शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

आमचं ठरलं ! पण ठरलं काय ? हे गुपीत ठेवल्याने झाली भाजपची अडचण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2019 12:45 IST

काय ठरलं, हे गुपीत ठेवल्यानेच भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.  

मुंबई - विधानसभा निवडणुकीत एकमेकांच्या साथीत लढलेला भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांच्यातील वितुष्ट वाढलं आहे. त्यामुळे सरकार स्थापनेला विलंब होत असून राज्यात राष्ट्रपती राजवट लागली आहे. तर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत सरकार स्थापनेच्या हालचालींना सुरुवात केली आहे. युतीत ठरलेलं गुपीत वेळीच उघड न केल्यानेच अशी स्थिती निर्माण झालं आहे.  

युती करतेवेळी भाजप आणि शिवसेनेत आवश्यक ते सर्वकाही ठरल्याचे सांगण्यात येत होते. प्रत्येकवेळी शिवसेना नेते संजय राऊत, भाजपकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन हे देखील पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये ठरल्याचं सांगत होते. मात्र आता सत्तेचा 50-50 टक्केचा फॉर्म्युला भाजपने अमान्य केला आहे. 

विधानसभा निवडणुकीत युती असताना देखील भाजप आणि शिवसेनेकडून अनेक बंडखोर लढले होते. मात्र एका पक्षाला बहुमत मिळाले नसल्याने दोघांमध्ये बिनसल आहे. युती करताना सत्तेचं समसमान वाटप ठरलं होतं, असं शिवसेनेच्या वतीने सांगण्यात येत आहे. असा फॉर्म्युला सांगतानाचा देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडिओ देखील समोर आला आहे. तर भाजपने समसमान वाटप ठरलंच नव्हतं असा दावा केला आहे. 

दरम्यान दोन्ही पक्षातील नेत्यांकडून निवडणुकीच्या निकालापूर्वीपर्यंत सगळ व्यवस्थीत ठरल्याचं सांगण्यात येत होते. परंतु, आता ठरलेलं दोन्ही पक्षांकडून मान्य होत नाही. काय ठरलं, हे गुपीत ठेवल्यानेच भाजपची मोठी अडचण झाल्याचे चित्र आहे. वास्तविक पाहता भाजप राज्यात पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे.