शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

‘नैना’च्या आराखड्याला शासनाची मंजुरी कधी?

By admin | Updated: May 17, 2016 03:57 IST

नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे.

नामदेव मोरे,

नवी मुंबई- नैना परिसराच्या विकासाची जबाबदारी सिडकोवर सोपवून ४० महिन्यांचा कालावधी पूर्ण झाला आहे. परंतु अद्याप पहिल्या टप्प्यातील २३ गावांच्या विकास आराखड्यास शासनाची मंजुरी मिळविता आलेली नाही. याचा परिणाम विकासावर होवू लागला असून बांधकाम व्यावसायिकांसह या परिसरात घरे घेण्यासाठी गुंतवणूक करणाऱ्या नागरिकांचेही नुकसान होऊ लागले आहे. मुंबई, नवी मुंबईमध्ये घरांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. परवडणारी घरे बांधणे विकासकालाही परवडत नाहीत. यामुळे हजारो सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घरापासून वंचित राहावे लागत आहे. सद्यस्थितीमध्ये परवडणाऱ्या घरांसाठी नैना परिसर हा एकमेव पर्याय शिल्लक राहिला आहे. परंतु लालफितशाही कारभारामुळे येथील विकास अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. शासनाने १० जानेवारी २०१३ मध्ये नैना परिसराच्या नियोजनाची जबाबदारी सिडकोवर सोपविली. यापूर्वी नवी मुंबई, औरंगाबाद व इतर ठिकाणी शहर वसविण्याचा अनुभव असल्याने सिडको येथील विकासाला गती देईल असे अपेक्षित होते. परंतु तीन वर्षे ४ महिने पूर्ण झाल्यानंतरही फक्त २९ प्रकल्पांना बांधकाम परवानगी देता आली आहे. या गतीने विकास सुरू झाला तर २३ गावांमधील ३६८३ हेक्टर जमिनीचा विकास कधी होणार असा प्रश्न उपस्थित होत आहे. सिडकोने सर्व प्रथम २३ गावांचा विकास आराखडा तयार करण्याचे काम हाती घेतले. १३ आॅगस्ट २०१४ मध्ये प्रारूप अंतरिम विकास योजना तयार करून ती प्रसिद्ध केली व नागरिकांकडून सूचना व हरकती मागविल्या. ११ सप्टेंबरपर्यंत सूचना पाठविणे अपेक्षित होते, पण जास्तीत जास्त नागरिकांना त्यांच्या सूचना देता याव्यात यासाठी १० आॅक्टोबरपर्यंत कालावधी वाढविण्यात आला. तब्बल ३९४६ हरकती व सूचना सिडकोकडे आल्या. सूचना व हरकतींवर सुनावणी घेवून प्रारूप आराखडा शासनाकडे पाठविला. यानंतर शासनाच्या सूचनानंतर बदल करून अंतिम आराखडा नोव्हेंबर २०१५ ला शासनाकडे पाठविला आहे. नैनाच्या अंतिम विकास आराखड्याला सहा महिन्यानंतरही मंजुरी मिळालेली नाही. शासनाने मंजुरी दिली नसल्याने या परिसरातील बांधकामांना महानगर विभाग नगरनियोजन कायदा १९६६ अन्वये परवानगी द्यावी लागत आहे. नैनाची जबाबदारी सिडकोवर सोपविल्यापासून ३ वर्षे ४ महिन्यामध्ये विकास आराखडा मंजूर होत नसेल तर प्रत्यक्ष विकास कामे कधी सुरू होणार.नियमांवर बोट ठेवून सिडको परवानगी देत नसल्याने अनेकांनी परवानगी मिळेल या आशेवर बांधकामे सुरू केली आहेत. या बांधकामांमध्ये सर्वसामान्य नागरिकांनी गुंतवणूक केली असून त्यांची फसवणूक होवू लागली आहे. विकास आराखडा मंजूर होण्यास अजून किती दिवस लागणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे. >सरकारी यंत्रणेचा फटकानैना परिसराचा योग्यप्रकारे विकास करण्यासाठी शासनाने सिडकोकडे जबाबदारी दिली आहे. सिडकोने २७० पैकी पहिल्या टप्प्यात २३ गावांचा विकास करण्याचे निश्चित केले. याविषयी विकास आराखडा तयार करण्यामध्ये सिडकोला जवळपास ३ वर्षे कालावधी लागला. सहा महिन्यापूर्वी अंतिम विकास आराखडा शासनाकडे पाठविला परंतु अद्याप मंजुरी मिळालेली नाही. सरकारी यंत्रणा अत्यंत धीम्या गतीने काम करत असल्याने त्याचा परिणाम विकासावर होत आहे. बिल्डरांविषयी पूर्वग्रहदूषित दृष्टिकोन नैना परिसरातील व्यावसायिकांकडे चुकीच्या दृष्टीने पाहिले जात आहे. याविषयी व्यावसाय्ािक नाराजी व्यक्त करत आहेत. नियमांचे पालन झालेच पाहिजे. परंतु शासनाने व सिडकोने विकास आराखडा, बांधकाम परवानगी, पायाभूत सुविधा वेळेत दिल्या पाहिजेत. तीन वर्षात विकास आराखडाच मंजूर झाला नाही. या अनागोंदी कारभाराला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सर्व दोष बिल्डरांच्या माथी मारून सिडको प्रशासन स्वत:ची जबाबदारी झटकत असल्याविषयी नाराजी व्यक्त होत आहे.