शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
आजचे राशीभविष्य,१० नोव्हेंबर २०२५: दुपार नंतर समस्या कमी होऊ लागतील; सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल
3
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
4
विशेष लेख: 'हमारी छोरिया छोरो से कम हैं के?'
5
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
6
मराठी अभिनेता दुसऱ्यांदा होणार बाबा, पार पडलं पत्नीचं बेबी शॉवर; अरुण गवळीच्या मुलीसोबत थाटलाय संसार
7
मुस्लिम आणि ख्रिश्चन RSS चे सदस्य होऊ शकतात का? मोहन भागवत म्हणाले, "शाखेत येऊ शकतात, पण..."
8
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
9
तक्रारदारासोबत गैरवर्तन, २ पोलिस अधिकारी निलंबित
10
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
11
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
12
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
13
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
14
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
15
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
16
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
17
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
18
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
19
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
20
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा

ऐतिहासिक पराभवाचे कारण काय सांगणार; त्यासाठीच २१ तारखेचा मोर्चा: देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2019 15:00 IST

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे.

मुंबई - ईव्हीएमविरोधात शंका उपस्थित करत आगामी विधानसभा निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्या अशी मागणी करत, येत्या २१ तारखेला मुंबईत विरोधक मोर्चा काढणार आहेत. मात्र यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा चांगलाच समाचार घेतला. विरोधकांना माहित आहे की विधानसभा निवडणुकीत ते जिंकू शकत नाही. त्यामुळे आत्तापासूनच ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी ईव्हीएम विरोधात विरोधकांनी महामोर्चा काढण्याचं ठरवल असल्याचा खोचक टोला मुख्यमंत्री यांनी लगावला आहे. गोंदिया येथील पत्रकार परिषेदेत ते बोलत होते.

आगामी विधानसभा निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर घेण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली आहे. येणाऱ्या २१ तारखेला ईव्हीएमला विरोध म्हणून सर्वपक्षीय महामोर्चा सुद्धा काढण्याचा निर्णय विरोधकांनी घेतला आहे. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या महाजनादेश यात्रा दरम्यान विरोधकांच्या निघणाऱ्या मोर्चावर टीका केली आहे. विरोधकांना लक्षात आले आहे की, त्यांना यावेळीही जिंकता येणार नाही. त्यामुळे आत्तापासूनच ईव्हीएम- ईव्हीएम बोलून, पुढे मिळणाऱ्या ऐतिहासिक पराभवाचा कारण तयार करण्यासाठी २१ तारखेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

महामोर्चानंतर ही काहीच होणार नसून, त्यानंतर ही विरोधकांचा महापराभवच होणार असल्याचे सुद्धा फडणवीस म्हणाले. प्रचंड मोठी गळती त्यांच्याकडे लागली आहे. त्यांनी आत्मचिंतन करायले हवे की, त्यांच्याकडे कुणीच राह्यला का तयार नाहीत. आम्ही पक्ष सोडणार नाहीत अशी शपथ देण्याची वेळ विरोधकांवर आली असल्याचे ही मुख्यमंत्री म्हणाले.