शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
इराणमधील अणुकेंद्रांबाबत ट्रम्प यांचं मोठं विधान, म्हणाले, इस्राइल इराणमधील अणुकेंद्रं... 
4
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
5
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
6
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
7
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
8
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
9
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
10
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
11
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
12
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
13
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
14
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
15
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
16
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
17
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
18
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
19
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
20
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!

धक्कादायक वास्तव! MPSC, UPSC मध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:35 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे

वाशिम - अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक हे एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग), यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेकडे वळत आहेत. मात्र, प्रत्येकालाच यश येईल याची खात्री नसल्याने ‘अधिकारी’ होण्याच्या नादात कर्मचारी पदाच्या नोकरीवरही पाणी फिरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच सावध होत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवतानाच, रोजगारासाठी दुसरा पर्यायही समोर ठेवावा, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञ, मार्गदर्शकांनी दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे. काही लाख विद्यार्थी तयारी करतात, संधी मात्र हजारभर विद्यार्थ्यांनाच मिळते. तरीही परीक्षेचे आकर्षण कमी झालेले नाही. या स्थितीत उर्वरित विद्यार्थ्यांचे काय होते, हा औत्सुक्याचा भाग ठरतो. अयशस्वी विद्यार्थ्यांपुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे राहतात. वारंवार अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला. जिल्ह्यातील एखादा, दोन विद्यार्थी रँकमध्ये आला की, परीक्षेच्या मागे लागणाऱ्यांची लाट येते. व्याख्यानातून लाल दिव्याची गोडगोड स्वप्ने दाखविणारे अधिकारी मात्र अपयश आल्यावर काय करायचे, हे सांगत नाहीत. त्यामुळे यशाचा पाठलाग करता करता आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कधी निघून जातात हेदेखील कळत नाही.

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या किती?

राज्यभरातून ८ ते १० लाख विद्यार्थी एमपीएससीच्या विविध परीक्षा देतात. अधिकारी पदाची नोकरी प्रतिष्ठा आणि स्थैर्य देते, त्यामुळे जिल्हाभरातून वर्षाकाठी साधारणत: चार ते पाच हजार विद्यार्थी भवितव्य आजमावतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जेमतेम १० ते १५ आहे. जिल्ह्यातील मुले सर्रास नागपूर, औरंगाबाद व पुण्याला जाऊन तयारी करतात.

परीक्षेची तयारी, वर्षाचा खर्च ७० हजारावर !

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दुसऱ्या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

जेवण, खोली भाडे, अभ्यासिका, शिकवणी वर्ग, पुस्तके आदींसाठी वर्षाला ७० हजार ते लाख-दीड लाख खर्ची पडतात.

२ टक्के यशस्वी होतात, ९८ टक्क्यांचे काय?

परीक्षा देणाऱ्यांपैकी अवघे दोन-चार टक्केच यशस्वी होतात, इतरांचे काय होते? हा अभ्यासाचा विषय आहे. विहित वयोमर्यादेतही यश न मिळाल्यास, त्यानंतर मिळेल ती छोटी-मोठी नोकरी पत्करून इतरांना आयुष्य काढावे लागते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग