शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख द्यावे लागतात हे कोणत्या नैतिकतेत बसते?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2022 05:00 IST

राजन गवस यांचा सवाल : उदगीरच्या साहित्य संमेलनात रंगली मुलाखत

राम शिनगारेभारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर साहित्यनगरी उदगीर (जि. लातूर) : समाज घडविण्यासाठी शिक्षक महत्त्वाचा असतो. आज शालेय पातळीवर दर्जेदार शिक्षक मिळणे दुरापास्त झाले आहे. महाविद्यालयांमध्ये प्राध्यापक होण्यासाठी ३० लाख रुपये द्यावे लागतात. हे कोणत्या नैतिकतेत बसते? असा सवाल करीत संस्थाचालक आणि सरकारने शिक्षणाचा बट्ट्याबोळ केला असल्याचा आरोप ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी केला. उदगीर येथे सुरू असलेल्या ९५व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिक राजन गवस यांच्या प्रकट मुलाखतीने झाली. नागपूरचे डॉ. प्रमोद मुनघाटे आणि पुण्यातील विनोद शिरसाट यांनी त्यांना बोलते केले. 

डॉ. गवस म्हणाले, आमच्या कुटुंबात कोणीही शिकलेले नव्हते. वर्ष संपले की, गेला का पुढच्या वर्गात असे विचारले जायचे. गुरं-ढोरं सांभाळत, उनाडक्या, शेतात काबाडकष्ट करीत आमचे बालपणातील शिक्षण झाले. बालपणात लिहिलेली चार ओळींची बेढर नावाची कविता दादा सबनीस यांनी छापली. हाच आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. कवितेने मला जगवले.  यानंतर कथांमधून कृषक समाजाचे चित्रण रेखाटले. हे माझ्या आयुष्याच्या संबंधितच होते. महाविद्यालयीन चळवळीत काम करताना आलेल्या अनुभवातून, वैतागातून चौंडक, भंडारभोग या कादंबऱ्या लिहिल्या गेल्या. २५ वर्षांनंतर याच कादंबऱ्यांवर जोगवा  नावाचा चित्रपट निघाला. तणकट, ब-बळीचा या कादंबऱ्या गावातील जातीयता, शेतकऱ्यांचे प्रश्न यावर आहेत, असेही गवस यांनी सांगितले.

कृषिजन व नागर लोकांचे आयुष्य भिन्नग्रामीण भागातील लोक जेवण करताना पहिला घास इतरांसाठी बाजूला काढून ठेवतात. तेच नागर संस्कृती असलेल्या शहरात होत नाही. शहरात देणारे नव्हे ओरबडणारे असतात. त्यामुळे कृषिजन आणि नागर भद्र लोकांचे आयुष्य भिन्न स्वरूपाचे असल्याचे मत राजन गवस यांनी मांडले.

होय, मी नेमाडपंथीमुलाखतकारांनी आपण नेमाडे घराण्याचे असल्याचे बोलले जाते, अशी चर्चा नेहमी होते, असा प्रश्न विचारला. त्यावर गवस यांनी होय मी नेमाडपंथी आहे, असे स्पष्ट केले. तसेच ज्यांनी कांदबरी लिहिण्याचे बळ दिले. त्यांच्या नावाने आपल्याला ओळखले जात असेल तर त्यात काय चूक आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.