शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025 IND vs PAK Final : ठरलं! इतिहासात पहिल्यांदाच भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल
2
'संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना NDRF निधीतून भरीव मदत द्या'; CM फडणवीसांची अमित शाहांकडे मागणी
3
इस्रायलची राजधानी तेलअवीव येथे कारमध्ये मोठा स्फोट, अनेक जण जखमी झाल्याची शक्यता
4
PAK vs BAN: Live मॅचमध्ये कॉमेडी! दोन्हीं बॅटर स्ट्राइक एन्डला; तरी Run Out करायला नाही जमलं (VIDEO)
5
संकट अद्याप टळलेले नाही, पुढील २ दिवस पाऊस वाढण्याचा अंदाज; विदर्भ, मराठवाड्यात काय होणार?
6
लडाख हिंसाचारानंतर सोनम वांगचुक यांच्यावर मोठी कारवाई; सरकारने रद्द केला एनजीओचा परवाना
7
Saim Ayub : आफ्रिदीच्या जावयाला टक्कर देण्याच्या नादात फजिती; सर्वाधिक वेळा पदरी पडला भोपळा!
8
कोथरूड मारहाण प्रकरणात निलेश घायवळही आरोपी; दहशत वाढवण्यासाठी दिली होती पिस्तुल
9
Suryakumar Yadav Hearing On PCB Complaint : सूर्याला फक्त वॉर्निंग की... फायनल आधी होणार फैसला!
10
'शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी PM केअर फंड वापरा'; उद्धव ठाकरेंची सरकारकडे मोठी मागणी
11
कपड्यांवरून ट्रोलिंगबाबत अखेर अमृता फडणवीस यांनी सोडलं मौन, म्हणाल्या- "ज्या महिलेकडे..."
12
झुबिन गर्गच्या मृत्यू प्रकरणात नवं वळण; संगीतकार ज्योती गोस्वामीला अटक, अनेकांची चौकशी सुरु
13
Taskin Ahmed 100 Wickets : पाक विरुद्ध बांगलादेशी गोलंदाजाची कमाल! पहिल्याच षटकात साधला 'शतकी' डाव
14
“विद्यार्थ्यांची परीक्षा देण्याची मानसिकता नाही, MPSC पुढे ढकला”; कुणी केली सरकारकडे मागणी? 
15
Maharashtra Flood: “महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना पूर्ण मदत करावी, मदतकार्याला गती द्यावी”; राहुल गांधींचे आवाहन
16
Asia Cup 2025 Final: सूर्यकुमार यादवच्या विरोधात पाकची तक्रार; टीम इंडियाचा कर्णधार फायनलला मुकणार? जाणून घ्या प्रकरण
17
लालबागचा राजा संकटात धावून आला; शेतकरी बांधव, पूरग्रस्तांना मंडळाकडून ५० लाखांची मदत घोषित
18
17 पैकी 12 जणांची मंत्रिमंडळातून होणार 'सुट्टी'! या राज्यात भाजप करणार मोठी 'सर्जरी'? मंत्रीपदासाठी या नव्या नावांची चर्चा!
19
VIDEO: दिसण्यावर जाऊ नका... काकांनी गायलेलं रोमँटिंक गाणं ऐका, नक्कीच त्यांचे 'फॅन' व्हाल
20
Video - बदल्याची आग! लिव्ह-इन पार्टनर झाला हैवान; Ex गर्लफ्रेंडला एक्टिव्हाने दिली धडक

गुणवंत कामगार पुरस्कार प्रदानाचा मुहूर्त कधी?

By admin | Updated: June 29, 2015 03:08 IST

पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री अशा मान्यवरांच्या तारखा मिळत नसल्याने तब्बल ४ महिन्यांचा उशीर झाला आहे.

