शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

नदीपात्रातील जलपर्णी हटणार तरी कधी?

By admin | Updated: June 9, 2016 01:26 IST

नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला

चाकण : गेल्या अनेक महिन्यांपासून इंद्रायणी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलेली असून, नागरिकांच्या आरोग्यास घातक ठरणारी ही जलपर्णी काढणार तरी कधी? असा संतप्त सवाल संत विचारधारा प्रतिष्ठानचे संस्थापक-अध्यक्ष व युवा कीर्तनकार भरतमहाराज थोरात यांनी उपस्थित केला आहे.पुणे -नाशिक महामार्गावरील राजगुरुनगर येथील भीमा नदीच्या पात्रात व चिंबळी, मोशी हद्दीतील इंद्रायणी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढली आहे. या जलपर्णीमुळे नदीच्या परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. ही जलपर्णी केव्हा काढणार, असा प्रश्न भरतमहाराज यांच्यासह खेड तालुक्यातील वारकरी व स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.याकरिता प्रसिद्धी माध्यमांनी अनेकदा आवाजही उठविला होता. त्यामुळे महापालिकेने फक्त एक ते दोन वेळा जलपर्णी काढण्यासाठी अ‍ॅक्वेटिकवीर हार्वेस्टर यंत्राच्या सहाय्याने प्रयत्न केला, मात्र तो अयशस्वी ठरला आहे. त्यामुळे ही जलपर्णी अद्यापही ‘जैसे थे’ असल्याने तिच्यापासून निर्माण होणाऱ्या आरोग्यविषयक समस्या निर्माण झाल्या आहेत. हिरवेगार क्रिकेटचे मैदान दिसणारी ही जलपर्णी त्वरित हटवावी. या मागणीवर सभापती विलास कातोरे, चिंबळीचे उपसरपंच हेमंत जैद, अमोल जैद, मोईचे माजी सरपंच जीवन येळवंडे, सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब पानसरे, विकास येळवंडे व येथील नागरिक ठाम आहेत.>राजगुरुनगर, मोशी, चिखली, मोई, निघोजे, कुरुळी, चिंबळी, केळगाव, डुडूळगाव, गोलेगाव, मरकळ आदी ठिकाणी असलेल्या नदीपात्रामधील जलपर्णीची मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आरोग्यविषयक विविध समस्या निर्माण झाल्या आहेत. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याने ही जलपर्णी तातडीने काढावी व त्यात सोडण्यात येणारे सांडपाणी त्वरित थांबविण्यात यावे, अशी मागणी थोरातमहाराज यांनी केली आहे.