शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

हीच का भाजपाची शिकवण

By admin | Updated: May 29, 2017 04:59 IST

केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अलीकडेच ‘पत्रकारांना जाड्याने मारेन,’ अशी उद्दाम भाषा केली, शिवाय पक्षानेच आपल्याला तशी शिकवण दिल्याचेही ते म्हणाले. कांबळे यांच्या विधानाने साधनसूचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला असून, याबाबत भाजपाने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करताना, चव्हाण म्हणाले की, ‘लोकशाहीत माध्यमांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि निर्णयावर टीका करण्याचा हा अधिकार आपल्या लोकशाहीनेच बहाल केला आहे. मात्र, भाजपा सरकारच्या काळात विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ ‘सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना देशद्रोही ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तर भाजपाचे मंत्री जाहीरपणे पत्रकारांना जोड्याने मारण्याच्या धमक्या देत आहेत, वर पक्षानेच तशी शिकवण दिल्याचे सांगत आहेत. भाजपा आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना हीच शिकवण देते का, याचा खुलासा करावा,’ असे खा. चव्हाण म्हणाले.मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराकेंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जनरल व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांबाबत अशीच भाषा वापरली होती. भाजपाचे नेते आणि मंत्री सरकारविरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या पत्रकारांना धमक्या देत आहेत. मात्र, त्यांच्यावर सरकार आणि पक्ष कुठलीही कारवाई करत नाही. त्यामुळे हे सर्व सरकारच्या मूक संमतीने सुरू आहे असे दिसते. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केला आहे. याच विधानसभेचे सदस्य आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे हे पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करत आहेत, हे दुर्दैवी असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली.