शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’वर बहिष्कार टाकून सेनेने काय मिळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:08 IST

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ तारखेला झाले. त्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते पण ते त्या दिवशी आले नाहीत. दुसºया दिवशी या परिषदेत उद्योग रत्न पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. तथापि, या समारंभालादेखील ठाकरे यांनी पाठ दाखविली. तीन दिवसांच्या परिषदेत शिवसेनेचा एकही आमदार, खासदार, मंत्री वा नेता या परिषदेकडे फिरकलादेखील नाही. अपवाद होता तो पक्षाचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा. उद्योग मंत्री असल्याने त्यांना परिषदेत राहणे भाग होते. त्यामुळे त्यांनी औपचारिकता निभावली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये देसाई आणि एकनाथ शिंदे यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मधील अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर पडेल, असे म्हटले जाते. राज्याचा भौगोलिक विचार करता या परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक गुंतवणूक ही मराठवाड्यात येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यापुढे मराठवाड्यावर विकासाचा फोकस असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचे पूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांना जाईल. लातूर रेल्वेकोच फॅक्टरीपासून हिंगोलीसारख्या उद्योगशून्य जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठीचे करार या परिषदेत झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या गुंतवणुकीचे श्रेय भाजपा घेईल, हे स्पष्ट आहे.मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्नमागासलेल्या विदर्भात भाजपाचे प्राबल्य आहे. मात्र, मागासलेल्या मराठवाड्यात भाजपाला तेवढे प्राबल्य मिळविता आलेले नाही. विधानसभेच्या ४६ जागांपैकी भाजपाचे सर्वाधिक १५ आमदार असले तरी शिवसेनेचे ११, काँग्रेसचे ९ आणि राष्ट्रवादीचे ८ आमदार आहेत. विदर्भासारखा मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रShiv Senaशिवसेना