शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 05:00 IST

राजन गवस यांचा सवाल : उदगीरच्या साहित्य संमेलनात रंगली मुलाखत

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : समाज घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो. आज शालेय पातळीवर दर्जेदार शिक्षक मिळणे दुरापास्त झाले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतात. हे कोणत्या नैतिकतेत बसते? असा सवाल करीत संस्थाचालक आणि सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केला. उदगीर येथे सुरू असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुण्यातील विनोद शिरसाट यांनी त्यांना बोलते केले. 

डॉ. गवस म्हणाले, आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. वर्ष संपले की, गेला का पुढच्या वर्गात असे विचारले जायचे. गुरं-ढोरं सांभाळत, उनाडक्या, शेतात काबाडकष्ट करीत आमचे बालपणातील शिक्षण झाले. बालपणात लिहिलेली चार ओळींची बेढर नावाची कविता दादा सबनीस यांनी छापली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कवितेने मला जगवले.  यानंतर कथांमधून कृषक समाजाचे चित्रण रेखाटले. हे माझ्या आयुष्याच्या संबंधितच होते. महाविद्यालयीन चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून, वैतागातून चौंडक, भंडारभोग या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. २५ वर्षांनंतर याच कादंबऱ्यांवर जोगवा  नावाचा चित्रपट निघाला. तणकट, ब-बळीचा या कादंबऱ्या गावातील जातीयता, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आहेत, असेही गवस यांनी सांगितले.

कृषिजन व नागर लोकांचे आयुष्य भिन्नग्रामीण भागातील लोक जेवण करताना पहिला घास इतरांसाठी बाजूला काढून ठेवतात. तेच नागर संस्कृती असलेल्या शहरात होत नाही. शहरात देणारे नव्हे ओरबडणारे असतात. त्यामुळे कृषिजन आणि नागर भद्र लोकांचे आयुष्य भिन्न स्वरूपाचे असल्याचे मत राजन गवस यांनी मांडले.

होय, मी नेमाडपंथीमुलाखतकारांनी आपण नेमाडे घराण्याचे असल्याचे बोलले जाते, अशी चर्चा नेहमी होते, असा प्रश्न विचारला. त्यावर गवस यांनी होय मी नेमाडपंथी आहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यांनी कांदबरी लिहिण्याचे बळ दिले. त्यांच्या नावाने आपल्याला ओळखले जात असेल तर त्यात काय चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.