शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
3
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
4
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
5
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
6
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
7
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
8
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
9
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
10
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
11
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
12
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
13
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
14
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
16
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
17
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
18
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
19
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
20
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय केले? - हायकोर्ट

By admin | Updated: July 7, 2017 04:46 IST

स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी काय पावले उचललेली आहेत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. स्कूलबस व विद्यार्थ्यांची ने-आण करणारी अन्य वाहने केंद्र सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली काळजी घेत नसल्याचा आरोप ‘पीटीए’ने केला आहे. ‘काही स्कूलबस व अन्य वाहनांनी शाळांबरोबर ‘कॉमन स्टॅण्डर्ड अ‍ॅग्रिमेंट’ केलेले नाही. करारानुसार, पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसचालकाने किंवा मालकाने योग्य ती काळजी घेतली की नाही, हे पाहण्याची जबाबदारी शाळांची आहे. मात्र हा करार केला जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे,’ असा युक्तिवाद पीटीएच्या वकील रमा सुब्रमण्यम यांनी केला. गेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी शाळा व पालकांनी मुलांना शाळेत नेण्यासाठी व आणण्यासाठी नेमलेले वाहन यांमध्ये करार असणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. ‘शाळा आणि स्कूलबस किंवा अन्य वाहनांमध्ये करार नसल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा कशा निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे,’ असे न्यायालयाने नमूद केले.निर्णय अयोग्य"राज्य सरकारने १२ आसनक्षमता असलेल्या ११,९२२ वाहनांना स्कूलबसचा परवाना दिल्याची माहिती दिली. त्यावर सुब्रमण्यम यांनी आक्षेप घेतला. ‘केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १४ किंवा त्याहून अधिक आसन क्षमता असलेल्या वाहनांनाच ‘स्कूलबस’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे,’ असे सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले.