शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

कुशावर्तात तीर्थ टाकण्याची आवश्यकता काय?

By admin | Updated: October 2, 2015 00:17 IST

सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतर ठिकाणाहून तीर्थ आणून ते कुशावर्तात टाकण्याची आवश्यकता का भासली, असा प्रश्न शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. मुख्यमंत्री हिंदू धर्माला मानत नसतील तर ते हिंदू कसे, असे सवाल करून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.गंगाघाटावरील खेमजी आरोग्य भवन येथे पत्रकार परिषदेत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती बोलत होते. सिंहस्थ कुंभपर्वात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानससरोवर तसेच अन्य तीर्थांचे पाणी कुशावर्तात टाकले आणि त्यामुळे भारत-चीन संबंध दृढ होणार, असे सांगितले जात असले, तरी हे तीर्थ घेऊन चीनचा नेता का आला नाही, असे सांगून कुशावर्तात तीर्थ टाकण्याची गरजच नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबांसंदर्भात वक्तव्य केल्याने इंदूर येथील एका भक्ताने शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, नंतर या भक्ताने तो दावा मागे घेतला. मात्र, या संदर्भात शंकराचार्यांनी घाबरून माफी मागितली, अशी अफवा काहींनी पसरविली. त्यामुळे ‘मी माफी मागितलेली नाही आणि पूर्वी जे वक्तव्य केले होते त्यावर मी ठाम असून, शास्त्राला मानणारा माणूस आहे आणि जो शास्त्राला मानतो तोच खरा संत असतो. साईबाबांनी कधी हिंदू शास्त्राला मानले नाही. त्यांच्या मुखात सदैव अल्लाह् मालिक असेच शब्द असायचे. त्यांनी कधी एकादशीचा उपवास केला नाही त्यामुळे ते हिंदू संत कसे ठरू शकतात?’ असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)