शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
3
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
4
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
5
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
6
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
7
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
8
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
9
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
10
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
11
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
12
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
13
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
14
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
15
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
16
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
17
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
18
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
19
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
20
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 

खैरबंदा जलाशयात पाणी सोडणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 00:12 IST

यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.

ठळक मुद्देविजय रहांगडाले : आढावा बैठकीत दिले निर्देश, शेतकऱ्यांना होणार मदत

लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : यावर्षी जुलै महिन्यात पावसाने दडी मारल्यामुळे खैरबंदा जलाशयाच्या लाभ क्षेत्रातंर्गत येणाऱ्या शेतकऱ्यांना पाण्याची गरज आहे. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेवून पिकांसाठी १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात पाणी सोडण्याचे निर्देश आ. विजय रहांगडाले यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना दिले.धापेवाडा टप्पा १ व टप्पा २ च्या कामाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी (दि.७) तिरोडा येथे आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीेला जि.प.सदस्या विमल नागपुरे, कैलाश पटले, उपसभापती मनोहर राऊत, पं.स.सदस्य हितेंद्र लिल्हारे, कृऊबास संचालक चतूरभूज बिसेन, डॉ. वसंत भगत, भाजप उपाध्यक्ष मनोहर बुध्दे, कार्यकारी अभियंता छप्परघरे, कार्यकारी अभियंता पृथ्वी फालके, उपअभियंता पंकज गेडाम, गायकवाड व लाभक्षेत्रांतर्गत येणाऱ्या गावातील सरपंच व भाजप पदाधिकारी उपस्थित होते. शेतकऱ्यांची बैठक बोलावून खैरबंदा जलाशयात सध्या स्थितीत ७.०० दलघमी पाणीसाठा असून त्याची टक्केवारी ४४ टक्के आहे. त्यांचा फायदा शेतकऱ्यांना सिंचनासाठी व्हावा, यासाठी खैरबंदा जलाशयात पाणीसाठ्याचे पूर्ण संचय करणे आवश्यक आहे. खैरबंदा जलाशयात धापेवाडा उपसा सिंचन योजना टप्पा क्रं. १ च्या खैरबंदा उर्ध्वनलिकाद्वारे वैनगंगा नदीचे पाणी उपसा करुन १० आॅगस्टपर्यंत खैरबंदा जलाशयात सोडण्याचे निर्देश दिले.धापेवाडा उपसा सिंचन टप्पा १ योजना ही शेतकऱ्यांसाठी लाभदायक आहे. सन १९९५ पासून या योजनेला पूर्णत्वाकडे नेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आ. रहांगडाले यांच्या कार्यकाळात धापेवाडा उपसा सिंचन टप्पा क्रं. १ पूर्णत्वास आली. या उपसा सिंचन योजनेचे पाणी खळबंदा जलाशयात सोडण्यासाठी १५ आॅगस्ट २०१७ ला यशस्वी चाचणी घेण्यात आली. परंतु उपसा सिंचनातील काही तांत्रीक बिघाडीमुळे चारही पंप सुरु नसल्यामुळे पूर्णपणे खैरबंदा जलाशयात पाणी भरता आले नाही. त्यामुळे त्वरीत पंप दुरुस्ती करण्याचे निर्देश आ.रहांगडाले यांनी दिले होते. त्यानंतर चारही पंप दुरुस्त करण्यात आले. त्यामुळे या योजनेचे पाणी खैरबंदा जलाशयात सोडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पाण्याचे योग्य नियोजन करुन पाणीपट्टीच्या दराबाबत सर्व ग्रामपंचायतीनी शेतकºयांना नोटीसद्वारे माहिती द्यावी. सर्व शेतकºयांनी वेळेवर पाणीपट्टी भरावी असे आ.रहांगडाले यांनी बैठकीत सांगितले.

 

टॅग्स :Damधरण