शहरं
Join us  
Trending Stories
1
"...इराणला आपली अण्वस्त्रे देण्यास तयार!"; रशियाच्या माजी राष्ट्रपतींचा मोठा दावा; उद्या पुतीन यांची खास बैठक
2
१२५ लढाऊ विमाने, त्यात ७ बी२ बॉम्बर...! इराणला फसविले, पेंटागॉनने सांगितले अणुकेंद्रांवर कसा हल्ला चढविला...
3
“८ वेळा निवडणुका जिंकलो, आता थांबण्याचा विचार करावासा वाटतो”; भास्कर जाधवांचे सूचक विधान
4
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम
5
इराण तीन आठवड्यांत ९ अणुबॉम्ब बनवू शकला असता; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर फोर्डोचा सॅटेलाईट फोटो आला...
6
“वारीमुळे रस्ता जाम होतो, आम्ही तक्रार केली नाही”; अबू आझमींचे विधान, CM फडणवीसांचे उत्तर
7
रोहित-विराट वनडे वर्ल्ड कप खेळणं 'मुश्किल'; गांगुलीनं बोलून दाखवली मनातली गोष्ट
8
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
9
शिंदेंनंतर आता भाजपाने डाव टाकला; शेकडो पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
10
डेटिंग अ‍ॅपवरून सुंदर तरुणी कॅफेत भेटायला आली, १२००० रुपयांचे बिल केले आणि पळून गेली... तरुण बिचारा...
11
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
12
आता पैसे नसल्यामुळे शिक्षण थांबणार नाही; 'या' योजनेद्वारे घरबसल्या मिळेल बिनव्याजी कर्ज...
13
DSP सिराजनं बेन स्टोक्सला केलं 'अरेस्ट'! विकेट गमावल्यावर कॅप्टननं हवेत भिरकावली बॅट (VIDEO)
14
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
15
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
16
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
17
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
18
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
19
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
20
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!

कुशावर्तात तीर्थ टाकण्याची आवश्यकता काय?

By admin | Updated: October 2, 2015 00:17 IST

सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना

नाशिक : सिंहस्थ कुंभमेळा पर्व सुरू झाल्यानंतर जगभरातील सर्व तीर्थांचे अस्तित्व गोदावरी नदीत येते, असा उल्लेख शास्त्रांमध्ये असताना, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना इतर ठिकाणाहून तीर्थ आणून ते कुशावर्तात टाकण्याची आवश्यकता का भासली, असा प्रश्न शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांनी केला. मुख्यमंत्री हिंदू धर्माला मानत नसतील तर ते हिंदू कसे, असे सवाल करून त्यांनी फडणवीस यांच्यावर टीकास्त्र सोडले.गंगाघाटावरील खेमजी आरोग्य भवन येथे पत्रकार परिषदेत शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती बोलत होते. सिंहस्थ कुंभपर्वात मुख्यमंत्री फडणवीस यांनी मानससरोवर तसेच अन्य तीर्थांचे पाणी कुशावर्तात टाकले आणि त्यामुळे भारत-चीन संबंध दृढ होणार, असे सांगितले जात असले, तरी हे तीर्थ घेऊन चीनचा नेता का आला नाही, असे सांगून कुशावर्तात तीर्थ टाकण्याची गरजच नसल्याचे त्यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी शिर्डीच्या साईबाबांसंदर्भात वक्तव्य केल्याने इंदूर येथील एका भक्ताने शंकराचार्यांच्या विरोधात न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, नंतर या भक्ताने तो दावा मागे घेतला. मात्र, या संदर्भात शंकराचार्यांनी घाबरून माफी मागितली, अशी अफवा काहींनी पसरविली. त्यामुळे ‘मी माफी मागितलेली नाही आणि पूर्वी जे वक्तव्य केले होते त्यावर मी ठाम असून, शास्त्राला मानणारा माणूस आहे आणि जो शास्त्राला मानतो तोच खरा संत असतो. साईबाबांनी कधी हिंदू शास्त्राला मानले नाही. त्यांच्या मुखात सदैव अल्लाह् मालिक असेच शब्द असायचे. त्यांनी कधी एकादशीचा उपवास केला नाही त्यामुळे ते हिंदू संत कसे ठरू शकतात?’ असा सवाल त्यांनी केला. (वार्ताहर)