शहरं
Join us  
Trending Stories
1
"तर मी फडणवीसांना या जन्मी माफ करणार नाही", अंजली दमानियांची पोस्ट, 'तो' फोटोही केला शेअर
2
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
3
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
4
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
5
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
6
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
7
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
8
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
9
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
10
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
11
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
12
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
13
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
14
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
15
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
16
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
17
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
18
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
19
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
20
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
Daily Top 2Weekly Top 5

आपण काय करू शकतो़

By admin | Updated: October 4, 2015 01:22 IST

जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती.

- सतीश रानडे (लेखक हे अर्थतज्ज्ञ आहेत.)जागतिक बँकेने केलेल्या व्यापारविषयक पाहणीचे निष्कर्ष काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाले. व्यापार-उद्योगविषयक ९८ सुधारणांची अंमलबजावणी करण्याबाबतची ही पाहणी होती. हे निष्कर्ष आपल्या भारतीयांना व महाराष्ट्राला भूषणावह नाहीत. १८९ देशांच्या क्रमवारीत आपला १२५ कोटी लोकसंख्या असलेला देश १४२ क्र मांकावर आहे. ११ कोटी लोकसंख्या असलेला आपला महाराष्ट्र देशात ३२ राज्यांमध्ये आठव्या क्रमांकावर आहे. अमेरिकेचे सकल राष्ट्रीय उत्पन्न १७ बि. डॉलर, चीनचे १0 बि. डॉलर तर भारताचे फक्त २ बि. डॉलर इतके आहे. महाराष्ट्राचे दरडोई वार्षिक सकल उत्पन्न अंदाजे फक्त दोन लाख रुपये आहे, ही विचार करायला लावणारी परिस्थिती आहे.आपला देश व आपले राज्य दुष्काळ, पायाभूत सुविधांचा अभाव, शिक्षणाची दुरवस्था, धार्मिक पगडा, अंधश्रद्धा, भ्रष्टाचार, राजकीय अनास्था, भोगवादाचा बेगडीपणा, वैयक्तिक शिस्तीचा अभाव, जातीव्यवस्था, विषमता, पर्यावरणाचा ऱ्हास अशा अनेक प्रकारच्या समस्यांमध्ये अडकून पडला आहे. मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद अशा काही मोजक्या शहरांत झालेले लोकसंख्येचे ध्रुवीकरण व तथाकथित समृद्धी ही प्रगती नसून सूज असल्याचे लक्षात येते. संस्कार, नीती वगैरेंची समृद्ध परंपरा असलेल्या आपल्या देशात स्वच्छतेसाठी पंतप्रधानांना पुढाकार घ्यावा लागतो. ही वैयक्तिक जबाबदारी व कर्तव्य नाही का? अशावेळी काही गोष्टी आपोआप घडतील, त्याची वाट दैववादी पद्धतीने बघत बसण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत: जबाबदारी घेऊन नवीन उद्यमशीलता अमलात आणण्याची गरज आहे. जमेची बाजू म्हणजे ४३ टक्के लोकसंख्या २0 ते ५0 या तरुण व क्रि याशील वयातील आहे. आपणा सर्वांना सर्व सुखसोयी हव्या आहेत, त्यासाठी काम मात्र आपल्यालाच करायला हवे. अनेक वर्षे नोकरी शोधत बसण्यापेक्षा नवीन उद्योग, कल्पनाशक्ती, जोखीम घेण्याची तयारी या गुणांचा वापर करून देशातच असलेल्या १२५ कोटी एवढ्या प्रचंड मागणीला पुरवता येईल अशी उत्पादने व सेवा निर्माण करण्याची संधी प्रत्येकाला आहे. परकीय कंपन्या येथे येऊन आपल्याकडील प्रचंड मागणीचा फायदा घेतात आणि आपण मात्र त्या कंपनीत नोकरी करण्यात धन्यता मानतो. विचार करा, भारताचा विकासदर ७.५ टक्के आहे, तर अमेरिकेचा ३.१ टक्के आहे. मग कुठे आहेत जास्त संधी व कोण त्याचा फायदा घेतंय? वेगवान बदलाची राजकीय इच्छाशक्ती जरी क्षीण असली तरी जास्तीत जास्त जनता त्यांच्या वैयक्तिक इच्छाशक्तीने चमत्कार घडवू शकते. केवळ सरकारवर अवलंबून राहण्यात कोणतेही शहाणपण नाही. गंमत पाहा की ३0 - ४0 वर्षांपूर्वीपर्यंत महाराष्ट्राची/भारताची औद्योगिक प्रगती इंजिनीअरिंग कॉलेजेस कमी असताना झाली. आज ज्या प्रमाणात इंजिनीअरिंग व इतर शैक्षणिक संस्था वाढल्या आहेत, त्या प्रमाणात औद्योगिक व आर्थिक प्रगती झाली आहे का?आपण सगळ््यांनी नवनवीन कल्पना, तंत्रज्ञान, धाडस, पारदर्शकता, उद्योगशीलता, सहकार्याची भावना अंगीकारून व्यक्ती व समाजाचा विकास घडविण्याची गरज आहे, त्यासाठी अमाप संधी उपलब्ध आहेत. चांगल्या, नैतिक व समाजोपयोगी कल्पनेला प्रत्यक्षात आणायला आज कोणत्याही साधनांची कमतरता नाही. गरज आहे ती सर्व क्षेत्रांत पुढाकार घेऊन व्यवसाय करण्याची जिद्द दाखविण्याची. आपल्याकडे काय नाही याचा पाढा वाचण्यापेक्षा, जे आहे त्याचा सर्वोत्तम वापर करून नवनिर्मिती करण्यातच आपले व देशाचे आर्थिक हित आहे.