शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

बॅटरी चोरांमुळे रखडली पश्चिम रेल्वे

By admin | Updated: June 21, 2016 04:23 IST

मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील सततचे तांत्रिक बिघाड व त्यातून लोकल वाहतुकीला बसणारा फटका हा नित्याचा प्रकार झाला असताना सोमवारी माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून

मुंबई : मुंबईच्या तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवरील सततचे तांत्रिक बिघाड व त्यातून लोकल वाहतुकीला बसणारा फटका हा नित्याचा प्रकार झाला असताना सोमवारी माहीम स्थानकाजवळील विद्युत उपकेंद्रातून १८ बॅटरींची चोरी झाल्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. परिणामी तब्बल ६0 लोकल फेऱ्या रद्द झाल्याने आणि १00 गाड्यांना उशीर झाल्याने चाकरमान्यांना मनस्ताप सहन करावा लागला.सकाळी ११.१८ पासून दादर ते माहीम स्थानकांदरम्यान पाच मार्गांवर ओव्हरहेड वायरला वीजपुरवठा होत नव्हता. त्यामुळे या स्थानकांदरम्यान सर्व लोकल जागीच थांबल्या आणि त्यामागोमाग अनेक लोकलच्या रांगा लागल्या. ओव्हरहेड वायरचा वीजपुरवठा पावसाळ्यात अनेकदा काही सेकंद बंद (ट्रिपिंग) होत असतो. वीजपुरवठा बंद झाल्याने सर्किट ब्रेक स्वीच रिमोटने तो सुरू केला जातो, ज्यामुळे यंत्रणेला कोणताही धोका पोहोचू शकत नाही. तत्पूर्वी सर्किट ब्रेक स्वीच बंद करण्यासाठी जी वीज लागते ती उपकेंद्रातील बॅटरीतून वापरली जाते. सोमवारी सकाळी ओव्हरहेड वायरमधील वीजपुरवठा बंद झाल्यानंतर ही सर्व प्रक्रिया करण्यासाठी पश्चिम रेल्वेचे तांत्रिक कर्मचारी माहीमच्या उपकेंद्रात गेले असता मोठ्या क्षमतेच्या तब्बल १८ बॅटरी चोरीला गेल्याचे आढळले. रेल्वे बोर्डाला याचा अहवाल देण्यात येणार आहे. दुपारी १२.१३ पासून लोकल सेवा पूर्ववत झाली. (प्रतिनिधी)गर्दुल्ल्यांकडून चोरी?बॅटरीबरोबरच सहा केबलही चोरीला गेल्याचे समोर आले आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनंतर शाहूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गर्दुल्ल्यांनी ही चोरी केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दोन महिन्यांपूर्वीही ५७ बॅटरींची चोरीमाहीम येथील याच उपकेंद्रातून दोन महिन्यांपूर्वीही ५७ बॅटरी चोरील्या गेल्या होत्या. मात्र त्या बॅटरी छोट्या क्षमतेच्या होत्या. तरीही लोकल फेऱ्यांना त्याचा फटका बसला होता.