शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

हवामान खात्याला महापालिकेच्या कानपिचक्या, आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करता येणे शक्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 23, 2017 02:26 IST

हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून, महापालिकेला मुंबईकरांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे.

मुंबई : हवामान खात्याने वर्तविलेले विशेषत: मान्सून काळातील अंदाज खोटे ठरत आहेत. यामुळे आपत्कालीन व्यवस्थापन यंत्रणेची धावपळ उडत असून, महापालिकेला मुंबईकरांच्या टीकेचे धनी व्हावे लागत आहे. अनेक वेळा अशी फजिती झाल्याने, पालिकेच्या उच्चपदस्थ समितीने अखेर हवामान खात्याला कानपिचक्या दिल्या आहेत. हवामानाचा अंदाज स्थळ, काळ आणि प्रमाण सापेक्ष असण्याबरोबरच, मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तविण्याची सूचना महापालिकेने केली आहे.मुंबईत २९ आॅगस्ट रोजी झालेल्या मुसळधार पावसाने, मुंबईत अनेक ठिकाणी पाणी तुंबले. शंकर लक्ष्मण मटकर मार्गावर तुंबलेल्या पाण्याचा निचरा होण्यासाठी मॅनहोल उघडण्यात आले होते. या मॅनहोलमध्ये पडून बॉम्बे हॉस्पिटलचे डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला.या प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन अतिरिक्त आयुक्त विजय सिंघल यांच्या समितीने, आपला अहवाल पालिका आयुक्त अजय मेहता यांना आज सादर केला. या अहवालात हवामान खात्यालाही पालिकेने सूचना केल्या आहेत.हवामान खात्याद्वारे वर्तविण्यात येणारे अंदाज हे अनेकदा परिमाणवाचक व क्षेत्र-तपशील त्यात नसते, तसेच ते ढोबळमानाने वर्तविलेले असल्याने, आपत्ती व्यवस्थापन पूर्वतयारी ही अनेक वेळा गरजेपेक्षा जास्त किंवा कधी कमी केली जाण्याचा धोका असतो. त्यामुळे हवामान खात्याने आपले अंदाज हे अधिक ‘स्थल-काल-प्रमाण’ सापेक्ष वर्तवावेत, ज्यामुळे याबाबत आवश्यक ती आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी योग्य प्रकारे करणे शक्य होईल, अशी सूचना या अहवालातून करण्यात आली आहे.अहवालात उल्लेख: हवामान खाते मुंबई व कोकणसाठी एकत्रित अंदाज वर्तविते. त्याऐवजी त्यांनी मुंबईसाठी वेगळा अंदाज वर्तवावा. मुंबईसाठी अंदाज वर्तविताना, त्यामध्येदेखील मुंबईतील ठिकाणे किंवा क्षेत्र निहाय अंदाज असल्यास, नागरिकांच्या सुरक्षिततेच्या व हिताच्या दृष्टिकोनातून योग्य ती उपाययोजना करणे शक्य होईल. या अंदाजामध्ये पावसाचे प्रमाण, कालावधी, तीव्रता याबाबत ठिकाणनिहाय वस्तुनिष्ठ अंदाज हवामान खात्याकडून मिळाल्यास, आपत्ती व्यवस्थापनविषयक पूर्वतयारी अधिक परिणामकारकपणे करता येऊ शकेल, असे या अहवालात म्हटले आहे.