शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

आम्ही बोलून काय होणार बाबा ?

By admin | Updated: September 26, 2015 00:22 IST

रुद्रच्या आईचा प्रश्न : संपर्कच नसल्याचे स्पष्टिकरण

जत : रुद्रगोंडा आमच्याजवळ नाही. २००९ पासून त्याचा आणि आमचा संपर्कच नाही. त्यामुळे आम्ही त्याच्या वकीलपत्राबाबत बोलून काय उपयोग होणार बाबा?... असा सवाल केला रुद्रगोंडाची आई रत्नाक्का यांनी. थेट काराजनगीत त्यांना गाठल्यानंतर त्यांनी कन्नडमध्येच ही प्रतिक्रिया व्यक्त केली.कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणातील संशयित फरारी रुद्रगोंडा रेवगोंडा पाटील (वय ३२, रा. काराजनगी, ता. जत) याने न्यायालयात हजर व्हावे, त्याच्या मागे वकिलांची फौज उभी करू, असे ज्येष्ठ वकील व हिंदू विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव पुनाळेकर यांनी कोल्हापूर येथे बोलताना म्हटले आहे. यासंदर्भात रत्नाक्का यांच्याशी प्रत्यक्ष काराजनगी येथे जाऊन संपर्क साधला असता त्या बोलत होत्या. एखाद-दुसरा मराठी शब्द वापरत त्यांनी कन्नडमध्येच प्रतिक्रिया दिली.गोविंद पानसरे हत्या प्रकरणात रुद्रगोंडा याचा हात आहे, म्हणून पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात तुम्हाला काय माहिती आहे काय? असे त्यांना विचारले असता, त्या म्हणाल्या की, तो सांगली येथे शिक्षणासाठी गेला होता, एवढेच मला माहीत आहे. गोविंद पानसरे कोण आहेत, ते मला माहीत नाही. सनातन म्हणजे काय आहे, रुद्रगोंडा सनातनचा साधक होता किंवा नाही याबद्दलही माहिती नाही. मोलमजुरी, पशुपालन, शेती व्यवसाय यातून मिळणाऱ्या उत्पन्नातून आम्ही कसबसे घर चालवत आहोत. आम्ही जर थांबून राहिलो, तर आमचा पोटा-पाण्याचा प्रश्न बिकट होतो. आम्ही कोणाच्याही मदतीची अपेक्षा ठेवली नाही.रुद्रगोंडा याचे वडील रेवगोंडा आप्पासाहेब पाटील यांनी प्रसारमाध्यमांविषयी नाराजी व्यक्त केली. तुम्ही काय चालवले आहे, ते आम्हाला समजत नाही. आम्हाला आमचे दैनंदिन काम करू द्या. आमचे फोटो काढून तुम्ही काय करणार आहात, असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. त्यानंतर बैलजोडी घेऊन ते शेतात कामासाठी गेले. दरम्यान, रुद्रगोंडा याचे चुतले व ‘सतातन’चे साधक इरगोंडा पाटील व इतर नागरिकांनी समस्त राष्ट्रप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्यावतीने जतच्या तहसीलदारांना निवेदन देऊन कॉ. पानसरे खून प्रकरणाची नि:पक्षपातीपणे चौकशी करावी, अशी मागणी केली. यावेळी इरगोंडा पाटील म्हणाले की, मी कोठेही बेपत्ता अथवा गायब झालेलो नाही, मी जत शहरातच असून नियमित काम सुरू आहे. (वार्ताहर)सनातनवाल्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करा : आंबेडकरसांगली : देशात अनेक हिंदू अतिरेकी संघटना उभ्या राहिल्या आहेत. या देशातील हिंदू असुरक्षित आहेत का, याचे उत्तर संघटनांनी द्यावे, असे आव्हान देत कायद्याच्या चौकटीबाहेर असणाऱ्या सर्वच संघटनांवर बंदी घातली पाहिजे, असे रोखठोक मत भारिप-बहुजन महासंघाचे नेते माजी खासदार प्रकाश आंबेडकर यांनी शुक्रवारी सांगलीत पत्रकार बैठकीत व्यक्त केले. कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी ‘सनातन’वाल्यांचा संबंध उघड केला आहे. पोलीस त्यांचे कोम्बिंग आॅपरेशन का करीत नाहीत, असा सवालही त्यांनी केला. आंबेडकर म्हणाले की, देशातील हिंदू असुरक्षित असेल, तर अशा संघटनांचे कार्य समजू शकतो. पण पंतप्रधान, मुख्यमंत्री, लोकसभाध्यक्ष, मुख्य न्यायाधीश अशी कित्येक पदे अनेक वर्षांपासून हिंदूंकडेच आहेत. या हिंदूंमध्येच संघर्ष सुरू असल्याने अनेक संघटना तयार होत आहेत. हिंदंूविरोधात उठाव करणाऱ्यांना मारण्याचा त्यांचा उद्देश असेल, तर अशा संघटनांवर बंदी हाच एकमेव मार्ग आहे. ट्रेड युनियन, धर्मादाय संस्था, निवडणूक आयोग, कंपनी अ‍ॅक्टखाली नोंदविल्या जाणाऱ्या संघटनाच कायदेशीर आहेत. याबाहेरील सर्वच संघटनांना बंदी घातली पाहिजे. कॉ. पानसरे व त्यांच्या मारेकऱ्यांचे व्यक्तिगत भांडण नव्हते. पानसरे एका विचाराचे प्रतिनिधीत्व करीत होते. तो विचार सनातन्यांना चालत नाही. जे आपल्या विचाराचे नाहीत, त्यांना संपविण्याचा आदेश या संघटनांनी काही वर्षांपूर्वीच दिला आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी केवळ समीर गायकवाडभोवतीच तपास मर्यादित न ठेवता आपल्या कक्षा वाढविल्या पाहिजेत. पोलिसांनीच न्यायालयात गायकवाडचे संबंध कोणाशी आहेत, हे सांगितले आहे. महाराष्ट्रापेक्षा कर्नाटक पोलिसांनी या तपासात जादा प्रगती केली आहे. त्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी मर्यादित तपास केला तरी, कर्नाटक पोलीस थांबतील असे नाही. त्यासाठी राज्य पोलिसांनी आपल्या इभ्रतीसाठी राजकीय दबाव झुगारून सनातनवाल्यांचे कोम्बिंग आॅपरेशन करावे, अशी मागणीही आंबेडकर यांनी केली. (प्रतिनिधी)