शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 15:00 IST

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

मुंबई - ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत, येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधक मोर्चा काढणार आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना माहित आहे की विधानसभा निवडणुकीत ते जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी महामोर्चा काढण्याचं ठरवल असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री यांनी लगावला आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. येणाऱ्या २१ तारखेला ईव्हीएमला विरोध म्हणून सर्वपक्षीय महामोर्चा सुद्धा काढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा दरम्यान विरोधकांच्या निघणाऱ्या मोर्चावर टीका केली आहे. विरोधकांना लक्षात आले आहे की, त्यांना यावेळीही जिंकता येणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच ईव्हीएम- ईव्हीएम बोलून, पुढे मिळणाऱ्या ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी २१ तारखेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महामोर्चानंतर ही काहीच होणार नसून, त्यानंतर ही विरोधकांचा महापराभवच होणार असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले. प्रचंड मोठी गळती त्यांच्याकडे लागली आहे. त्यांनी आत्मचिंतन करायले हवे की, त्यांच्याकडे कुणीच राह्यला का तयार नाहीत. आम्ही पक्ष सोडणार नाहीत अशी शपथ देण्याची वेळ विरोधकांवर आली असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.