शहरं
Join us  
Trending Stories
1
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
2
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
3
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
4
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
5
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
6
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
7
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
8
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
9
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."
10
"वारकरी संप्रदायाची थट्टा चालविली... ऐका सुप्रिया ताई...!"; संत तुकाराम महाराजांचा अभंग सांगत भाजपचा हल्लाबोल
11
'अमेरिका रशियन तेल खरेदीची परवानगी देतो; हा ढोंगीपणा...' भारतीय कंपन्यांनी केली पोलखोल
12
हृदयद्रावक! पुरामुळे आयुष्य उद्ध्वस्त... घरं, दुकानं गेली वाहून; अन्नाचा, औषधांचा मोठा तुटवडा
13
दे दणादण! मेट्रोमध्ये एकमेकींच्या झिंज्या उपटल्या तरी गप्प नाही बसल्या, Video तुफान व्हायरल
14
बँक एफडीपेक्षा जास्त व्याज! पोस्ट ऑफिसची या योजनेत १ लाख रुपयांवर मिळेल २३,५०८ रुपयांचा नफा
15
येस बँकेच्या भागधारकांसाठी मोठी बातमी! जपानी बँक २५% पर्यंत हिस्सा खरेदी करणार, काय होणार बदल?
16
"पप्पांनी टॉप मॉडेल स्कॉर्पिओ दिली, तरी निक्कीला जाळलं..."; बहिणीचा धक्कादायक खुलासा
17
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
18
Bigg Boss 19: 'बिग बॉस १९'च्या ग्रँड प्रीमिअरला काही तास शिल्लक, शो कधी-कुठे पाहता येईल?
19
कधी करावी गणेश स्थापना, ज्येष्ठा गौरींचे पूजन कधी? जाणून घ्या मुहुर्त आणि इतर माहिती
20
ठरलं तर! बॉलिवूडमधील 'या' प्रसिद्ध गायकाची Bigg Boss 19 मध्ये एन्ट्री, वडिलांच्या कमेंटने वेधलं लक्ष

...तर पश्चिम महाराष्ट्राला पेट्रोलची गरज नाही

By admin | Updated: May 30, 2015 00:35 IST

नितीन गडकरी : सांगली-कोल्हापुरातून दहा जिल्ह्यांना इथेनॉलचा पुरवठा शक्य

सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. त्याचा उपयोग केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील वाहने इथेनॉलवर धावू लागतील व पेट्रोलची गरजच भासणार नाही. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत असून, लवकरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. येथील वालचंद अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. एस. भोईटे, प्राचार्य जी. व्ही. परिशवाड, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, आपल्याकडे ऊस उत्पादनाची अधिक क्षमता आहे. बहुतांश शेतकरी उसाची लागवड करतो. साहजिकच प्रतिवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होतो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तयार होणाऱ्या इथेनॉलचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना, तसेच कर्नाटकातील चार जिल्ह्यांना करणे सहज शक्य आहे. वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर केल्यास पेट्रोलची गरजच संपणार आहे. आर्थिक बचतही होणार आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन निदान प्राथमिक टप्प्यात एस.टी. आणि रिक्षा तरी इथेनॉलवर धावू लागतील, यादृष्टीने ठोस पावले टाकणे अपेक्षित आहे. केंद्र सरकार इथेनॉलच्या मुद्द्यावर गंभीर असून यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे देशात पर्यावरणपूरक ‘ई आॅटो रिक्षा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ते म्हणाले की, विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणहिताचे संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. उच्च शिक्षण घेतले की, ती व्यक्ती सर्वज्ञानी झाली, असे कोणाला वाटत असेल, तर तो समज चुकीचा आहे. महाराष्ट्राला संतांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. संतांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास, त्यातील कोणीच शिक्षित नव्हते. परंतु त्यांनी जे विचार समाजाला दिले, ते फार मोलाचे आहेत. खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पैसे कमावले पाहिजेतच पण...युवकांनी उच्चशिक्षण घेऊन भरपूर पैसे कमविले पाहिजेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्याचबरोबर मूल्याधिष्ठीत जीवनपध्दतीस प्राधान्य देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू न देता वाटचाल करावी. देशातील महाविद्यालयांत निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणाचा शिरकाव झाला असला तरीही, विद्यार्थ्यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता संशोधनावरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.