शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

दौंड तालुक्यात आठवडेबाजाराची संभ्रमावस्था

By admin | Updated: June 8, 2017 01:15 IST

शेतमालाचे होणारे नुकसान पाहता ठिकठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमहाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या संपामुळे विविध ठिकाणी होत असलेली आंदोलने व त्यामध्ये शेतमालाचे होणारे नुकसान पाहता ठिकठिकाणी आठवडे बाजार बंद ठेवण्यात आल्याचे चित्र मागील काही दिवसांपासून पाहावयास मिळत आहेत. काही ठिकाणी स्वयंस्फूर्तीने बाजार बंद ठेवण्यात आले, तर काही ठिकाणी आंदोलकांनी बाजार बंद पाडले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असणारा असंतोष मोठ्या प्रमाणात उफाळून आला. दरम्यान, या संपामध्ये व्यापाऱ्यांसह सर्वच घटकाने आपला सहभाग नोंदवून या संपाला पाठिंबा दिल्यामुळे याचे रूपांतर एका संघर्षात झाले.ग्रामीण भागामध्ये परिस्थिती अजून पूर्णपणे पूर्वपदावर न आल्यामुळे यापुढील होऊ घातलेल्या बाजारबाबत नागरिकांच्या व व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम आहे. कुरकुंभ येथील आठवडे बाजार गुरुवारी भरत असतो व प्रामुख्याने मोठी आर्थिक उलाढाल असणारा हा बाजार आहे. मागील गुरुवारी सुरक्षिततेच्या कारणावरून बंद ठेवण्यात आला होता. दरम्यान, काही व्यापाऱ्यांनी संध्याकाळी दुकाने लावल्यामुळे काही काळ वातावरणात तणाव निर्माण झाला होता. त्यामध्ये शेतकऱ्यांनी व्यापाऱ्यांचा माल ग्राहकांना फुकटात वाटप करून संताप व्यक्त केला. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीने वातावरण निवळले होते.शेतकऱ्यांच्या संपाला जवळपास सात दिवस होत असून, त्यामुळे भाजीपाला व इतर शेतीमाल पूर्ण क्षमतेने ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. परिणामी वाढीव किमतीने उपलब्ध असणारा माल ग्राहकांना विकत घ्यावा लागत आहे.कुरकुंभ औद्योगिक क्षेत्रामुळे लोकसंख्येत झालेला प्रचंड बदल व वाढत्या नागरिकीकरणाने येथील सामाजिक परिस्थिती बदललेली आहे. छोटे छोटे उत्पन्न असणारे व्यापारी तसेच कामगार व सामान्य नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.>ग्रामपंचायत व पोलिसांच्या कार्यवाहीकडे लक्षशेतकऱ्यांच्या बंदला मागील गुरुवारी ग्रामपंचायतने स्वत:हून पुढाकार घेत शेतकरी व व्यापाऱ्यांच्या संघर्षात काही अनुचित प्रकार टाळण्यासाठी बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, या घटनेला जवळपास आठवडा उलटला असून, आज गुरुवारी काय परिस्थिती राहणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.>लोणीत आठवडाबाजार बंद पाळून निषेधआंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील लोणी येथील ग्रामस्थांनी आजचा तर धामणी येथील ग्रामस्थांनी सोमवारचा आठवडाबाजार बंद ठेवून आपला निषेध नोंदविला. पूर्व भागातील सर्वच गावांत आता संपाची तीव्रता जाणवू लागली आहे. आज लोणीतील बाजारतळावर शुकशुकाट होता. माजी सरपंच सावळेराम नाईक, उद्धवराव लंके, जगन लंके, हैबती आढाव, पिंटू पडवळ, तंटामुक्तीचे माजी अध्यक्ष सुरेश वाळूंज आदी ग्रामस्थांनी बाजारतळावर येऊन राज्य सरकारचा फलक लिहून निषेध केला.>अखेर बाजार झाला सुरूळीतमंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार आज सुरळीत झाला. १५०० डागांची आवक झाली आहे. फ्लॉ^वरची आवक सर्वाधिक झाली. सहा दिवसांपासून फ्लॉ^वर शेतात होती. तिची तोडणी करून आज बाजारात आणल्याने प्रतवारी ढासळून बाजारभाव कमी झाले. इतर शेतमालाला चांगला बाजारभाव मिळाला.शेतकरी संप सुरू झाल्यापासून मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यवहार सलग सहा दिवस बंद होते. शेतकरी त्यांचा माल विक्रीसाठी आणत नव्हते. व्यापारी हजर राहत असूनही शेतमाल येत नसल्याने बाजार समितीचे कामकाज ठप्प होते. सहा दिवसांत एकही पोते विक्रीसाठी आले नाही. त्यामुळे दिवसभर शुकशुकाट असायचा. संपामळे लाखो रूपयांची उलाढाल थंडावली. शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले.