शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

वेगळ्या विदर्भाबाबत मतदारांना काय सांगायचे?

By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST

स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती

अहेरी क्षेत्रात एक जागा : भाजपच्या घोषणापत्रातील कोलांटउडीने नाविसपुढे पेचगडचिरोली : स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती अडचणीत आली आहे. भाजपने विदर्भ राज्याची साथ सोडल्यामुळे आपण आता मतदारांना काय सांगायचे, हा प्रश्न नाविससमोर पडला आहे. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज हे स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या सबंध राजकीय आयुष्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही सोडली नाही. जांबुवंतराव धोटे, ब्रिजलाल बियाणी यांच्या समवेत विश्वेश्वरराव महाराजांनी अहेरी ते नागपूर असा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. विश्वेश्वररावांच्या निधनानंतर श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनीही सातत्याने विदर्भ राज्याचा पुरस्कार केला व विदर्भ राज्याच्या बाजुने राहणाऱ्या पक्षाचे समर्थन घेत त्यांनी अनेक निवडणुका लढल्या व जिंकल्या. त्यांच्या मृत्यूनंतर नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज यांनीही विदर्भाची मागणी लावूनच धरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपला विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाला गडचिरोलीसह विदर्भात प्रचंड यश लोकसभा निवडणुकीत मिळाले.नाग विदर्भ आंदोलन समितीला मानणारा मोठा वर्ग गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातही आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत गंभीर असल्याचे नाविसच्या लक्षात आल्यावर राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहेरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टी विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने वचन नाम्याच्या स्वरूपात दृष्टिपत्र जाहीर केले आहे. या दृष्टिपत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाग विदर्भ आंदोलन समिती समोरची अडचण वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विदर्भ व स्वतंत्र अहेरी जिल्हा हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे नाविसच्या केंद्रीय अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट केले होते. आता विदर्भाचा मुद्दा भाजपने गायब केल्याने नाविससमोरची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)