शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
4
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
5
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
6
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
7
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
8
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
9
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
10
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
11
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
12
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
13
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
14
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
15
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
16
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
17
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
18
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
19
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
20
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."

अपघात टळला असता

By admin | Updated: March 12, 2017 01:34 IST

मुलुंडचे काळे दाम्पत्य दरवर्षी होळीपूर्वी अक्कलकोटला स्वत:च्या गाडीने जात असत. यंदा जास्त माणसे असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडून टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बूक केली.

-  मनीषा म्हात्रे,  मुंबईमुलुंडचे काळे दाम्पत्य दरवर्षी होळीपूर्वी अक्कलकोटला स्वत:च्या गाडीने जात असत. यंदा जास्त माणसे असल्याने त्यांनी ट्रॅव्हल्स कंपनीकडून टेम्पो ट्रॅव्हलर गाडी बूक केली. त्यांच्याआधी ही गाडी एका गुजराती कुटुंबाने बुक केली होती. मात्र पैशांचा वाद झाल्यामुळे त्यांनी ती टेम्पो टॅ्रव्हलर रद्द केल्याने ती काळे यांना उपलब्ध झाली. जर तो पैशांचा वाद टळला असता तर हा अपघात घडला नसता, असे त्यांच्या शेजाऱ्यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मुलीने केलेला हट्ट चव्हाण कुटुंबीयांच्या जिवावर बेतल्याने मुलुंड परिसरात शोककळा पसरली आहे. मूळचे सांगलीचे रहिवासी असलेले चव्हाण कुटुंबीय. व्यावसायिक असलेले जयवंत एन. चव्हाण (४५) हे पत्नी योगिता (४०), मुलगी रेवती (१४) आणि मुलगा हेरंब (२०) यांच्यासोबत मुलुंड पूर्वेकडील सज्जनवाडीच्या यशोप्रसाद इमारतीत राहायचे. त्यांचे वाशी मार्केटमध्ये घाऊक विक्रीचे दुकान आहे. मुलगा अभिषेक हा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असल्याने तो कोल्हापूरला राहतो. येथील नीता इमारतीमध्ये राहत असलेले विजय काळे आणि पत्नी ज्योती या दाम्पत्यासोबत त्यांचा घरोबा होता. काळे रेवतीला मुलीसारखे मानत. काळे दाम्पत्य दरवर्षी होळीपूर्वी अक्कलकोट येथे देवदर्शनाला जात असे. त्यांच्यासोबत रेवतीही यापूर्वीही दोन ते तीन वेळा जाऊन आली. मात्र यंदा तिने आई-बाबांनाही येण्यास हट्ट केला. त्यांनीही सुटी म्हणून मुलीचा हट्ट मान्य केला. त्यांनी देवदर्शनाला होकार दिला. पहिल्यांदाच त्यांच्यासोबत निघाले. हे सर्व मुलुंडहून रात्री ९ वाजता निघाले. पुढे जुन्नरचे रहिवासी असलेल्या दोन नातेवाइकांना चाकण येथून घेऊन ते अक्कलकोटला जाणार होते. तेथून पुढे नरसोबावाडी करत कोल्हापूर फिरून १३ तारखेला मुंबईत येणार होते, अशी माहिती ज्योती टुर्स अ‍ॅण्ड ट्रॅव्हलचे हिरनगौडा यश शिरोळ उर्फ पाटील यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. मुलुंडमध्ये जयवंत चव्हाण यांचे ५० ते ६० नातेवाईक आहेत. सणा-समारंभाला ते एकत्र जमतात. यंदा त्यांच्या वडिलांचे भाऊ म्हणजे जयवंत यांच्या काकांचा साठावा वाढदिवस होता. तो वाढदिवस धूमधडाक्यात साजरा करण्याचे जयवंत यांनी ठरवले. त्यासाठी मे महिन्यात सगळे गावी एकत्र येणार होते. मात्र त्यापूर्वीच झालेल्या दुर्दैवी घटनेमुळे सारे कुटुंबच हादरल्याचे जयवंत यांच्या काकी विमल यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.दत्तक मुलगाही गेला...विजय काळे यांना मूल नसल्याने त्यांनी त्यांच्या दुकानात काम करत असलेल्या योगेश लोखंडे याला दत्तक घेतले होते. तेच त्याचा सर्व खर्च उचलत होते. तो मुलुंड पूर्वेच्या नवघर गल्लीमध्ये आई-बाबा, एक बहीण यांच्यासोबत राहत होता. आई-बाबांना जातो असे सांगून शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्याने घर सोडले. मात्र हे जाणे कायमचे असेल असे स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते, असे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले.