शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
3
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
4
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
5
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
6
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
7
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
8
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
9
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
10
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
11
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
12
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
13
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
14
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
15
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
16
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
17
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
18
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
19
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
20
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?

धरणातले पाणी संपल्यावर पालिकेस आली जाग

By admin | Updated: June 4, 2014 22:30 IST

खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे

पुणे : शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकवासला प्रकल्पात जुलै अखेर पर्यंतचा पाणीसाठा उरला असताना, आता महापालिकेने या पाण्याचे 31 ऑगस्ट पर्यंत करण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुणेकरांवर ऐन पावसाळयात पाणी संकट ओढावणार आहे. शहरास दररोज लागणारे पाणी पाहता या प्रकल्पात सुमारे साडेचार टीएमसी पाणी आवश्यक असताना, प्रत्यक्षात धरणात मात्र तीनच टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन झाल्यास पाणी कपात अटळ बनली आहे.शहराला पाणी पुरवठा करणा-या खडकलवासला प्रकल्पातील धरणांमधून महापालिकेस दरमहा दिड टीएमसी पाणी दिले जाते. त्यानुसार, संपूर्ण वर्षभरात पालिकेस 14 ते 15 टीएमसी पाण्याचा पुरवठा केला जातो. मागील वर्षी या प्रकल्पातील खडकवासला, टेमघर, पानशेत आणि वरसगाव या धरणात सुमारे 100 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे गेली दिड वर्षापासून सुरू असलेली पाणी कपात मागे घेण्यात आली. मात्र, त्यानंतर गेल्या तीन महिन्यात या प्रकल्पातून तब्बल 10 टीएमसी पाणी शेती आणि शहरासाठी सोडण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्याची पातळी आणखीनच खालावली असून पाटबंधारे विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज अखेर या प्रकल्पात केवळ 2. 91 टीएमसी पाणी आहे. हे सर्व पाणी महापालिकेच्या पाणी पुरवठयासाठी 15 जुलै पर्यंत राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पाटबंधारे विभागाकडून सांगण्यात येत आहे. मात्र, गेले दोन महिने शेतीसाठी कालव्याद्वारे मोठया प्रमाणात पाणी सोडले जात आहे. तसेच कालवाही 1473 क्युसेक्सने सुरूच आहे. या वर्षी कमी पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. तसेच गेल्या काही वर्षांची आकडेवारी पाहता धरणे भरण्यास ऑगस्टचा शेवटचा आठवडा उजाडत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे या वर्षी पाटबंधारे विभागाने 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठा राखीव ठेवण्याची मागणी पाटबंधारे विभागाकडे केली आहे. मात्र, त्यास आम्ही पाणी देऊ असे मोघम उत्तर या विभागाकडून देण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. शहरास दरमहा लागणा-या दिड टीएमसी पाण्याची मागणी पाहता महापालिकेच्या मागणीनुसार, 31 ऑगस्ट पर्यंत पाणीसाठयाचे नियोजन करावयाचे असल्यास धरणात साडेचार टीएमसी पाणी असणे आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पाऊने तीन टीएमसीच पणी आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करावयाचे झाल्यास जादा पाणी नसल्याने आहे तेच पाणी कपातीद्वारे वाचवावे लागणार आहे.