शहरं
Join us  
Trending Stories
1
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
2
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
3
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
4
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
5
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
6
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
7
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
8
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
9
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
10
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
11
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
12
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
13
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
14
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
15
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
16
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
17
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
18
अकोला महापालिका: भाजप-शिंदेंच्या शिवसेनेचं युतीबाबत निर्णय कधी? ठाकरेंची शिवसेना-मनसेची बोलणी सुरू
19
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
20
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
Daily Top 2Weekly Top 5

...तर पश्चिम महाराष्ट्राला पेट्रोलची गरज नाही

By admin | Updated: May 30, 2015 00:35 IST

नितीन गडकरी : सांगली-कोल्हापुरातून दहा जिल्ह्यांना इथेनॉलचा पुरवठा शक्य

सांगली : कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पर्यावरणपूरक इथेनॉलची निर्मिती होऊ शकते. त्याचा उपयोग केल्यास पश्चिम महाराष्ट्रातील वाहने इथेनॉलवर धावू लागतील व पेट्रोलची गरजच भासणार नाही. केंद्र सरकारतर्फे यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत असून, लवकरच त्यानुसार कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय रस्ते व वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी दिली. येथील वालचंद अभियांत्रिकी स्वायत्त महाविद्यालयाच्या पदवीदान समारंभात ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे अध्यक्ष अजित गुलाबचंद, शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु ए. एस. भोईटे, प्राचार्य जी. व्ही. परिशवाड, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते. गडकरी म्हणाले की, आपल्याकडे ऊस उत्पादनाची अधिक क्षमता आहे. बहुतांश शेतकरी उसाची लागवड करतो. साहजिकच प्रतिवर्षी अतिरिक्त उसाचा प्रश्न निर्माण होतो. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातून तयार होणाऱ्या इथेनॉलचा पुरवठा पश्चिम महाराष्ट्रातील सहा जिल्ह्यांना, तसेच कर्नाटकातील चार जिल्ह्यांना करणे सहज शक्य आहे. वाहनांमध्ये इथेनॉलचा वापर केल्यास पेट्रोलची गरजच संपणार आहे. आर्थिक बचतही होणार आहे. राज्य सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला पाहिजे. इथेनॉल निर्मितीला प्रोत्साहन देऊन निदान प्राथमिक टप्प्यात एस.टी. आणि रिक्षा तरी इथेनॉलवर धावू लागतील, यादृष्टीने ठोस पावले टाकणे अपेक्षित आहे. केंद्र सरकार इथेनॉलच्या मुद्द्यावर गंभीर असून यासंदर्भातील धोरणे तयार करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे देशात पर्यावरणपूरक ‘ई आॅटो रिक्षा प्रकल्प’ राबविण्यात येणार आहे. सरकारच्या माध्यमातून नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य वापर करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ते म्हणाले की, विविध विद्यापीठांनी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पर्यावरणहिताचे संशोधन करण्यावर भर दिला पाहिजे. उच्च शिक्षण घेतले की, ती व्यक्ती सर्वज्ञानी झाली, असे कोणाला वाटत असेल, तर तो समज चुकीचा आहे. महाराष्ट्राला संतांची गौरवशाली परंपरा लाभली आहे. संतांच्या चरित्राचा अभ्यास केल्यास, त्यातील कोणीच शिक्षित नव्हते. परंतु त्यांनी जे विचार समाजाला दिले, ते फार मोलाचे आहेत. खासदार संजय पाटील, आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, आ. शिवाजीराव नाईक, आ. विलासराव जगताप, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)पैसे कमावले पाहिजेतच पण...युवकांनी उच्चशिक्षण घेऊन भरपूर पैसे कमविले पाहिजेत, याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. त्याचबरोबर मूल्याधिष्ठीत जीवनपध्दतीस प्राधान्य देणाऱ्या भारतीय संस्कृतीचा विसर पडू न देता वाटचाल करावी. देशातील महाविद्यालयांत निवडणुकांच्या माध्यमातून राजकारणाचा शिरकाव झाला असला तरीही, विद्यार्थ्यांनी त्याकडे जास्त लक्ष न देता संशोधनावरच लक्ष केंद्रित करावे, असे आवाहनही गडकरी यांनी केले.