शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना घडले ते आश्चर्यकारक - देवेंद्र फडणवीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2017 15:22 IST

मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हॅलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हॅलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. रायगडमध्ये हॅलिकॉप्टर सुरु ठेवून बसण्यास सांगण्यात आले

मुंबई, दि. 26 - मागच्या दोन महिन्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोनवेळा हेलिकॉप्टर अपघातातून सुदैवाने बचावले. याविषयी बुधवारी राज्याच्या विधानपरिषदेत चर्चा झाली. त्यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगडमध्ये हेलिकॉप्टरमध्ये बसताना जे घडले त्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले. लोकमतनेच सर्वप्रथम यासंबंधीचे वृत्त प्रसिद्ध केले होते. 

हेलिकॉप्टर बंद झाल्यानंतर आपण उतरतो तसेच हेलिकॉप्टरमध्ये सर्व बसल्यानंतर उड्डाण घेण्याची प्रक्रिया सुरु होते. पण रायगडमध्ये हेलिकॉप्टर सुरु ठेवून बसण्यास सांगण्यात आले त्याचे आश्चर्य वाटते असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.  या प्रकरणाची डीजीसीएने नेमलेल्या तपास पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्वतंत्र समितीकडून तपास सुरु आहे. त्यामुळे लवकरच तथ्य समोर येईल असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

आज विधानपरिषदेचे विरोधीपक्षनेते धनंजय मुंडे यांनी याविषयी प्रश्न उपस्थित केले. त्यांनी सभापतींकडे या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली. राज्याच्या प्रमुखाच्या हेलिकॉप्टरबरोबर असे घडत असेल तर सखोल चौकशी होणे गरजेचे आहे असे मुंडे म्हणाले. 

काय घडले रायगडमध्ये सात जुलै रोजी मुख्यमंत्री अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यगृहाच्या उदघाटन सोहळा आटोपून डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास प्रारंभ केला. हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागण्याआधीच उपस्थित वरिष्ठ सुरक्षा रक्षक व पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना  बाजूला घेतल्याने ते थोडक्यात बचावले असल्याचे प्रत्यक्षदशीर्ने सांगितले.

लातुरात हेलिकॉप्टर कोसळले; मुख्यमंत्री बचावले!25 मे रोजी लातुरात मुख्यमंत्री आणि त्यांचा ताफा पाहण्यासाठी उत्सुकतेपोटी जमलेल्या प्रचंड गर्दीवर धूळ उडवत मुख्यमंत्र्यांचे हेलिकॉप्टर मुंबईच्या दिशेने झेपावले आणि काही क्षणात ते जवळच्याच झोपडपट्टीतील रस्त्यावर कोसळले होते. धुळीचे लोट असल्याने नेमके काय घडले ते कोणालाच कळले नाही... पायलट संजय कर्वे यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यासह सहा जण बालंबाल बचावले होते. या अपघातात पायलट कर्वे यांच्यासह इतर दोघे नागरिक किरकोळ जखमी झाले होते. निलंगा (जि. लातूर) येथील शिवाजी विद्यालयाच्या मैदानाजवळ सकाळी ११.४९ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला होता.