शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
3
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
4
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
5
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
6
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
7
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
8
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
9
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
10
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
11
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
12
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
13
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
14
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
15
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
16
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
17
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
18
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
19
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
20
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक वास्तव! MPSC, UPSC मध्ये वारंवार अपयश आलेल्यांचे पुढे होते तरी काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 15, 2022 17:35 IST

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे

वाशिम - अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने विद्यार्थी, युवक हे एमपीएससी (महाराष्ट्र लोकसेवा आयोग), यूपीएससी (केंद्रीय लोकसेवा आयोग) परीक्षेकडे वळत आहेत. मात्र, प्रत्येकालाच यश येईल याची खात्री नसल्याने ‘अधिकारी’ होण्याच्या नादात कर्मचारी पदाच्या नोकरीवरही पाणी फिरण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे वेळीच सावध होत स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू ठेवतानाच, रोजगारासाठी दुसरा पर्यायही समोर ठेवावा, असा सल्ला शिक्षण तज्ज्ञ, मार्गदर्शकांनी दिला.

केंद्रीय लोकसेवा आयोग किंवा महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचे ग्लॅमर दिवसेंदिवस वाढत असल्याच्या काळात तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्यादेखील वाढत आहे. काही लाख विद्यार्थी तयारी करतात, संधी मात्र हजारभर विद्यार्थ्यांनाच मिळते. तरीही परीक्षेचे आकर्षण कमी झालेले नाही. या स्थितीत उर्वरित विद्यार्थ्यांचे काय होते, हा औत्सुक्याचा भाग ठरतो. अयशस्वी विद्यार्थ्यांपुढे आर्थिक, सामाजिक प्रश्न उभे राहतात. वारंवार अपयशी ठरणाऱ्या विद्यार्थ्यांनी पर्यायी मार्ग निवडण्याचा सल्ला शिक्षणतज्ज्ञांनी दिला. जिल्ह्यातील एखादा, दोन विद्यार्थी रँकमध्ये आला की, परीक्षेच्या मागे लागणाऱ्यांची लाट येते. व्याख्यानातून लाल दिव्याची गोडगोड स्वप्ने दाखविणारे अधिकारी मात्र अपयश आल्यावर काय करायचे, हे सांगत नाहीत. त्यामुळे यशाचा पाठलाग करता करता आयुष्यातील महत्त्वाची वर्षे कधी निघून जातात हेदेखील कळत नाही.

स्पर्धा परीक्षेसाठी विद्यार्थी संख्या किती?

राज्यभरातून ८ ते १० लाख विद्यार्थी एमपीएससीच्या विविध परीक्षा देतात. अधिकारी पदाची नोकरी प्रतिष्ठा आणि स्थैर्य देते, त्यामुळे जिल्हाभरातून वर्षाकाठी साधारणत: चार ते पाच हजार विद्यार्थी भवितव्य आजमावतात. त्यातून उत्तीर्ण होणाऱ्यांची संख्या जेमतेम १० ते १५ आहे. जिल्ह्यातील मुले सर्रास नागपूर, औरंगाबाद व पुण्याला जाऊन तयारी करतात.

परीक्षेची तयारी, वर्षाचा खर्च ७० हजारावर !

जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी दुसऱ्या शहरात स्पर्धा परीक्षेची तयारी करतात.

जेवण, खोली भाडे, अभ्यासिका, शिकवणी वर्ग, पुस्तके आदींसाठी वर्षाला ७० हजार ते लाख-दीड लाख खर्ची पडतात.

२ टक्के यशस्वी होतात, ९८ टक्क्यांचे काय?

परीक्षा देणाऱ्यांपैकी अवघे दोन-चार टक्केच यशस्वी होतात, इतरांचे काय होते? हा अभ्यासाचा विषय आहे. विहित वयोमर्यादेतही यश न मिळाल्यास, त्यानंतर मिळेल ती छोटी-मोठी नोकरी पत्करून इतरांना आयुष्य काढावे लागते.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाupscकेंद्रीय लोकसेवा आयोग