शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आठवडी बाजार ठरतेय वरदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2016 00:51 IST

शेतकरी आठवडी बाजाराची बदलती संकल्पना बाणेर-बालेवाडी परिसरात उत्तम प्रकारे रुजू लागली

बालेवाडी : शेतकरी आठवडी बाजाराची बदलती संकल्पना बाणेर-बालेवाडी परिसरात उत्तम प्रकारे रुजू लागली असून, त्यानिमित्ताने शहरातल्या नागरिकांची, शेतकऱ्यांची आणि निसर्गाशी परत नाळ जुळू लागली आहे. हा आठवडी बाजार सुरू होऊन एक वर्ष पूर्ण झाले आहे. शहरी ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या फायद्यासाठी बालेवाडी येथे भरवल्या जात असलेल्या आठवडी बाजारांचा प्रतिसाद प्रचंड वाढत आहे. भाजीपाला आणि फळे पिकवणारा शेतकरी त्याचा माल जेव्हा घाऊक बाजारात घेऊन येतो, तेव्हा त्याच्या मालाला चांगला दर मिळत नाही आणि हाच भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरातील सर्वसामान्य ग्राहक जेव्हा बाजारात जातो, तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट कमी दरात मिळत नाही. ही परिस्थिती ओळखून शेतकरी व आपल्या भागातील ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा, असे काही तरी करण्याच्या विचाराने बाणेर-बालेवाडी येथील लहू बालवडकर यांनी आपल्या भागात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या सहकार्याने आठवडी बाजार सुरू करण्याचा निर्णय घेतला. आज शेतकरी अतिशय ताजा म्हणजे सकाळी शेतातून तोडलेला गुणवत्तापूर्ण व निवडक भाजीपाला दुपारी या बाजारांमध्ये घेऊन येतात. प्रत्येक आठवडी बाजारात सुमारे १३ ते १५ हजार नागरिक सहभागी होत असून सुमारे ६० शेतकरी गट, १० शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी यांच्यामार्फत भाजीपाल्याची थेट विक्री होते. ग्राहकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला कमी दरात उपलब्ध होतो.>भाजीपाला व फळे नियमनमुक्त करून शेतकऱ्यांना आपल्या मालाची थेट विक्री करण्याची मुभा देण्याच्या राज्य सरकारच्या विरोधात पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील किरकोळ व्यापाऱ्यांचा संप अद्याप न मिटल्याने ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मालाला बाजारपेठ मिळण्याच्या दृष्टिकोनातून आता बाणेर-बालेवाडी येथे रोज आठवडी बाजार भरविणार. - लहू बालवाडकर, संयोजक