शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

स्पर्धा परीक्षा केंद्रांचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 04:57 IST

राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदींचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले असून त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.

पुणे - राज्यातील प्रत्येक जिल्हा स्तरावर स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करण्यासाठी ५० कोटी रुपयांची तरतूद अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी अर्थसंकल्पात केली आहे. या तरतुदींचे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांनी जोरदार स्वागत केले असून त्याची लवकर अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.राज्यात लाखो विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करीत असताना राज्य शासनाकडून या वर्षी राज्यसेवेच्या केवळ ६९ जागांची जाहिरात काढण्यात आली. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षांच्या जागांमध्ये वाढ करावी, यासह विविध मागण्यांसाठी विद्यार्थ्यांकडून राज्यभर मोर्चे काढण्यात आले. त्यांचा असंतोष कमी करण्यासाठी राज्य शासनाने जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.राज्याचा चौथा अर्थसंकल्प सादर करीत असताना मुनगंटीवार यांनी विद्यार्थी आणि शिक्षण यासाठी अनेक तरतुदी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना अल्पदरात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन उपलब्ध व्हावे, यूपीएससी परीक्षेमध्ये मराठी तरुणांचा टक्का वाढावा आदींसाठी या मार्गदर्शन केंद्राची मोठी मदत होणार आहे. स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांचा लोंढा पुण्यासह मोठ्या शहरांमध्ये येऊन धडकतो आहे. इथे अनेक अडचणींचा सामना करून त्यांना अभ्यास करावा लागतो. या पार्श्वभूमीवर त्यांना त्यांच्या जिल्ह्यामध्येच अभ्यास केंद्र उपलब्ध झाल्यास त्याचा मोठा फायदा होऊ शकेल.स्पर्धा परीक्षा केंद्रांच्या स्वरूपाची उत्सुकताशासनाकडून जिल्हास्तरावर उभारल्या जाणाºया स्पर्धा परीक्षा केंद्राचे नेमके स्वरूप कसे असेल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. यशदामध्ये दिल्या जाणाºया स्पर्धा परीक्षा केंद्राच्या धर्तीवर कोचिंग, अभ्यासिक, सुसज्ज गं्रथालय, विद्यावेतन आदींनी परिपूर्ण असे केंद्र उभारले जावे, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.‘राज्य शासनाकडे आम्ही ८ महिन्यांपूर्वी जिल्हास्तरावर स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्याची मागणी केली होती. त्याला शासनाने सकारात्मक प्रतिसाद देत त्याबाबतचा निर्णय घेतल्याने आम्ही त्याचे स्वागत करतो. अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अनेक अडचणींचा सामना करीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करतात. जिल्हास्तरावर हे केंद्र सुरू झाल्यानंतर त्यांना याचा मोठा फायदा होणार आहे.’’- महेश बढे, विद्यार्थी‘शासनाने अत्यंत चांगला निर्णय घेतला आहे. या निर्णयाचा गरीब विद्यार्थ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होऊ शकेल. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अभ्यास करणाºया विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत मिळेल.- कैलास शिंदे, विद्यार्थी

टॅग्स :examपरीक्षाMaharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८