शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

दुष्काळ पडल्यावर जागे होऊन काय उपयोग?

By admin | Updated: September 4, 2015 00:59 IST

पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हे दरवर्षीप्रमाणे प्रभावित झाले आहेत़ यंदा त्याचा फटका इतर जिल्ह्णांनाही बसण्याची चिन्हे आहेत़

मुंबई: पावसाने महाराष्ट्राकडे पाठ फिरवली आहे़ त्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील जिल्हे दरवर्षीप्रमाणे प्रभावित झाले आहेत़ यंदा त्याचा फटका इतर जिल्ह्णांनाही बसण्याची चिन्हे आहेत़ अशा दुष्काळी परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी काय नियोजन केले? याचा खुलासा राज्य शासनाने प्रतिज्ञापत्रावर करावा, असे आदेश उच्च न्यायालयाने गुरूवारी दिले़राज्यावर ओढावलेल्या दुष्काळी स्थितीबाबत न्या़ व्ही़ एम़ कानडे व न्या़ शालिनी फणसाळकर-जोशी यांच्या खंडपीठाने चिंता व्यक्त केली़ न्यायालय म्हणाले, की पाऊस कमी झाल्याने सध्याची महाराष्ट्रातील परिस्थिती बघता, सिंचनासाठी राज्य शासनाने खर्च केलेले कोट्यवधी रुपये पाण्यात गेल्याचे चित्र आहे़ त्यात दुष्काळ तोंडावर आला की सरकार नियोजनाच्या तयारीला लागते़ हे गैर आहे़ मुळात शासनाने यासाठी ठोस नियोजन करायला हवे, ऐनवेळी जागे होऊन तत्परता दाखवू नये़आधीच गेली काही वर्षे राज्यात पाऊस कमी होत आहे़ असाच पुढील तीन-चार वर्षेही पाऊसच झाला नाही तर सरकार काय करणार? यासाठी जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने पाण्याचे नियोजन करताना अत्यंत काळजी घ्यायला हवी, असे खडेबोलही न्यायालयाने यावेळी सुनावले़उजनी धरणाचे पाणी मोहोळ आणि मंगळवेढा तालुक्यांना सोडावे, अशी मागणी करणारी याचिका सोलापूर येथील शेतकरी सिद्धेश्वर वरडे यांनी केली आहे़ त्यावरील सुनावणीत न्यायालयाने शासनाला वरील आदेश दिले़ त्यानुसार शासनाला येत्या मंगळवारपर्यंत म्हणजेच, ८ सप्टेंबरपर्यंत दुष्काळाच्या नियोजनाचे प्रतिज्ञापत्र सादर करायचे आहे़ तसेच न्यायालयाने जलसंपत्ती प्राधिकरणाला याचिकाकर्त्यांच्या मागणीचाही विचार करण्याची सूचना केली आहे. (प्रतिनिधी)