शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
3
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
4
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
5
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
6
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
7
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
8
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
9
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
10
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
11
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
12
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
13
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
14
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
15
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
16
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
17
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
18
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
19
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
20
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार

दहशतवादी हल्ला झाला तर?

By admin | Updated: December 17, 2014 00:37 IST

शहरातील सहा हजार आणि बाहेरचे चार हजार पोलीस अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आहेत. तरीसुद्धा शहरात खून, बलात्कार, चेनस्रॅचिंग, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत.

मॉलमध्ये सुरक्षेचे तीनतेरा : टार्गेट कसे रोखाल ?नरेश डोंगरे - नागपूरशहरातील सहा हजार आणि बाहेरचे चार हजार पोलीस अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत आहेत. तरीसुद्धा शहरात खून, बलात्कार, चेनस्रॅचिंग, जबरी चोऱ्या, घरफोड्या आणि लुटमारीचे गंभीर गुन्हे रोजच घडत आहेत. शहरातील गुन्हेगारी रोखण्यात पोलीस अपयशी ठरत आहे. त्यामुळे नागपूरकर कमालीचे अस्वस्थ आहेत. स्थानिक गुन्हेगारांना रोखण्यात पोलिसांना यश मिळत नाही, तेथे उपराजधानीत दुर्दैवाने दहशतवादी हल्ला झाला किंवा ‘सिडनी’सारखी ओलीस ठेवण्याची घटना घडली तर काय होईल, असा धडकी भरवणारा प्रश्न नागपूरकरांना पडला आहे. यापूर्वी काय घडले उपराजधानी दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे सर्वश्रुत आहे. कोणत्याही वेळी येथे घातपात होऊ शकतो. यापूर्वी येथे दोनदा घातपाताचे प्रयत्न झालेले आहेत. महालमधील बडकस चौकात २००४ मध्ये पाईप बॉम्ब ठेवले गेले. २००६ मध्ये संघ मुख्यालयावर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. उपराजधानीत बांगलादेशी घुसखोरांची संख्या सारखी वाढत आहे. मॉलमध्ये सुरक्षेत गोलमाल शहरातील महत्त्वाच्या आणि संवेदनशील स्थळांवरचा पोलीस बंदोबस्त ठिकठाक आहे. मात्र, अन्य ठिकाणी गोलमाल आहे. सीताबर्डीतील मॉलसह शहरातील बहुतांश मॉल-मल्टिप्लेक्समध्ये सुरक्षेची व्यवस्था कमकुवत आहे. अनेक ठिकाणी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित नाही. दोन-चार गणवेषधारी सुरक्षारक्षक तेवढे तेथे उभे दिसतात. हीच अवस्था बहुतांश बड्या हॉटेलमधील आहे. बहुतांश नामांकित शाळा, महाविद्यालयात सुरक्षा व्यवस्थेची स्थिती फारच चिंताजनक आहे. सध्या हिवाळी अधिवेशनाच्या निमित्ताने उपराजधानीत अनाहूत पाहुण्यांची गर्दी वाढली आहे. या गर्दीत कोणता दहशतवादी, कोणत्या वेळेला, कुठून येईल आणि यापैकी कोणत्या ठिकाणातील उपस्थितांना वेठीस धरेल, त्याचा नेम नाही.उपराजधानीचे महत्त्वकेंद्र आणि महाराष्ट्रासह अनेक राज्याची ‘प्रेरणाभूमी’ नागपूर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय, दीक्षाभूमी, ताजुद्दीन बाबांचा दर्गा, रेल्वेस्थानक, आंतरराष्ट्रीय विमानतळ ही महत्त्वपूर्ण तेवढीच संवेदनशील स्थळे आहेत. यातील संघ मुख्यालय आणि रेल्वेस्थानक दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर असल्याचे जगजाहीर आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी तसेच उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अशा अतिमहत्त्वाच्या व्यक्ती नागपुरात वास्तव्याला असतात. शिवाय केंद्रातील मंत्री, विविध राज्यांचे मुख्यमंत्री आणि अन्य अतिमहत्त्वाच्या व्यक्तींची ‘प्रेरणाभूमी’त नेहमीच ये-जा असते.सुरक्षा यंत्रणाच खिळखिळीदहशतवादविरोधी पथकाच्या (एटीएस) स्थानिक शाखेची अवस्था फारच वाईट आहे. संघ मुख्यालयावर हल्ला झाल्यानंतर येथे एटीएसचे युनिट देण्यात आले. उपअधीक्षक दर्जाचा अधिकारी येथील प्रमुख राहील असे सांगण्यात आले होते. मात्र, प्रारंभापासूनच येथील युनिटला तो अधिकारी मिळाला नाही. ९ अधिकारी आणि ५५ कर्मचाऱ्यांचे संख्याबळ मंजूर असताना ६० टक्के संख्याबळावर सध्या एटीएसचे काम सुरू असल्याचे समजते. जे आहेत, त्यांच्याकडे अत्याधुनिक साधन सुविधा नाहीत. अत्याधुनिक हत्यारे, बुलेटप्रूफ जॅकेट नाहीत. या युनिटमध्ये स्वेच्छेने कोणता अधिकारी आल्याचे ऐकिवात नाही. जे येतात ते टाईमपास करतात. त्याचमुळे या युनिटकडून गेल्या सहा वर्षात कोणतीही उल्लेखनीय कामगिरी झालेली नाही. येथे पुरुषोत्तम चौधरी नामक अधिकारी असताना स्थानिक युनिटने अनेक चांगल्या कामगिरी बजावल्या होत्या. दिल्लीतील बाटला हाऊस चकमकीच्या आरोपींशी संबंध असलेल्या ताल्लाह आमिर या अभियंत्याला धावत्या ट्रेनमध्ये पकडण्याची कामगिरी चौधरी यांनी बजावली होती. मुंबईतील लोकल ट्रेनमधील स्फोटाच्या मालिकेचा मास्टर मार्इंड, त्याचा साथीदारही नागपुरात पकडला गेला होता. दंगली भडकावण्याच्या आरोपात एका परप्रांतीयालाही अटक करण्यात आली होती. त्यांच्यानंतर अशी कोणती महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली गेली नाही. गेल्या वर्षी बिहारमधील स्फोटाचा संशयित नागपुरात लपून होता. तो निघून गेल्यानंतर स्थानिक सुरक्षा व्यवस्थेला त्याची माहिती कळाल्याचे चर्चा सुरू झाली होती. हीच स्थिती नक्षलविरोधी अभियानाची (एएनओची) आहे. गडचिरोलीशी संबंध ठेवणारे नक्षलवादी समर्थक कोल्हापूर, पुण्या, मुंबईत पकडले जातात. स्थानिक युनिटला मात्र कुठेही काही सापडत नाही.