शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
2
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
3
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
4
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
5
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
6
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
7
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
8
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
9
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
10
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
11
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
12
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
13
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
14
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
15
विशेष लेख : कुणी काय खावे, याच्याशी सरकारचा काय संबंध?
16
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
17
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
18
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
19
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
20
आम्हाला तोंड उघडण्यास भाग पाडू नका; ईडी.. तुमचा राजकीय वापर का हाेतोय?

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काय केले? - हायकोर्ट

By admin | Updated: July 7, 2017 04:46 IST

स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : स्कूलबस व शाळा यांमध्ये करार नसेल तर शाळा विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी कशी निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे, अशी टिप्पणी करत उच्च न्यायालयाने शाळांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी काय पावले उचललेली आहेत, याची माहिती देण्यास सांगितले आहे. स्कूलबस व विद्यार्थ्यांची ने-आण करणारी अन्य वाहने केंद्र सरकारच्या नियमानुसार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक असलेली काळजी घेत नसल्याचा आरोप ‘पीटीए’ने केला आहे. ‘काही स्कूलबस व अन्य वाहनांनी शाळांबरोबर ‘कॉमन स्टॅण्डर्ड अ‍ॅग्रिमेंट’ केलेले नाही. करारानुसार, पालकांच्या वतीने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बसचालकाने किंवा मालकाने योग्य ती काळजी घेतली की नाही, हे पाहण्याची जबाबदारी शाळांची आहे. मात्र हा करार केला जात नसल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड केली जात आहे,’ असा युक्तिवाद पीटीएच्या वकील रमा सुब्रमण्यम यांनी केला. गेल्या सुनावणीत सरकारी वकिलांनी शाळा व पालकांनी मुलांना शाळेत नेण्यासाठी व आणण्यासाठी नेमलेले वाहन यांमध्ये करार असणे आवश्यक नसल्याचे न्यायालयाला प्रतिज्ञापत्राद्वारे सांगितले होते. ‘शाळा आणि स्कूलबस किंवा अन्य वाहनांमध्ये करार नसल्यास विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी शाळा कशा निभावणार? याचे उत्तर देण्यास राज्य सरकार अपयशी ठरले आहे,’ असे न्यायालयाने नमूद केले.निर्णय अयोग्य"राज्य सरकारने १२ आसनक्षमता असलेल्या ११,९२२ वाहनांना स्कूलबसचा परवाना दिल्याची माहिती दिली. त्यावर सुब्रमण्यम यांनी आक्षेप घेतला. ‘केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार १४ किंवा त्याहून अधिक आसन क्षमता असलेल्या वाहनांनाच ‘स्कूलबस’चा दर्जा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय अयोग्य आहे,’ असे सुब्रमण्यम यांनी न्यायालयाला सांगितले.