शहरं
Join us  
Trending Stories
1
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
2
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
3
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
4
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
5
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
6
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
7
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
8
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
9
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
10
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
11
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
12
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
13
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
14
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ
15
YouTube वरून पैसे कमवायचे आहेत? मग ‘या’ महत्त्वाच्या अटी पूर्ण करा, लगेच सुरू होईल कमाई!
16
शुबमन गिल प्लेईंग ११ बाहेर बसणार, संजू सॅमसनला संधी? भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी मोठा बदल होण्याची शक्यता...
17
भारत-पाकिस्तान सामन्याच्या दिवशीच एकनाथ शिंदेंचे X अकाऊंट हॅक; राजकीय वर्तुळात खळबळ
18
आधार कार्डबाबतची 'ही' चूक केल्यास १० वर्षांचा तुरुंगवास! यूआयडीएआयने जारी केले कठोर नियम
19
Viral Video : चीनला पोहोचलेल्या भारतीय व्यक्तीने दाखवलं असं काही की पाहणारेही झाले थक्क! तुम्हीही कमाल बघाच
20
चिंता वाढली! एलियन्स, AI आणि तिसरे महायुद्ध; बाबा वेंगाची 2026 वर्षाबद्दल भविष्यवाणी काय?

टोमॅटो गेला शंभरीपार

By admin | Updated: July 11, 2017 02:32 IST

शहरातील अनेक मोठ्या बाजारांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली असल्याचे पाहायला मिळत आहे.

अक्षय चोरगे। लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : घाऊक बाजारांमध्ये टोमॅटो ५० ते ६० रुपये किलोच्या दराने विकला जात असतानाच शहरातील अनेक मोठ्या बाजारांमध्ये टोमॅटोच्या दराने शंभरी पार केली असल्याचे पाहायला मिळत आहे. दोन-तीन आठवड्यांपूर्वी टोमॅटो २० ते ४० रुपये प्रतिकिलो दराने विकला जात होता. परंतु टोमॅटोच्या किमतीने शंभरी पार केल्याने गृहिणींसमोर नवा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक गृहिणींनी गेल्या दोन आठवड्यांत गरज असूनही कमी टोमॅटो खरेदी केला आहे. तर अनेक गृहिणींनी टोमॅटो खरेदी केलेच नाहीत. दरम्यान, किरकोळ व्यापाऱ्यांकडून ग्राहकांची लूट सुरू असून, वाढत्या महागाईत आता टॉमेटोचे वाढते दर ग्राहकांचे कंबरडे मोडणार आहेत.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती, वाशी येथे गेल्या आठवड्याभरापासून टोमॅटो भरून येणाऱ्या वाहनांची संंख्या कमी झाली आहे. त्यामुळे शहरात टोमॅटोचा पुरवठा कमी झाला असल्याचे वाशी येथील एपीएमसी मार्केटमधील घाऊक व्यापाऱ्यांनी सांगितले. राज्यातील अनेक जिल्ह्यांमधून येणारा माल गेल्या काही दिवसांपासून एपीएमसी मार्केटमध्ये आलेला नाही. जो माल सध्या विकला जात आहे, तो माल कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमधून येत आहे. याउलट राज्यातील टोमॅटो दिल्लीकडे निर्यात केला जात असल्याची माहिती मिळत आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती येथून ६० रुपये किमतीने टोमॅटोची खरेदी केली जाते. परंतु या मालामध्ये काही टोमॅटो निकृष्ट दर्जाचे निघतात. टोमॅटोचे वजन आम्ही तोलून मापून करत नाही. वजनापेक्षा थोडे जास्तच द्यावे लागते. वाहतुकीचा खर्च आहे. जागा भाडे आणि इतर खर्च असतोच. त्यामुळे टोमॅटो आणि इतर भाज्या जास्त किमतीने विकल्या जातात, असे चेंबूर येथील किरकोळ व्यापारी अप्पासे गावडे यांनी सांगितले.एपीएमसीमध्ये दररोज जवळपास ५५० ते ६०० वाहनांमधून भाजीपाला विक्रीसाठी येत असतो. त्यापैकी ६० ते ७० वाहने टोमॅटोची असतात. गेल्या काही दिवसांपासून या वाहनांची संख्या अर्ध्याहून कमी झाली आहे. मुंबई आणि नवी मुंबईकरांना दररोज ७०० ते ८०० टन टोमॅटोची गरज असते; परंतु सद्य:स्थितीमध्ये जेमतेम ३०० ते ३५० टन टोमॅटोची आवक होत आहे. परिणामी, टोमॅटोच्या किमती वाढल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.एपीएमसी मार्केटमध्ये सोमवारी टोमॅटो ४५ ते ६० रुपये किलोने विकला जात होता. घाऊक बाजारांमध्ये टोमॅटो ज्या किमतीने विकला जातो; त्यापेक्षा दुप्पट भावाने किरकोळ बाजारांमध्ये विकला जातो. शहरात त्यामुळेच टोमॅटोच्या किमतीने शंभरी गाठल्याचे घाऊक व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये ५० रुपये किलोने विकला जाणारा टोमॅटो ट्रान्सपोर्ट आणि इतर खर्च जोडून ६० ते ७० रुपये किलोने विकला पाहिजे. परंतु किरकोळ विक्रेते भाववाढीचा गैरफायदा घेऊन टोमॅटो १०० ते १२० रुपये किलोने विकत आहेत. किरकोळ विके्रत्यांवर शासनाने बंधने लादण्याची गरज आहे; तसे झाले नाही तर टोमॅटो आणि इतर भाज्यांचे भाव वाढतच राहतील.गेल्या काही दिवसांपाासून टोमॅटोची ५० टक्के आवक कमी झाली आहे. देशात टोमॅटोचे उत्पादन कमी होणे हेच त्यामागचे प्रमुख कारण आहे. कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश या राज्यांमधून येणारा माल खूपच कमी झाला आहे. महिन्याभरापूर्वी दररोज ८०० ते ९०० टन टोमॅटो एपीएमसीत येत होता. परंतु गेल्या काही दिवसांपासून ही आवक ३०० टन झाली आहे. शेतकरी संप आणि अनियमीत पाऊस यामुळे टोमॅटोचे भाव स्थिर होण्यासाठी एक महिना लागेल. - शंकर पिंगळे, घाऊक व्यापारी, माजी संचालक, मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती.>टोमॅटोचे घाऊक बाजारांतील दर (प्रति किलो)१ जून६ ते १४ रुपये १ जुलै३० ते ४५ रुपये २ जुलै३० ते ४८ रुपये३ जुलै३४ ते ४० रुपये४ जुलै३५ ते ४० रुपये५ जुलै४० ते ४५ रुपये६ जुलै४० ते ४५ रुपये७ जुलै४५ ते ५० रुपये८ जुलै४५ ते ५० रुपये९ जुलै५० जे ६० रुपये१० जुलै४५ ते ५५ रुपयेकिरकोळ बाजारांतील टोमॅटोचे दरकुर्ला१०० ते १२० रुपयेदादर१०० रुपयेमानखुर्द१२० ते १४० रुपयेवरळी१०० ते १२० रुपयेमशीद ८० ते १०० रुपये बोरीवली१२० रुपये