शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
2
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
3
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
4
कोण आहे अविष्कार राऊत?; नेपाळमधील Gen Z आंदोलनापूर्वी केलेले जोरदार भाषण व्हायरल
5
एका शेअरवर ४ बोनस शेअर्स देणार ही कंपनी; ३ महिन्यांत पैसे केले डबल, कंपनीत स्टेट बँकेचीही गुंतवणूक
6
Infosys चं बायबॅक 'शॉपिंग'; १९% प्रीमिअमवर खरेदी करणार आपलेच शेअर्स, स्टॉक सुस्साट
7
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
8
उमेश-प्रियाची 'बिन लग्नाची गोष्ट', १३ वर्षांनी पडद्यावर आली रिअल लाईफ जोडी; कसा आहे सिनेमा? वाचा रिव्ह्यू
9
पितृपक्ष २०२५: पितृअष्टमीला करा गजलक्ष्मी व्रत; लक्ष्मीपूजनाएवढेच महत्त्व, सुख संपत्तीने नांदतात सर्व!
10
Pitru Paksha 2025: पितृपक्षाचा एक आठवडा शिल्लक; पितृदोष कसा ओळखावा? उपाय कोणते? ते पाहू
11
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
12
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
13
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
14
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
15
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
16
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
17
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
18
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
19
आसुरी अहंकार नको, संस्कृतीसोबत सत्कृतीही जोपासायला हवी : मोरारीबापू
20
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले

नदीपात्रातील जलपर्णी हटणार तरी कधी?

By admin | Updated: June 9, 2016 01:26 IST

नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला

चाकण : गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला आहे.पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पात्रात व चिंबळी, मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी केव्हा काढणार, असा प्रश्न भरतमहाराज यांच्यासह खेड तालुक्यातील वारकरी व स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.याकरिता प्रसिद्धी माध्यमांनी अनेकदा आवाजही उठविला होता. त्यामुळे महापालिकेने फक्त एक ते दोन वेळा जलपर्णी काढण्यासाठी अ‍ॅक्वेटिकवीर हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही जलपर्णी अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने तिच्यापासून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिरवेगार क्रिकेटचे मैदान दिसणारी ही जलपर्णी त्वरित हटवावी. या मागणीवर सभापती विलास कातोरे, चिंबळीचे उपसरपंच हेमंत जैद, अमोल जैद, मोईचे माजी सरपंच जीवन येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, विकास येळवंडे व येथील नागरिक ठाम आहेत.>राजगुरुनगर, मोशी, चिखली, मोई, निघोजे, कुरुळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणी असलेल्या नदीपात्रामधील जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही जलपर्णी तातडीने काढावी व त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी थोरातमहाराज यांनी केली आहे.