शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
2
अर्चना तिवारी चतुर निघाली!ट्रेनमध्ये प्रेम, नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न; घरच्यांनी किडनॅपिंकची तक्रार केली पण निघाले वेगळेच
3
बेस्ट निवडणुकीतील दारुण पराभवावर ठाकरे गटाच्या पॅनेलची प्रतिक्रिया...; 'म्हणून हरलो...'
4
‘३० दिवसांहून अधिक काळ अटक झाल्यास पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना पद सोडावे लागणार’ शहांनी विधेयक मांडले, लोकसभेचे कामकाज तहकूब
5
"मी निर्दोष सिद्ध झालो नाही तोपर्यंत..."; राजीनामा दिला होता का म्हणणाऱ्या काँग्रेस खासदाराला अमित शहांचे प्रत्युत्तर
6
'ही' कंपनी देणार ८ बोनस शेअर्स; २८ ऑगस्ट आहे रेकॉर्ड डेट, शेअर खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या
7
Ganesh Festival 2025: गणेश मूर्ती विकत घेताना टाळा 'या' चुका; जाणून घ्या नियम!
8
Smallest Countries : जगातील सगळ्यात लहान ५ देश; दुसऱ्या क्रमांकाच्या देशात तर अवघ्या एका दिवसात फिरून होईल!
9
श्रावण शिवरात्रिला गुरुपुष्यामृत योग: ‘असे’ करा शिव-लक्ष्मी पूजन; वैभव-ऐश्वर्य-सुबत्ता लाभेल!
10
मुंबई महापालिकेत ठाकरे बंधूंना टक्कर देणार भाजपाचे 'जय-वीरू'; आशिष शेलारांनी डिवचलं, म्हणाले...
11
शेअर आहे की पैशांचं झाड...? ५ महिन्यांत २००%, तर आतापर्यंत दिलाय ५१३१२% चा छप्परफाड परतावा; गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
अमूल गर्ल कोण, एक नाही दोन? एवढ्या वर्षांनी सिक्रेट बाहेर आले, त्या प्रसिद्ध राजकीय नेत्याच्या सख्ख्या बहिणी...
13
उत्तर प्रदेशातील आणखी एका शहराचे नामांतर, नवे नाव असणार 'परशुरामपुरी'
14
बेस्ट निवडणूक २०२५: CM फडणवीसांची मदत, ठाकरेंचा पराभव; शशांक राव यांनी सांगितली Inside Story
15
ICC ODI Rankings : केशव महाराज नंबर वन बॉलर! बॅटरच्या यादीतून रोहित-विराटचं नाव 'गायब'; कारण...
16
Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
17
२२ रुपयांच्या 'या' शेअरचा ४२४०% परतावा! १ लाख रुपयांचे झाले तब्बल ४२.४० लाख; अजूनही संधी?
18
कोट्यधीश बनण्याचं स्वप्न असेल तर 'या' सरकारी स्कीमचा विचार करू शकता; मिळेल १ कोटींचा फंड
19
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
20
“राज्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार तातडीची मदत द्या, ओला दुष्काळ जाहीर करा”: सपकाळ

तुम्हाला काय फक्तगुजरातींनी मते दिली?

By admin | Updated: October 11, 2014 05:44 IST

देशभरातील जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी मते दिली. पण ते अजूनही गुजरातमध्येच असल्यासारखे वागताहेत.

मुंबई : देशभरातील जनतेने नरेंद्र मोदींना पंतप्रधान पदासाठी मते दिली. पण ते अजूनही गुजरातमध्येच असल्यासारखे वागताहेत. मोदींनी आता थोडं देशाकडे बघावं, असा टोला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लगावला. कृष्णकुंज या त्यांच्या निवासस्थानी निवडक पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला़ राज म्हणाले, तिकडे सीमेवर पाकिस्तानच्या गोळीबारीत आमचे जवान शहीद होत असताना पंतप्रधान प्रचार सभा घेत आहेत. नुकत्याच काही राज्यांत झालेल्या पोटनिवडणुकीत पराभव झाल्याने मोदी महाराष्ट्र आणि हरयाणामध्ये प्रचार सभा घेत असल्याचा आरोप राज यांनी केला. अच्छे दिनचे सर्वसामान्यांना सुखस्वप्न दाखवत मोदी केंद्रात सत्तेवर आले. मात्र, काँग्रेसच्या काळातही आमचे जवान शहीद होत होते आणि आता मोदींच्या काळातही! मग फरक कुठे पडला, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. गुजरातच्या मुख्यमंत्री आनंदीबाई पटेल यांची वक्तव्ये, मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनसारख्या घोषणांमुळे यांच्या हेतूबद्दल शंका घेण्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचे ते म्हणाले़ या संपूर्ण घडामोडी मुंबईला महाराष्ट्रापासून वेगळे करण्याच्या प्रयत्नाचा भाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला़ मात्र, कोणत्याही परिस्थिती मुंबई वेगळी होऊ देणार नसल्याचे राज यांनी ठणकावले़ युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी रात्रभर मॉल, रेस्टॉरंट चालू ठेवण्याची मागणी केली. यासंदर्भात विचारले असता मुंबई आंतरराष्ट्रीय शहर आहे. त्याला त्या नजरेतूनच बघायला हवं. मात्र, सुरक्षा व्यवस्थाच कोलमडल्याने रात्रभर मॉल, रेस्टॉरंट चालविण्या जोगी परिस्थिती नसल्याचे राज म्हणाले. (प्रतिनिधी)