शहरं
Join us  
Trending Stories
1
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
2
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
3
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
4
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
5
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
6
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
7
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
8
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
9
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
10
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
11
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
12
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
13
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
14
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
15
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
16
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल

धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग

By admin | Updated: June 4, 2014 22:30 IST

खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुणेकरांवर ऐन पावसाळयात पाणी संकट ओढावणार आहे. शहरास दररोज लागणारे पाणी पाहता या प्रकल्पात सुमारे साडेचार टीएमसी पाणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात धरणात मात्र तीनच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाणी कपात अटळ बनली आहे.शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकलवासला प्रकल्पातील धरणांमधून महापालिकेस दरमहा दिड टीएमसी पाणी दिले जाते. त्यानुसार, संपूर्ण वर्षभरात पालिकेस 14 ते 15 टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणात सुमारे 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेली दिड वर्षापासून सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून तब्बल 10 टीएमसी पाणी शेती आणि शहरासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची पातळी आणखीनच खालावली असून पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर या प्रकल्पात केवळ 2. 91 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठयासाठी 15 जुलै पर्यंत राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेले दोन महिने शेतीसाठी कालव्याद्वारे मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तसेच कालवाही 1473 क्युसेक्सने सुरूच आहे. या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता धरणे भरण्यास ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्यास आम्ही पाणी देऊ असे मोघम उत्तर या विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरास दरमहा लागणा-या दिड टीएमसी पाण्याची मागणी पाहता महापालिकेच्या मागणीनुसार, 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठयाचे नियोजन करावयाचे असल्यास धरणात साडेचार टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पाऊने तीन टीएमसीच पणी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास जादा पाणी नसल्याने आहे तेच पाणी कपातीद्वारे वाचवावे लागणार आहे.