शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

नदीपात्रातील जलपर्णी हटणार तरी कधी?

By admin | Updated: June 9, 2016 01:26 IST

नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला

चाकण : गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला आहे.पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पात्रात व चिंबळी, मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी केव्हा काढणार, असा प्रश्न भरतमहाराज यांच्यासह खेड तालुक्यातील वारकरी व स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.याकरिता प्रसिद्धी माध्यमांनी अनेकदा आवाजही उठविला होता. त्यामुळे महापालिकेने फक्त एक ते दोन वेळा जलपर्णी काढण्यासाठी अ‍ॅक्वेटिकवीर हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही जलपर्णी अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने तिच्यापासून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिरवेगार क्रिकेटचे मैदान दिसणारी ही जलपर्णी त्वरित हटवावी. या मागणीवर सभापती विलास कातोरे, चिंबळीचे उपसरपंच हेमंत जैद, अमोल जैद, मोईचे माजी सरपंच जीवन येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, विकास येळवंडे व येथील नागरिक ठाम आहेत.>राजगुरुनगर, मोशी, चिखली, मोई, निघोजे, कुरुळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणी असलेल्या नदीपात्रामधील जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही जलपर्णी तातडीने काढावी व त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी थोरातमहाराज यांनी केली आहे.