शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

पाऊस कोकणातून पुढे सरकणार कधी? मुंबई, मध्य महाराष्ट्राला दीर्घ प्रतीक्षा

By admin | Updated: June 24, 2017 04:17 IST

कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : कोकणातील बहुतांश भागातील पावसाचा जोर कायम असून, विदर्भ आणि घाटमाथ्यावरील काही भागात पावसाने चांगली हजेरी लावली आहे. मुंबई तसेच मध्य महाराष्ट्र, मराठवाड्याचा बहुतांश भाग मात्र अद्यापही पावसाच्या प्रतिक्षेत आहे. पाऊ स सुरूच न झाल्याने अनेक भागांत पेरण्या रखडल्या आहेत. मृग नक्षत्रात पेरण्या केल्या जातात. पण यंदा मृग संपला तरी पावसाचा पत्ता नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. गेल्या वर्षी राज्यात सर्वदूर चांगला पाऊ स झाल्यामुळे आतापर्यंत राज्याच्या ग्रामीण भागांत पाण्याची टंचाई फारशी भासलेली नाही. पण आता तो सुरू झाला नाही, तर जुलैमध्ये ते संकट निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. मुंबईत ७ ते १0 जून या काळात मान्सूनचे आगमन होते. यंदा आगमन लांबले. सुरुवातीला २ ते ५ जून या काळात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. पण तो तेव्हा पडला नाही आणि आताही मुंबईच्या एखाद दुसऱ्या भागात तुरळक सरी पडत असून, संपूर्ण शहरात अद्याप सलग पाऊ स पडलेलाच नाही. कोकणात अडकलेला पाऊ स अद्याप मुंबईकडे आणि राज्याच्या अन्य भागांत हवा तसा सरकलेला नाही. तो कधी सरकेल, याचा स्पष्ट अंदाजही वर्तवण्यात आलेला नाही. राज्यात मध्य महाराष्ट्रातील गेल्या काही भागांमध्ये २४ तासांत तुरळक पाऊस झाला. लोहगाव, अलिबाग, अकोला येथे प्रत्येकी ३ मिलिमीटर पाऊस झाला. महाबळेश्वर येथे १४ मिलिमीटर पाऊस झाला. तर, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्रातील पारोळा येथे सर्वाधिक ८० मिलिमीटर पाऊस झाला. पाऊस न सुरू झाल्याने शहरी भागाचे तापमान चांगलेच वाढले आहे़ मे महिन्यात होणाऱ्या उकाड्यापेक्षा अधिक उकाडा होत आहे़ त्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत़. 

 

काही भागांमध्ये पाऊस : कोकणातील माथेरान येथे ७०, पनवेल ६०, पेण, उरण प्रत्येकी ४०, खालपुर, कुडाळ, रोहा, वेंगुर्ला येथे प्रत्येकी ३०, अलिबाग, डहाणू, जव्हार, कणकवली, मंडणगड, मुंबई, मुरबाड, सुधागड, तलासरी, उल्हासनगर येथे २० मिलिमीटर पाऊस झाला. भिरा, चिपळूण, देवगड, कल्याण, कर्जत, मालवण, माणगांव, म्हापसा, म्हसळा, राजापूर, देवरुख, सावंतवाडी आणि वाडा येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला. घाटमाथा क्षेत्रातील शिरगाव येथे ६०, ताम्हिणी ५०, दावडी ४०, डुंगरवाडी, आंबोणे ३०, लोणावळा, वळवण, भिवपुरी, खोपोली येथे प्रत्येकी २०, भिरा, कोयना, खंद येथे प्रत्येकी १० मिलिमीटर पाऊस झाला.