळी,  नवी दिल्लीआम्ही २५ वर्षांपासून मागणी करीत आहोत. आंबेजोगाई जिल्हा कधी बनणार, असा थेट सवाल केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना १२ वर्षांच्या शाळकरी मुलाने केला. तेव्हा काय दृश्य असेल याचा अंदाज लावता येऊ शकतो. लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांनी दिल्ली सफरीत राजनाथ सिंह व रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याशी संवाद साधला. राजनाथ सिंह यांनीही या विद्यार्थ्याचे वय विचारात घेत हसत हसत प्रतिप्रश्न विचारला, २५ वर्षांपासून? तू २५ वर्षांपासून ही मागणी कशी काय करू शकतो? त्यावर मुलाने उत्तर दिले, की माझ्या आधीपासून लोक ही मागणी करीत आहेत. तेव्हा राजनाथ सिंह यांना हसू आवरले नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मी याबाबत चर्चा करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.लोकमतमधील ‘संस्कारांचे मोती’ स्पर्धेतील विजेत्या ४५ विद्यार्थ्यांना लोकमतच्या व्यवस्थापनाने हवाई सफर घडविली. त्यात महाराष्ट्र आणि गोव्याच्या सर्व जिल्ह्यांमधील शाळकरी मुलांचा समावेश होता. शुक्रवारी सकाळी मुंबईहून ही मुले दिल्लीला पोहोचली. एका विद्यार्थ्याने लातूरमधील पाणीटंचाईकडे लक्ष वेधत या शहराचा दौरा करण्याची विनंती केली असता राजनाथ सिंह म्हणाले, की आता लातूरमध्ये चांगला पाऊस पडत आहे. पाण्याची समस्या सोडविली जाईल. या छोटेखानी भेटीत गृहमंत्र्यांनी सर्व मुलांना एकेक पार्कर पेन भेट दिला. याप्रसंगी लोकमतचे व्हाइस प्रेसिडेंट (वितरण) वसंत आवारे, भारत माने (कोल्हापूर), देवीदास वैद्य (अहमदनगर), शैलेंद्र राजपूत (जळगाव), प्रशांत अरक (औरंगाबाद), संजय गुल्हाने (नागपूर), शीलेश शर्मा, नबीन सिन्हा, प्रमोद गवळी, प्रवीण भागवत, अजित तिवारी उपस्थित होते.खूप अभ्यास करा, चांगले राहा. स्वत: महान बनत देशाला महान बनवा, असा संदेश राजनाथ सिंह यांनी विद्यार्थ्यांना दिला. ‘लोकमत’चा हा उपक्रम अतिशय चांगला असून, लोकमत वृत्तपत्र समूह सर्वांना परिचित आहे. खा. विजय दर्डा आमचे परमस्नेही आहेत. मी त्यांचे अभिनंदन करतो, असे त्यांनी नमूद केले.प्रभूंनी जागवल्या आठवणीरेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी आपल्या बालवयातल्या आठवणींसह मुलांसमोर भावपूर्ण मनोगत व्यक्त केले. पाठोपाठ विद्यार्थ्यांनी मुंबईच्या लोकलपासून रेल्वेसंबंधी विचारलेल्या रोखठोक प्रश्नांना त्यांनी मनमोकळी आणि दिलखुलास उत्तरेही दिली. देशाच्या राजधानीत क्वचितच जमणारी ही अनोखी मैफील उत्तरोत्तर रंगतच गेली. रेल्वेमंत्र्यांनी जवळपास तासभर मुलांशी संवाद साधला. त्याचबरोबर लोकमतने आयोजित केलेल्या हवाई सफर उपक्रमाची मुक्तकंठाने प्रशंसा केली.