शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

अनौरस मूल अनुकंपा नोकरीस पात्र?

By admin | Updated: January 16, 2015 06:01 IST

सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का

मुंबई : सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का, हा कायद्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे फेरविचारासाठी परत पाठविला आहे.अमरावती महापालिकेतील एक लिपिक उकरडा पुंडलिकराव अठोर (आठवले) यांचे १८ जून १९९७ रोजी निधन झाल्यावर महापालिकेने त्यांचा अनौरस मुलगा सागर यास सप्टेंबर २०१२मध्ये अनुकंपा नोकरी दिली. सागरची विवाहित सावत्र बहीण विजया उकरडा अठोर (आठवले) हिने त्याविरुद्ध केलेली याचिका व फेरविचार अर्ज नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च व नोव्हेंबरमध्ये फेटाळले होते. त्याविरुद्ध विजयाने केलेले अपील मान्य करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. गापाळ गौडा व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील वादमुद्दा फेरविचारासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविला.दिवंगत उकरडा अठोर यांना शांताबाई व कुंताबाई अशा दोन पत्नी होत्या. त्यांना शांताबाईपासून विजया ही मुलगी तर कुंताबाईपासून सागर हा मुलगा झाला. उकरडा यांचे निधन झाले तेव्हा विजया १७ वर्षांची होती व इयत्ता १०वीत शिकत होती. विजया सज्ञान झाल्यावर तिला वडिलांच्या जागी अनुकंपा नोकरी द्यावी, असे अर्ज शांताबाई यांनी वर्र्ष १९९७ व ९८मध्ये महापालिकेकडे केले होते. परंतु त्यावर बरीच वर्षे काहीच निर्णय झाला नाही. दरम्यान २००९मध्ये विजयाचे लग्न झाले. अनौरस मुलगा सागर याने अनुकंपा नोकरीसाठी मे २००९मध्ये अर्ज केला. त्यास विजयाने आक्षेप घेतला. तरी त्यास गेल्या वर्षी फेब्रुवारीत नोकरी दिली गेली.उकरडा यांच्या निधनानंतर शांताबाई आणि विजया यांनी दिवाणी न्यायालयाकडून वारसा हक्काचा निवाडा घेतला. त्यानुसार उकरडा यांचे संपूर्ण पेन्शन शांताबार्इंना मिळाले. त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंडाचे पैसे शांताबाई, कुंताबाई, विजया व सागर यांना समसमान मिळाले होते. (विशेष प्रतिनिधी)