शहरं
Join us  
Trending Stories
1
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
2
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
3
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
4
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
5
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
6
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
7
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
8
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
9
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!
10
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
11
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
12
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
13
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
14
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
15
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
16
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
17
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
18
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
19
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
20
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे

आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या मागणीचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:39 IST

सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरीही, युती होणार असल्याचे निश्चीत समजले जात आहे. मात्र आचारसंहिता लागायला काही तासांचा अवधी राहिला असताना सुद्धा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली सरसकट कर्ज माफीची मागणी अजूनही पूर्ण होऊ शकली नाही.

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांनतर आता सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'प्राण जाये पर वचन ना जाये' असं सांगत युती करताना शिवसेनेकडून कोणताही दगाफटका किंवा विश्वासघात होणार नाही' असं स्पष्ट वक्तव्य केले. त्यामुळे युती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

मात्र असे असले तरीही आपल्या प्रत्येक सभेत सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, तसेच  शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी घेतली होती.

मात्र आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे असताना सरसकट कर्ज माफीच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे युतीचं ठरलं पण आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या सरसकट कर्ज माफीच्या आश्वासनाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर निवडणुकीच्या काळात याच मुद्यावरून विरोधक भाजप-शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यास काही तासांचा काळ उरला असून, सरकार यावर काही निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.