शहरं
Join us  
Trending Stories
1
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
2
Delhi Blast: आत्मघाती हल्ला करणाऱ्या उमर नबीला आश्रय देणारा सापडला, एनआयएने फरिदाबामध्ये केली अटक
3
धक्कादायक! बास्केटबॉलचा सराव करताना छातीवर पोल पडला; खेळाडूचा जागीच मृत्यू, व्हिडीओ व्हायरल
4
स्मृती मानधना की पलाश मुच्छल दोघांमध्ये कोण जास्त श्रीमंत? कमाईत कोण आघाडीवर जाणून घ्या
5
भाकरी खाता की नोटा? नांदेडचं लंडन झालेलं दिसलं नाही म्हणत शिरसाटांचा अशोक चव्हाणांवर थेट हल्ला
6
STचा शालेय विद्यार्थी-विद्यार्थीनींसाठी हेल्पलाइन क्रमांक सुरू: परिवहन मंत्री प्रताप सरनाईक
7
IND vs SA: "भारतानं अक्षरशः आमच्यासमोर लोटांगण..." द. आफ्रिकेच्या प्रशिक्षकाची जीभ घसरली!
8
पाकिस्तानने पुन्हा गरळ ओकली; श्रीराम मंदिराच्या धार्मिक ध्वजावरुन संयुक्त राष्ट्रांना केलं आवाहन
9
Swiggy, Zomato आणि ओला-उबर महागणार? नवीन कायद्यामुळे ग्राहकांना सोसावा लागणार भुर्दंड!
10
"मुंबईच्या बाबतीत काहीतरी डाव नक्कीच शिजतोय..."; राज ठाकरेंचे 'बॉम्बे' वादावर रोखठोक मत
11
Tata Sierra : २२ वर्षांनंतर 'लेजेंड इज बॅक'... Tata नं लाँच केली मोस्ट अवेटेड Sierra; कोणते मिळणार फीचर्स, किंमत किती?
12
इथिओपियातून दिल्लीत आली ज्वालामुखीची राख; तब्बल १२ वर्षांनंतर हेली गुब्बी ज्वालामुखीचा उद्रेक 
13
"…तर मी अनंत गर्जेच्या दोन कानाखाली लावल्या असत्या"; पंकजा मुंडेंनी गौरी पालवेंच्या आईवडिलांना काय सांगितलं?
14
मार्गशीर्ष गुरुवार २०२५: मार्गशीर्षातले ४ गुरुवार 'अशी' करा स्वामी उपासना; दुप्पट लाभ होईल!
15
Sheikh Hasina: नऊ किलो सोनं, महागड्या आणि मौल्यवान वस्तू; शेख हसीना यांच्या लॉकरमध्ये सापडलं मोठं घबाड!
16
'नॅशनल क्रश' गिरीजा ओकला येतायेत विचित्र मेसेज; म्हणाली, "मला रेट विचारला जात आहे..."
17
IND vs SA : टीम इंडियानं घरच्या मैदानात गुडघे टेकल्यावर नेटकऱ्यांना आठवला विराट; गंभीर होतोय ट्रोल
18
"प्रभू श्रीराम सगळ्यांचे... मी दलित म्हणून मला बोलवलं नाही"; अयोध्या खासदाराचा नाराजीचा सूर
19
तुमचा मेंदू बनतोय रीलचा ‘गुलाम’! स्मृती अन् मानसिक आरोग्यासाठी ठरतोय हानिकारक
20
Ahilyanagar: मॉर्निंग वॉकला गेलेल्या काँग्रेस जिल्हाध्यक्षाचे अपहरण करून बेदम मारहाण!
Daily Top 2Weekly Top 5

हीच का भाजपाची शिकवण

By admin | Updated: May 29, 2017 04:59 IST

केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : केंद्रात आणि राज्यात भाजपाचे सरकार आल्यापासून सरकारविरोधात बोलणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचे पद्धतशीर प्रयत्न सुरू आहेत. त्यातच सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी अलीकडेच ‘पत्रकारांना जाड्याने मारेन,’ अशी उद्दाम भाषा केली, शिवाय पक्षानेच आपल्याला तशी शिकवण दिल्याचेही ते म्हणाले. कांबळे यांच्या विधानाने साधनसूचितेच्या गप्पा मारणाऱ्या भाजपाचा खरा चेहरा उघड झाला असून, याबाबत भाजपाने खुलासा करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे.राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाचा निषेध करताना, चव्हाण म्हणाले की, ‘लोकशाहीत माध्यमांना सरकारला प्रश्न विचारण्याचा पूर्ण अधिकार आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणावर आणि निर्णयावर टीका करण्याचा हा अधिकार आपल्या लोकशाहीनेच बहाल केला आहे. मात्र, भाजपा सरकारच्या काळात विरोधी आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे.’ ‘सरकारच्या धोरणावर टीका करणाऱ्या सामाजिक संस्था, सामाजिक कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करणे, त्यांना देशद्रोही ठरवून त्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता तर भाजपाचे मंत्री जाहीरपणे पत्रकारांना जोड्याने मारण्याच्या धमक्या देत आहेत, वर पक्षानेच तशी शिकवण दिल्याचे सांगत आहेत. भाजपा आपल्या नेत्यांना आणि मंत्र्यांना हीच शिकवण देते का, याचा खुलासा करावा,’ असे खा. चव्हाण म्हणाले.मंत्रिमंडळातून हकालपट्टी कराकेंद्रीय मंत्री आणि भाजपा नेते जनरल व्ही. के. सिंग यांनी पत्रकारांबाबत अशीच भाषा वापरली होती. भाजपाचे नेते आणि मंत्री सरकारविरोधात लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या पत्रकारांना धमक्या देत आहेत. मात्र, त्यांच्यावर सरकार आणि पक्ष कुठलीही कारवाई करत नाही. त्यामुळे हे सर्व सरकारच्या मूक संमतीने सुरू आहे असे दिसते. पत्रकारांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेने एकमताने पत्रकार हल्लाविरोधी कायदा मंजूर केला आहे. याच विधानसभेचे सदस्य आणि राज्य मंत्रिमंडळातील मंत्री दिलीप कांबळे हे पत्रकारांना जोड्याने मारण्याची भाषा करत आहेत, हे दुर्दैवी असून, मुख्यमंत्र्यांनी तत्काळ मंत्रिमंडळातून त्यांची हकालपट्टी करावी, अशी मागणीही अशोक चव्हाण यांनी केली.