शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

आदित्य ठाकरेंच्या सरसकट कर्ज माफीच्या मागणीचं काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 12:39 IST

सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मुंबई - विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेना या दोन्ही पक्षाने स्वबळावर निवडणूक लढवण्याची तयारी केली असली तरीही, युती होणार असल्याचे निश्चीत समजले जात आहे. मात्र आचारसंहिता लागायला काही तासांचा अवधी राहिला असताना सुद्धा युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलेली सरसकट कर्ज माफीची मागणी अजूनही पूर्ण होऊ शकली नाही.

विधानसभा निवडणुकीत युती कायम राहणार असल्याचे विधान काही दिवसांपूर्वी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले होते. त्यांनतर आता सोमवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'प्राण जाये पर वचन ना जाये' असं सांगत युती करताना शिवसेनेकडून कोणताही दगाफटका किंवा विश्वासघात होणार नाही' असं स्पष्ट वक्तव्य केले. त्यामुळे युती होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

मात्र असे असले तरीही आपल्या प्रत्येक सभेत सरसकट कर्जमाफी व्हावी ही शिवसेनेची शेवटपर्यंत मागणी असणार असल्याचे म्हणणाऱ्या आदित्यांच्या भूमिकेचं काय झालं असा प्रश्न उपस्थित होत आहे. सरसकट कर्ज माफी झालीच पाहिजे, तसेच  शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही अशी भूमिका जनआशीर्वाद यात्रेत आदित्य ठाकरे यांनी घेतली होती.

मात्र आता कोणत्याही क्षणी निवडणुका जाहीर होऊ शकतात, असे असताना सरसकट कर्ज माफीच्या कोणत्याही हालचाली होताना दिसत नाही. त्यामुळे युतीचं ठरलं पण आदित्य ठाकरे यांनी दिलेल्या सरसकट कर्ज माफीच्या आश्वासनाच काय असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर निवडणुकीच्या काळात याच मुद्यावरून विरोधक भाजप-शिवसेनेला घेरण्याचा प्रयत्न करू शकतात. त्यामुळे आचारसंहिता लागण्यास काही तासांचा काळ उरला असून, सरकार यावर काही निर्णय घेणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.