शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

पाकिस्तानवर बळाचा वापर करायला मुहूर्त शोधावा काय? - उद्धव ठाकरे

By admin | Updated: January 3, 2017 07:45 IST

पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही असं उद्धव ठाकरे बोलले आहेत

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - कोणत्याही युद्धाशिवाय आमच्या जवानांना बलिदान द्यावे लागत आहे. जवानांची बलिदाने थांबवून त्यांना सन्मान व प्रतिष्ठा देण्यासाठी नव्या लष्करप्रमुखांनी त्यांची कारकीर्द राबवली तर देश त्यांचा जास्त ऋणी राहील. बळाचा वापर करू हे त्यांचे विधान हास्यास्पद ठरू नये इतकेच. वेळ सांगून येत नसते हे बरोबर, पण पठाणकोटपासून उरीपर्यंत पाकड्यांनी सांगून व ठरवून हल्ले केले व आपण बळाचा वापर कधी करावा यासाठी योग्य मुहूर्ताच्या शोधात असू, तर ते योग्य नाही अशी खंत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयच्या माध्यमातून व्यक्त केली आहे. 
 
देशाचे लष्करप्रमुख योग्य तेच बोलले व त्याबद्दल त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच, पण पाकड्यांना धडा शिकवण्याची ती योग्य वेळ नक्की कधी येणार? व त्याबाबत सरकार मुहूर्त वगैरे काढण्यात अडकले आहे काय? पाकिस्तानातही अलीकडेच नव्या लष्करप्रमुखांनी सूत्रे हाती घेतली आहेत व त्यांनीही आल्या आल्याच हिंदुस्थानला दम भरणारे फूत्कार सोडले हेसुद्धा लक्षात घेतले पाहिजे. पाकच्या नवीन लष्करप्रमुखांचेही म्हणणे असेच पडले की, हिंदुस्थानला वेळ येताच धडा शिकवू. हा धमक्या देण्याचा कार्यक्रम दोन्ही बाजूंनी साठ-पासष्ट वर्षांपासून सुरूच आहे असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला आहे. 
 
आमचे लष्कर सदैव सज्ज आणि हिंमतवान आहेच. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते सीमेवर झुंज देत आहे. मात्र अनेक वर्षांपासून ते ‘खंदकां’त योग्य आदेशांची वाट पाहत बसले व खंदकात जळमटे वाढली आहेत हेदेखील तितकेच खरे आहे. तेव्हा आपल्या जवानांची हिंमत व ५६ इंचांची छाती आहेच. छातीवर गोळ्या झेलत दुश्मनांचा खात्मा करण्यासाठीही ते सज्ज आहेत, मात्र पाकिस्तानला धडा शिकविण्याची राजकीय इच्छाशक्ती दिल्लीतील राज्यकर्त्यांत आहे काय, हाच खरा प्रश्‍न आहे असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. 
 
वास्तविक, गेल्या अडीच वर्षांत कश्मीर खोर्‍यात सर्वाधिक जवान शहीद झाले आहेत. पाकिस्तानसारखा चिमूटभर देश अतिरेकी हिंदुस्थानात घुसवून वारंवार आपल्या जवानांचे हत्याकांड घडवीत असताना आपण गप्प का म्हणून राहायचे? आपल्याच जवानांचे मृतदेह आपण किती वेळा मोजत बसायचे? असुरक्षिततेची टांगती तलवार आणखी किती वर्षे सहन करायची? असे संतप्त सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केले आहेत.
 
मागच्या दीड-दोन वर्षांत तर पाकिस्तानने शेकडो वेळा युद्धबंदी मोडून हिंदुस्थानी लष्कराच्या चौक्यांवर हल्ले चढवले. सरहद्दीलगत असलेल्या गावांची परिस्थिती तर भयावह झाली आहे. पाकिस्तानी तोफगोळे कधीही घरादारांवर येऊन आदळतात. ग्रामस्थ जीव मुठीत धरून सुरक्षित ठिकाणी पळ काढतात. ही पळापळ एकदाची थांबलीच पाहिजे. मध्यंतरी पाकड्यांवर जो सर्जिकल स्ट्राइक की काय केला, हासुद्धा म्हणे बळाचाच वापर होता व त्यामुळे पाकड्यांचे दात पूर्णपणे घशात गेल्याचे सांगण्यात आले होते, पण त्या सर्जिकल स्ट्राइकनंतरही सीमेवर ७० पेक्षा अधिक जवानांना वीरमरण पत्करावे लागले असं उद्धव ठाकरे बोलले आहेत.