शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
2
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
5
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक इनिंग; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
6
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
7
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
8
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
11
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
12
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
13
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
14
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
15
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
16
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
17
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
18
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
19
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
20
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या

हीच का भाजपाची शिकवण

By admin | Updated: May 29, 2017 04:59 IST

केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अलीकडेच ‘पत्रकारांना जाड्याने मारेन,’ अशी उद्दाम भाषा केली, शिवाय पक्षानेच आपल्याला तशी शिकवण दिल्याचेही ते म्हणाले. कांबळे यांच्या विधानाने साधनसूचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला असून, याबाबत भाजपाने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करताना, चव्हाण म्हणाले की, ‘लोकशाहीत माध्यमांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि निर्णयावर टीका करण्याचा हा अधिकार आपल्या लोकशाहीनेच बहाल केला आहे. मात्र, भाजपा सरकारच्या काळात विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ ‘सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना देशद्रोही ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तर भाजपाचे मंत्री जाहीरपणे पत्रकारांना जोड्याने मारण्याच्या धमक्या देत आहेत, वर पक्षानेच तशी शिकवण दिल्याचे सांगत आहेत. भाजपा आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना हीच शिकवण देते का, याचा खुलासा करावा,’ असे खा. चव्हाण म्हणाले.मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराकेंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जनरल व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांबाबत अशीच भाषा वापरली होती. भाजपाचे नेते आणि मंत्री सरकारविरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या पत्रकारांना धमक्या देत आहेत. मात्र, त्यांच्यावर सरकार आणि पक्ष कुठलीही कारवाई करत नाही. त्यामुळे हे सर्व सरकारच्या मूक संमतीने सुरू आहे असे दिसते. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केला आहे. याच विधानसभेचे सदस्य आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे हे पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करत आहेत, हे दुर्दैवी असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली.