शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
2
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
3
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
4
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
5
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
6
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
7
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
8
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
9
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
10
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
11
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
12
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
13
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
14
Crime News : पुन्हा निळ्या ड्रमचे प्रकरण आले, बायको घरमालकाच्या प्रेमात पडली; पतीला संपवले अन्...
15
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन
16
२०१४ मध्येच भाजपा शिवसेनेला हात दाखवणार होती,पण...; प्रफुल्ल पटेलांचा १० वर्षांनी गौप्यस्फोट
17
Mumbai Rain: 'गो अराऊंड'चा मेसेज आणि 9 विमानांच्या मुंबई विमानतळावर बराच वेळ घिरट्या
18
'अलास्का' इथं डोनाल्ड ट्रम्पच्या भेटीला पोहचले डुप्लिकेट पुतिन; सोशल मीडियात चर्चांना उधाण, कारण...
19
सोहम बांदेकरचं 'ठरलं तर मग'! 'या' अभिनेत्रीसोबत बांधणार लग्नगाठ? होतोय अभिनंदनाचा वर्षाव
20
Asia Cup 2025 : गिलमुळे धोक्यात होतं तिलक वर्माचं स्थान; शेवटी BCCI निवडकर्त्यांनी असा काढला तोडगा

वेगळ्या विदर्भाबाबत मतदारांना काय सांगायचे?

By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST

स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती

अहेरी क्षेत्रात एक जागा : भाजपच्या घोषणापत्रातील कोलांटउडीने नाविसपुढे पेचगडचिरोली : स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती अडचणीत आली आहे. भाजपने विदर्भ राज्याची साथ सोडल्यामुळे आपण आता मतदारांना काय सांगायचे, हा प्रश्न नाविससमोर पडला आहे. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज हे स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या सबंध राजकीय आयुष्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही सोडली नाही. जांबुवंतराव धोटे, ब्रिजलाल बियाणी यांच्या समवेत विश्वेश्वरराव महाराजांनी अहेरी ते नागपूर असा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. विश्वेश्वररावांच्या निधनानंतर श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनीही सातत्याने विदर्भ राज्याचा पुरस्कार केला व विदर्भ राज्याच्या बाजुने राहणाऱ्या पक्षाचे समर्थन घेत त्यांनी अनेक निवडणुका लढल्या व जिंकल्या. त्यांच्या मृत्यूनंतर नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज यांनीही विदर्भाची मागणी लावूनच धरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपला विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाला गडचिरोलीसह विदर्भात प्रचंड यश लोकसभा निवडणुकीत मिळाले.नाग विदर्भ आंदोलन समितीला मानणारा मोठा वर्ग गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातही आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत गंभीर असल्याचे नाविसच्या लक्षात आल्यावर राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहेरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टी विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने वचन नाम्याच्या स्वरूपात दृष्टिपत्र जाहीर केले आहे. या दृष्टिपत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाग विदर्भ आंदोलन समिती समोरची अडचण वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विदर्भ व स्वतंत्र अहेरी जिल्हा हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे नाविसच्या केंद्रीय अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट केले होते. आता विदर्भाचा मुद्दा भाजपने गायब केल्याने नाविससमोरची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)