चेतन ननावरे, मुंबईसाहित्य, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत विशेष योगदान दिल्याबद्दल राज्यातील कामगारांना महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे देण्यात येणाऱ्या गुणवंत कामगार कल्याण पुरस्काराला मुहूर्त कधी मिळणार, असा सवाल कामगार वर्गाला पडला आहे. कारण कामगार क्षेत्रात मानाचा मानल्या जाणाऱ्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला राज्यपाल, मुख्यमंत्री, कामगार मंत्री अशा मान्यवरांच्या तारखा मिळत नसल्याने तब्बल ४ महिन्यांचा उशीर झाला आहे. भारतीय कामगार चळवळीचे नेते रावबहाद्दूर नारायण मेघाची लोखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ फेब्रुवारी महिन्यात या पुरस्कारांचे वितरण होणे अपेक्षित असते. मात्र चार महिने उलटल्यानंतरही अद्याप पुरस्कार वितरण सोहळ्याला मुहूर्त सापडलेला नाही. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळातर्फे दरवर्षी ५१ कामगारांना गुणवंत कामगार कल्याण पुरस्कार दिला जातो. १९७८-७९ सालापासून मंडळाकडून ५ वर्षांहून अधिक सेवा झालेल्या कामगारांना विशेष योगदानासाठी या पुरस्काराने गौरविले जात आहे. या पुरस्कारासाठी एकूण ८६ कामगारांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. कल्याण आयुक्त नरेंद्रसिंह नागभिरे यांनी पुरस्कार वितरण सोहळ्यास विलंब होत असल्याचे मान्य केले. नागभिरे म्हणाले, ‘मंडळाने समिती गठित करण्यास उशीर झाल्यामुळे पुरस्कार जाहीर करण्यास विलंब झाला. हा पुरस्कार मुख्यमंत्री, राज्यपाल, कामगार मंत्री, आयुक्त यांच्या उपस्थितीत देण्याचा मानस आहे. त्यामुळे या सर्व मान्यवरांच्या सोयीनुसारच वितरण सोहळ्याची तारीख जाहीर करण्यात येईल.’ कामगार कल्याण मंडळाकडून देण्यात येणारा कामगार भूषण पुरस्कार यंदा नाशिकच्या रामचंद्र शिंदे यांना जाहीर झाला आहे. कामगार पुरस्कारांचे स्वरूप गुणवंत कामगार पुरस्कार १५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे आहे. पुरस्कारानंतर कामगाराला विशेष कार्यकारी अधिकाऱ्याचे अधिकार मिळतात. कामगार भूषण गुणवंत कामगार पुरस्कार मिळाल्यानंतर पुढील १० वर्षांत विविध क्षेत्रांत दिलेले योगदान पाहून ‘कामगार भूषण’ पुरस्कार दिला जातो. २५ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. कामगार मित्र रावबहाद्दूर नारायण मेघाजी लोखंडे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘कामगार मित्र’ पुरस्कार दिला जातो. ५१ हजार रुपये, स्मृतिचिन्ह आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘कामगार मित्र’ मिळणार का? समर्पित वृत्तीने काम करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना पुरस्कारासाठी अर्ज करायला लावणे उचित नसते. म्हणून मंडळाकडून समाजातील विविध स्तरातील मान्यवर, उद्योग संस्था, कामगार संघटना यांच्याकडून माहिती मागवून त्याआधारे एखाद्या संस्थेला किंवा व्यक्तीला ‘कामगार मित्र’ पुरस्काराने गौरविण्यात येते. मात्र या वर्षी मंडळाने या पुरस्कारासाठी कोणत्याही व्यक्ती किंवा संस्थेच्या नावाची घोषणा केलेली नाही. यावर ‘कामगार मित्र पुरस्कारासाठी योग्य व्यक्ती किंवा संस्था मंडळाच्या दृष्टिक्षेपात आलेली नाही. मात्र पुरस्कार वितरण सोहळ्याआधीही अशी एखादी व्यक्ती किंवा संस्था नजरेस आल्यास पुरस्काराची घोषणा करू,’ अशी शक्यता आयुक्तांनी व्यक्त केली आहे. पुरस्कारासाठी वशिलेबाजी? गुणवंत कामगार पुरस्कारांत यंदा ४ महिला कामगार आणि ८२ पुरुष कामगारांचा समावेश आहे. पुरस्कारासाठी आलेल्या प्रवेशिकांमध्ये बहुतेक कामगारांनी आमदारापासून मंत्र्यांपर्यंतच्या शिफारसपत्रांची जोडणी केल्याचे कल्याण आयुक्तांनी मान्य केले. मात्र कोणताही वशिला न पाहता कामगाराची गुणवत्ता पाहूनच पुरस्कार जाहीर केल्याचा दावा आयुक्तांनी केला आहे.