शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
2
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
3
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
4
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
5
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
6
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
7
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला
8
पाकिस्तानात गेलं की ISI एजंट बनतं का? सोनम वांगचुक यांच्या पत्नीने हिंसाचारासाठी CRPF ला धरलं जबाबदार
9
गावात वास्तव्य, सायकलवरून प्रवास आणि..., असं आहे Arattaiचे संस्थापक श्रीधर वेंबू यांचं साधं राहणीमान
10
"आजकाल मुलांना वाढवणं कठीण...", मृण्मयी देशपांडेने व्यक्त केलं मत, पालकांबद्दल म्हणाली...
11
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
12
Colab Platforms Stock Price: ७३ दिवसांपासून शेअरला लागतंय अपर सर्किट, वर्षभरात ८४२% ची वाढ; गुंतवणूकदार मालामाल
13
Motorola G35 5G: डॉल्बी साउंड असलेला मोटोरोलाचा 5G फोन ८,९९९ रुपयांत लॉन्च! 
14
Anju Yadav : चौकट मोडली, भरारी घेतली! २१ व्या वर्षी लग्न, पतीचा मृत्यू... सिंगल मदर झाली राजस्थानची DSP
15
Amravati: गर्लफ्रेंड पोलीस ठाण्यात जाताच ६व्या मजल्या गेला अन् व्हिडीओ कॉल केला; नंतर बॉयफ्रेंडने सगळ्यांनाच फोडला घाम
16
"तरुणांच्या मनातील शंका..."; थेट आंदोलक तरुणांना भेटण्यासाठी पोहोचले CM धामी, परीक्षा प्रकरणात CBI चौकशीला सहमती 
17
गुंतवणूकदारांची चिंता वाढवणारी बातमी! सलग आठव्या दिवशी बाजार कोसळला; 'ही' आहेत ४ कारणे
18
कुणी कर्ज देता का कर्ज?... पाकिस्तानने पुन्हा IMF पुढे पसरले हात, महापुराचं कारण देत मागितला मोठा निधी
19
Rule Change: उद्यापासून बदलणार 'हे' महत्त्वाचे आर्थिक नियम; सामान्यांवर होणार परिणाम, पटापट चेक करा लिस्ट
20
भारतीय शास्त्रज्ञ डॉ. संध्या यांचा जागतिक स्तरावर डंका, अव्वल २ टक्के शास्त्रज्ञांमध्ये स्थान

धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग

By admin | Updated: June 4, 2014 22:30 IST

खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुणेकरांवर ऐन पावसाळयात पाणी संकट ओढावणार आहे. शहरास दररोज लागणारे पाणी पाहता या प्रकल्पात सुमारे साडेचार टीएमसी पाणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात धरणात मात्र तीनच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाणी कपात अटळ बनली आहे.शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकलवासला प्रकल्पातील धरणांमधून महापालिकेस दरमहा दिड टीएमसी पाणी दिले जाते. त्यानुसार, संपूर्ण वर्षभरात पालिकेस 14 ते 15 टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणात सुमारे 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेली दिड वर्षापासून सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून तब्बल 10 टीएमसी पाणी शेती आणि शहरासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची पातळी आणखीनच खालावली असून पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर या प्रकल्पात केवळ 2. 91 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठयासाठी 15 जुलै पर्यंत राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेले दोन महिने शेतीसाठी कालव्याद्वारे मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तसेच कालवाही 1473 क्युसेक्सने सुरूच आहे. या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता धरणे भरण्यास ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्यास आम्ही पाणी देऊ असे मोघम उत्तर या विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरास दरमहा लागणा-या दिड टीएमसी पाण्याची मागणी पाहता महापालिकेच्या मागणीनुसार, 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठयाचे नियोजन करावयाचे असल्यास धरणात साडेचार टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पाऊने तीन टीएमसीच पणी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास जादा पाणी नसल्याने आहे तेच पाणी कपातीद्वारे वाचवावे लागणार आहे.