शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेना सध्या काय करतेय..?

By admin | Updated: March 3, 2017 06:03 IST

महापौरपदी शिवसेनेचा नगरसेवक विराजमान करायचा आणि नंतर राज्याच्या सत्तेविषयी निर्णय घ्यायचा अशी भूमिका सध्या सेनेने घेतली

अतुल कुलकर्णी,मुंबई- एकमेकांवरील प्रचंड चिखलफेकीनंतर शिवसेना-भाजपातील संबंध कमालीचे ताणले गेले असताना सरकारमध्ये भाजपासोबत कोणत्या तोंडाने राहायचे? राहिलो तर सत्तेसाठी लाचारी पत्करल्याचा ठपका बसेल त्याचे काय? सत्तेत राहिलो तर त्याचेही भांडवल करून भाजपाने आपलीच बदनामी केली तर? असे एक ना दोन अनेक प्रश्न सध्या शिवसेनेला पडले आहेत. त्यामुळेच महापौरपदी शिवसेनेचा नगरसेवक विराजमान करायचा आणि नंतर राज्याच्या सत्तेविषयी निर्णय घ्यायचा अशी भूमिका सध्या सेनेने घेतली आहे.शिवसेनेने आपल्याला मुंबई महापालिकेत सोबत घेतले नाही तर काय करायचे म्हणून भाजपानेदेखील ‘प्लॅन बी’वर काम करणे सुरू केले आहे. आम्ही कोणत्याही स्थितीत भाजपा, शिवसेनेसोबत जाणार नाही, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी गुरुवारी जाहीर केले आहे. काँग्रेसने मात्र अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. भाजपा सत्तेवर नको त्यासाठी शिवसेनेचा महापौर चालेल अशी चर्चा काँग्रेस, राष्ट्रवादीसह मनसे आणि अन्य विरोधी पक्षाच्या नेत्यांमध्ये सुरू झाली आहे. शिवसेना खा. संजय राऊत यांनी आम्ही काँग्रेसची मदत घेणार नाही, पण भाजपाला काश्मिरात मेहबुबा मुफ्तींची मदत कशी चालते, असे सांगून या चर्चेला वेगळेच वळण देण्याचा प्रयत्न केला आहे. राऊत यांचे हे अवेळी बोलणे शिवसेनेच्या नेत्यांची डोकेदुखी झाल्याचे एका नेत्याने स्पष्ट केले. दरम्यान, २५ वर्षे युतीत सडली असे आपणच सांगितले आणि आता सत्तेसाठी त्याच युतीत जायचे की सत्तेची पर्वा न करता बाहेर पडण्याचे ठोस कारण शोधायचे याच्या शोधात सध्या शिवसेनेचे नेते व्यस्त आहेत. महापौर तर आपलाच करू, पण राज्यातल्या सत्तेत राहायचे की नाही हा यक्षप्रश्न सध्या सेनेपुढे आहे. निवडणूक काळात व्यक्तिगत पातळीवर जाऊन स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हल्ले केले, मातोश्रीवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले तरीही आपण सत्तेत राहिलो तर शिवसेनेचीच प्रचंड बदनामी होईल आणि भाजपाला तर तेच हवे आहे, म्हणून तर भाजपा नरमाईची भूमिका घेण्याचे नाटक करत आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगण्यात आले आहे. दिल्लीतून नरमाईची भूमिका घेण्याच्या सूचना आल्या अशा खोट्या बातम्या म्हणूनच पेरण्यात आल्या. वास्तविक सेनेला तोडण्याची हीच चांगली वेळ आहे, असे मोदी-शहा जोडीने सांगितल्याचे समजते. पण हे आॅपरेशन आपण आपल्या पद्धतीने करू, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितल्याचे समजते.महापौर शिवसेनाचा झाला की अर्थसंकल्पीय अधिवेशनात विनियोजन बिलाच्या वेळी सरकारचा पाठिंबा काढून घेण्याचा विचारही शिवसेनेत चर्चेला आल्याचे सूत्रांनी सांगितले. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमुक्ती द्या, नाही तर पाठिंबा काढायचा असाही एक सूर शिवसेनेत आहे. प्रचाराच्या काळात आलेल्या कटुतेमुळे आणि भाजपा नेत्यांच्या राजकारणामुळे उद्धव ठाकरे कृषिमंत्री भाऊसाहेब फुंडकर, भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या घरच्या लग्नास गेले नाहीत. ठाकरेंनी आपल्या घरच्या लग्नाला यावे यासाठी दानवे यांनी खूप प्रयत्न केले, पण त्यात त्यांना यश आले नाही.>सेना-राष्ट्रवादीची चर्चा झाल्याची माहितीआपल्या मदतीने राज्यात भाजपाने सरकार चालवायचे आणि वर आपल्याच पक्षाला कमजोर करायचे ही रणनीती पक्षासाठी घातक असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांचे म्हणणे आहे. मिळालेल्या माहितीनुसार शिवसेनेची आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांची वरिष्ठ पातळीवर बोलणी झाल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेना अन्य पक्षाच्या पाठिंब्यावर सत्ता स्थापन करू शकेल असे चित्र वाटू लागले तर भाजपातला एक गट आपल्या संपर्कात आहे, असा दावा राष्ट्रवादीने केला आहे.