शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

भूखंड हस्तांतरणाला मुहूर्त कधी?

By admin | Updated: October 23, 2014 03:59 IST

केडीएमसी परिवहनचा नियोजनाअभावी बोजवारा उडाला असताना गणेश घाट आगाराची जागा वगळता अन्य आरक्षित जागा अद्याप परिवहनच्या ताब्यात आलेल्या नाहीत.

कल्याण : केडीएमसी परिवहनचा नियोजनाअभावी बोजवारा उडाला असताना गणेश घाट आगाराची जागा वगळता अन्य आरक्षित जागा अद्याप परिवहनच्या ताब्यात आलेल्या नाहीत. १० जुलै २०१४ पर्यंत जागा ताब्यात देऊ, असे आश्वासन आयुक्त रामनाथ सोनवणे यांनी दिले होते. परंतु आजतागायत याची अंमलबजावणी न झाल्याने नव्याने दाखल होणाऱ्या १८५ बस रस्त्यावर उभ्या करण्याची वेळ परिवहनवर येणार आहे.केडीएमसी परिक्षेत्रात परिवहन उपक्रमासाठी २८ जागा आरक्षित आहेत. सध्या उपक्रमात असलेल्या ७० बससह काही महिन्यांपूर्वीच दाखल झालेल्या २० बस गणेश घाट आगारात उभ्या केल्या जात आहेत. लवकरच केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरू त्थान अभियानांतर्गत नव्या १८५ बस दाखल होणार आहेत. महापालिका आयुक्तांनी १० जुलैपर्यंत आरक्षित जागा परिवहनच्या ताब्यात देण्यात येतील, असे आश्वासन परिवहन व्यवस्थापनाला दिले होते. परंतु, विलंब पाहता मनसेच्या सदस्यांनी लवकर जागा हस्तांतरीत करा अन्यथा उपोषण छेडावे लागेल असा इशारा दिला होता. आजतागायत ही जागा देखील हस्तांतरीत न झाल्याने मनसेचा इशारा ही हवेत विरला आहे. (प्रतिनिधी)