मंगळवारी व्यापार्यांनी चर्चा करून बुधवारी व्यवहार सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. आज बाजार समितीतील व्यवहार पुर्वीप्रमाणेच सुरू झाले. शेतकरी त्यांचा शेतमाल घेवून मोठया संख्येने आले होत. बाजार समितीच्या आवारात वाहनांची गर्दी झाली होती. इतर दिवसांपेक्षा आवक काहीशी कमी होती. १५०० डागांची आवक झाल्याची माहिती किरण शिंदे यांनी दिली. खरेदीदार आल्याने मालाची विक्री झाली. फ्ला^ॅवर पिक सहा दिवस शेतात राखुन ठेवावे लागले होते. ही फ्ला^ॅवर शेतकऱ्यांनी आज बाजारात आणल्याने प्रचंड आवक वाढली. फ्ला^वर चांगल्या प्रतीची नसल्याने तिचे बाजारभाव ढासळले गेले. इतर मालाला चांगला बाजारभाव मिळाला.मंचर शहरात किरकोळ पध्दतीने होणारी तरकारी, भाजीपाला विक्री पूर्णपणे बंद होती. त्यामुळे गृहीणींना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. भाजीपाला विक्रीची छोटी छोटी दुकाने पूर्णपणे बंद होती. त्यामुळे कडधान्यांचा वापर रोजच्या आहारात वाढला होता. >थेऊरचा आठवडेबाजार बंदशेतकरी संपाच्या सातव्या दिवशी आलेला थेऊर (ता. हवेली) येथील आठवडे बाजार संपास पाठिंबा म्हणून बंद ठेवण्यात आला. बाजार वगळता गावांतील सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरळीत चालू होते. परंतु, आठवडेबाजार न भरल्याने आठवडाभर भाजीसाठी काय करावयाचे? या प्रश्नाने गृहिनींना सतावल्याचे दृष्य परिसरात दिसत होते.थेऊर गावात दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. कर्जमाफीसाठी राज्यातील शेतकऱ्यांनी संप पुकारला आहे. या पार्श्वभूमीवर आठवडेबाजार आल्याने पाठिंबा म्हणून ग्रामपंचायत थेऊर व ग्रामस्थांनी केलेल्या आवाहनानुसार तो आज बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. या बाजारात भाजीपाला स्वस्त तोही ताजा मिळत असल्याने थेऊरसह कोलवडी, साष्टे, नायगाव, पेठ आदी गावांतून मोठ्या प्रमाणात आलेल्या नागरिकांची बुधवारी गर्दी होत असल्याने थेऊर गावाला यात्रेचे स्वरूप येते. परंतु, आज बाजार न भरल्याने खरेदीसाठी तुरळक प्रमाणात आलेल्यांना रिकाम्या हाताने घरी परतावे लागले.शेतकरी संप सुरू असल्याने अनेक शेतकऱ्यांनी आपला माल आणणे टाळले, तर संपकरी मालाची नासधूस करतील या भीतीने अनेक व्यापाऱ्यांनी न येणे पसंत केले.>आठवडे बाजारही भरला नाहीनिमोणे (ता. शिरूर) येथील आठवडे बाजारही आज शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमिवर भरला नाही. त्यामुळे या आंदोलनाची धग परिसरात कायम असल्याचे चित्र आहे.सध्या शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफी, शेतीमाल व दुधास रास्तभाव, वीजबिलात सवलत, खत व बी -बीयाणांच्या रास्त किंमती, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू व्हाव्यात इ. मागण्यांसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शेतकरी आंदोलने चालू आहेत. विविध पातळ्यांवर हे आंदोलन चालू आहे.१ जूनपासुन सुरू झालेल्या या आंदोलनामध्ये निमोणे ( ता. शिरूर ) येथील शेतकरी, दूधउत्पादक व दुकानदार अग्रभागी आहेत. १ जून रोजी शेतकऱ्यांनी पुकारलेल्या ‘महाराष्ट्र बंद’मध्ये येथील शेतकऱ्यांनी १०० टक्के सहभाग नोंदवला होता. यावेळी गावामधून कोणताही शेतीमाल बाहेर गेला नाही. तसेच दुधाचा एकही थेंब संकलित झाला नाही. सर्व शेतकरी या संपास सहभागी होऊन रस्त्यावर उतरला होता. पुणतांबा येथील मुख्यमंत्री व कोअर कमिटीचा कर्जमाफीचा निर्णय मान्य न नसल्याने ४ जून रोजी पुन्हा गाव बंद ठेवून कडकडीत बंद पाळण्यात आला होता. यावेळी सर्व व्यापारी व दुकानदार यांनाही या बंदला उत्स्फुर्तपणे पाठिंबा दिला होता. आज बुधवार दि. ७ रोजी होणाऱ्या आठवडे बाजाराकडे सर्व सामान्य लोकांचे लक्ष लागले होते. मात्र आजही सर्व शेतकऱ्यांनी बंदचे आवाहन केले. त्यानुसार आजचा आठवडे बाजार पूर्णत: बंद राहिला.