शहरं
Join us  
Trending Stories
1
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
2
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
3
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
4
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
5
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
6
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
7
"सगळे या..सगळे या...", मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
8
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
9
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
10
लेख: आता सीरियाचं 'लक्ष' महिलांच्या कपड्यांवर
11
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
12
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
13
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
14
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
15
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
16
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
17
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
18
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
19
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
20
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!

अनौरस मूल अनुकंपा नोकरीस पात्र?

By admin | Updated: January 16, 2015 06:01 IST

सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का

मुंबई : सरकारी कर्मचा-याचे सेवेत असताना निधन झाल्यावर त्याच्या अनौरस मुलास अनुकंपा तत्त्वावर नोकरी देता येते का, हा कायद्याचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडे फेरविचारासाठी परत पाठविला आहे.अमरावती महापालिकेतील एक लिपिक उकरडा पुंडलिकराव अठोर (आठवले) यांचे १८ जून १९९७ रोजी निधन झाल्यावर महापालिकेने त्यांचा अनौरस मुलगा सागर यास सप्टेंबर २०१२मध्ये अनुकंपा नोकरी दिली. सागरची विवाहित सावत्र बहीण विजया उकरडा अठोर (आठवले) हिने त्याविरुद्ध केलेली याचिका व फेरविचार अर्ज नागपूर खंडपीठाने गेल्या वर्षी मार्च व नोव्हेंबरमध्ये फेटाळले होते. त्याविरुद्ध विजयाने केलेले अपील मान्य करून सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. व्ही. गापाळ गौडा व न्या. आर. भानुमती यांच्या खंडपीठाने या प्रकरणातील वादमुद्दा फेरविचारासाठी उच्च न्यायालयाकडे परत पाठविला.दिवंगत उकरडा अठोर यांना शांताबाई व कुंताबाई अशा दोन पत्नी होत्या. त्यांना शांताबाईपासून विजया ही मुलगी तर कुंताबाईपासून सागर हा मुलगा झाला. उकरडा यांचे निधन झाले तेव्हा विजया १७ वर्षांची होती व इयत्ता १०वीत शिकत होती. विजया सज्ञान झाल्यावर तिला वडिलांच्या जागी अनुकंपा नोकरी द्यावी, असे अर्ज शांताबाई यांनी वर्र्ष १९९७ व ९८मध्ये महापालिकेकडे केले होते. परंतु त्यावर बरीच वर्षे काहीच निर्णय झाला नाही. दरम्यान २००९मध्ये विजयाचे लग्न झाले. अनौरस मुलगा सागर याने अनुकंपा नोकरीसाठी मे २००९मध्ये अर्ज केला. त्यास विजयाने आक्षेप घेतला. तरी त्यास गेल्या वर्षी फेब्रुवारीत नोकरी दिली गेली.उकरडा यांच्या निधनानंतर शांताबाई आणि विजया यांनी दिवाणी न्यायालयाकडून वारसा हक्काचा निवाडा घेतला. त्यानुसार उकरडा यांचे संपूर्ण पेन्शन शांताबार्इंना मिळाले. त्यांच्या प्रॉव्हिडन्ट फंडाचे पैसे शांताबाई, कुंताबाई, विजया व सागर यांना समसमान मिळाले होते. (विशेष प्रतिनिधी)