शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
3
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
4
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
5
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
6
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
7
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
8
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
9
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
10
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
11
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
12
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
13
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
14
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
15
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
16
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
17
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
18
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
19
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
20
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....

‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’वर बहिष्कार टाकून सेनेने काय मिळविले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2018 06:08 IST

मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.

मुंबई : मॅग्नेटिक महाराष्ट्र परिषदेवर अघोषित बहिष्कार टाकून शिवसेनेने नेमके काय मिळविले याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या परिषदेच्या निमित्ताने येणार असलेल्या औद्योगिक गुंतवणुकीचा राजकीय फायदा भाजपाला मिळेल, असे मानले जात आहे.या परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १८ तारखेला झाले. त्याचे निमंत्रण शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिले होते पण ते त्या दिवशी आले नाहीत. दुसºया दिवशी या परिषदेत उद्योग रत्न पुरस्कारांचे वितरण मुख्यमंत्री फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार होते. तथापि, या समारंभालादेखील ठाकरे यांनी पाठ दाखविली. तीन दिवसांच्या परिषदेत शिवसेनेचा एकही आमदार, खासदार, मंत्री वा नेता या परिषदेकडे फिरकलादेखील नाही. अपवाद होता तो पक्षाचे नेते आणि उद्योग मंत्री सुभाष देसाई यांचा. उद्योग मंत्री असल्याने त्यांना परिषदेत राहणे भाग होते. त्यामुळे त्यांनी औपचारिकता निभावली. तसेच मुख्यमंत्र्यांच्या विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे प्रभावित झालेल्या शिवसेनेच्या मंत्र्यांमध्ये देसाई आणि एकनाथ शिंदे यांची नावे प्रामुख्याने घेतली जातात.उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’मधील अनुपस्थिती राजकीयदृष्ट्या मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावर पडेल, असे म्हटले जाते. राज्याचा भौगोलिक विचार करता या परिषदेच्या माध्यमातून सर्वाधिक गुंतवणूक ही मराठवाड्यात येणार असल्याचे सांगत मुख्यमंत्र्यांनी यापुढे मराठवाड्यावर विकासाचा फोकस असेल असे स्पष्ट संकेत दिले आहेत. मराठवाड्यात शिवसेनेची ताकद मोठी आहे. तेथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक आणण्याचे पूर्ण श्रेय मुख्यमंत्र्यांना जाईल. लातूर रेल्वेकोच फॅक्टरीपासून हिंगोलीसारख्या उद्योगशून्य जिल्ह्यात उद्योग आणण्यासाठीचे करार या परिषदेत झाले. लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत या गुंतवणुकीचे श्रेय भाजपा घेईल, हे स्पष्ट आहे.मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा प्रयत्नमागासलेल्या विदर्भात भाजपाचे प्राबल्य आहे. मात्र, मागासलेल्या मराठवाड्यात भाजपाला तेवढे प्राबल्य मिळविता आलेले नाही. विधानसभेच्या ४६ जागांपैकी भाजपाचे सर्वाधिक १५ आमदार असले तरी शिवसेनेचे ११, काँग्रेसचे ९ आणि राष्ट्रवादीचे ८ आमदार आहेत. विदर्भासारखा मराठवाड्यातही प्रभाव निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे.

टॅग्स :Magnetic Maharashtraमॅग्नेटिक महाराष्ट्रShiv Senaशिवसेना