शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
3
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
4
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
5
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
6
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
7
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
8
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
9
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
10
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
11
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
12
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
13
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
14
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
15
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
16
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
17
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
18
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
19
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
20
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?

‘नैना’च्या आराखड्याला शासनाची मंजुरी कधी?

By admin | Updated: May 17, 2016 03:57 IST

नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अद्याप पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकास आराखड्यास शासनाची मंजुरी मिळविता आलेली नाही. याचा परिणाम विकासावर होवू लागला असून बांधकाम व्यावसायिकांसह या परिसरात घरे घेण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परवडणारी घरे बांधणे विकासकालाही परवडत नाहीत. यामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी नैना परिसर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. परंतु लालफितशाही कारभारामुळे येथील विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. शासनाने १० जानेवारी २०१३ मध्ये नैना परिसराच्या नियोजनाची जबाबदारी सिडकोवर सोपविली. यापूर्वी नवी मुंबई, औरंगाबाद व इतर ठिकाणी शहर वसविण्याचा अनुभव असल्याने सिडको येथील विकासाला गती देईल असे अपेक्षित होते. परंतु तीन वर्षे ४ महिने पूर्ण झाल्यानंतरही फक्त २९ प्रकल्पांना बांधकाम परवानगी देता आली आहे. या गतीने विकास सुरू झाला तर २३ गावांमधील ३६८३ हेक्टर जमिनीचा विकास कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोने सर्व प्रथम २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. १३ आॅगस्ट २०१४ मध्ये प्रारूप अंतरिम विकास योजना तयार करून ती प्रसिद्ध केली व नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या. ११ सप्टेंबरपर्यंत सूचना पाठविणे अपेक्षित होते, पण जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या सूचना देता याव्यात यासाठी १० आॅक्टोबरपर्यंत कालावधी वाढविण्यात आला. तब्बल ३९४६ हरकती व सूचना सिडकोकडे आल्या. सूचना व हरकतींवर सुनावणी घेवून प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविला. यानंतर शासनाच्या सूचनानंतर बदल करून अंतिम आराखडा नोव्हेंबर २०१५ ला शासनाकडे पाठविला आहे. नैनाच्या अंतिम विकास आराखड्याला सहा महिन्यानंतरही मंजुरी मिळालेली नाही. शासनाने मंजुरी दिली नसल्याने या परिसरातील बांधकामांना महानगर विभाग नगरनियोजन कायदा १९६६ अन्वये परवानगी द्यावी लागत आहे. नैनाची जबाबदारी सिडकोवर सोपविल्यापासून ३ वर्षे ४ महिन्यामध्ये विकास आराखडा मंजूर होत नसेल तर प्रत्यक्ष विकास कामे कधी सुरू होणार.नियमांवर बोट ठेवून सिडको परवानगी देत नसल्याने अनेकांनी परवानगी मिळेल या आशेवर बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक होवू लागली आहे. विकास आराखडा मंजूर होण्यास अजून किती दिवस लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. >सरकारी यंत्रणेचा फटकानैना परिसराचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी शासनाने सिडकोकडे जबाबदारी दिली आहे. सिडकोने २७० पैकी पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास करण्याचे निश्चित केले. याविषयी विकास आराखडा तयार करण्यामध्ये सिडकोला जवळपास ३ वर्षे कालावधी लागला. सहा महिन्यापूर्वी अंतिम विकास आराखडा शासनाकडे पाठविला परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सरकारी यंत्रणा अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याने त्याचा परिणाम विकासावर होत आहे. बिल्डरांविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नैना परिसरातील व्यावसायिकांकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. याविषयी व्यावसाय्ािक नाराजी व्यक्त करत आहेत. नियमांचे पालन झालेच पाहिजे. परंतु शासनाने व सिडकोने विकास आराखडा, बांधकाम परवानगी, पायाभूत सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. तीन वर्षात विकास आराखडाच मंजूर झाला नाही. या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व दोष बिल्डरांच्या माथी मारून सिडको प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे.