ऑनलाइन टीम
नाशिक, दि. १७ - नाशिक जिल्ह्यातील सर्व १४ बाजार समित्यांमध्ये बुधवारपासून पुन्हा कांद्याचा लिलाव सुरू होणार आहे. मंगळवारी नाशिकमधील कांदा व्यापा-यांच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. ‘लेव्ही’च्या मुद्यावरून लिलाव प्रक्रियेत सहभागी न होण्याचा निर्णय व्यापा-यांनी घेतल्यामुळे जिल्ह्यातील सर्व १४ बाजार समित्यांतील व्यवहार सोमवारी थंडावले होते. मंगळवारी झालेल्या बैठकीत कांद्याचा लिलाव पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. व्यापा-यांनी सरकारला निर्णय घेण्यासाठी १० जुलैपर्यंतची मुदत दिली असून त्यानंतर बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.
माथाडी कामगारांच्या लेव्हीमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्याचबरोबर हमाली आणि तोलाईचे दरही वाढविण्यात आले आहे. सोमवारपासून हे दर अंमलात येणार होते. त्यामुळे व्यापा-यांनी लिलावच न करण्याचा निर्णय घेतला होता.