शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वेगळ्या विदर्भाबाबत मतदारांना काय सांगायचे?

By admin | Updated: October 12, 2014 01:16 IST

स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती

अहेरी क्षेत्रात एक जागा : भाजपच्या घोषणापत्रातील कोलांटउडीने नाविसपुढे पेचगडचिरोली : स्वतंत्र राज्यासाठी कटिबद्ध असल्याचा दावा करणाऱ्या भारतीय जनता पक्षाने निवडणुकीच्या निमित्ताने जारी केलेल्या दृष्टिपत्रातून स्वतंत्र विदर्भाच्या मुद्याला बगल दिल्यामुळे नाग विदर्भ आंदोलन समिती अडचणीत आली आहे. भाजपने विदर्भ राज्याची साथ सोडल्यामुळे आपण आता मतदारांना काय सांगायचे, हा प्रश्न नाविससमोर पडला आहे. श्रीमंत राजे विश्वेश्वरराव महाराज हे स्वतंत्र विदर्भ राज्याचे कट्टर पुरस्कर्ते होते. त्यांनी आपल्या सबंध राजकीय आयुष्यात स्वतंत्र विदर्भाची मागणी कधीही सोडली नाही. जांबुवंतराव धोटे, ब्रिजलाल बियाणी यांच्या समवेत विश्वेश्वरराव महाराजांनी अहेरी ते नागपूर असा स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी मोर्चाही काढला होता. विश्वेश्वररावांच्या निधनानंतर श्रीमंत राजे सत्यवानराव महाराज यांनीही सातत्याने विदर्भ राज्याचा पुरस्कार केला व विदर्भ राज्याच्या बाजुने राहणाऱ्या पक्षाचे समर्थन घेत त्यांनी अनेक निवडणुका लढल्या व जिंकल्या. त्यांच्या मृत्यूनंतर नाग विदर्भ आंदोलन समितीचे केंद्रीय अध्यक्ष अम्ब्रीशराव महाराज यांनीही विदर्भाची मागणी लावूनच धरली. लोकसभा निवडणुकीच्या काळात वर्धा येथे नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा झाली. त्यावेळी त्यांनी भाजपला विदर्भाच्या मुद्यावर समर्थन देण्याची भूमिका घेतली. भारतीय जनता पक्षाला गडचिरोलीसह विदर्भात प्रचंड यश लोकसभा निवडणुकीत मिळाले.नाग विदर्भ आंदोलन समितीला मानणारा मोठा वर्ग गडचिरोली जिल्ह्यात चंद्रपूर, नागपूर जिल्ह्यातही आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्ष स्वतंत्र विदर्भ राज्याबाबत गंभीर असल्याचे नाविसच्या लक्षात आल्यावर राजे अम्ब्रीशराव महाराज यांनी भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर अहेरी विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला. निवडणुकीच्या प्रचाराच्या पहिल्या टप्प्यापर्यंत भारतीय जनता पार्टी विदर्भाच्या मुद्यावर ठाम असल्याचे चित्र निर्माण झाले होते. मात्र भारतीय जनता पक्षाने वचन नाम्याच्या स्वरूपात दृष्टिपत्र जाहीर केले आहे. या दृष्टिपत्रात स्वतंत्र विदर्भ राज्याच्या मुद्याला बगल देण्यात आली आहे. त्यामुळे आता नाग विदर्भ आंदोलन समिती समोरची अडचण वाढण्याची शक्यता आहे. स्वतंत्र विदर्भ व स्वतंत्र अहेरी जिल्हा हाच आपला मुख्य अजेंडा असल्याचे नाविसच्या केंद्रीय अध्यक्षांनी लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळीच स्पष्ट केले होते. आता विदर्भाचा मुद्दा भाजपने गायब केल्याने नाविससमोरची परिस्थिती बिकट होण्याची शक्यता आहे. (जिल्हा प्रतिनिधी)