शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

वेरूळला पकडला होता शस्त्रसाठा

By admin | Updated: July 29, 2016 01:13 IST

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळील बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात ९ मे २००६ रोजी अतिरेक्यांसह शस्त्र आणि आरडीएक्ससारख्या घातक

- विनोद काकडे,  औरंगाबाद

मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादजवळील बारा ज्योतिर्लिंगापैकी असलेल्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात ९ मे २००६ रोजी अतिरेक्यांसह शस्त्र आणि आरडीएक्ससारख्या घातक स्फोटकांचा साठा पोलिसांनी पकडला. या कारवाईमुळे आपले मोठे नेटवर्क नष्ट झाल्याने अन् महाराष्ट्र हादरविण्याचा डाव उधळल्यामुळे अतिरेकी संघटनांना जोरदार झटका बसला होता. त्याचबरोबर अतिरेक्यांची पाळेमुळे भारताच्या मध्यावर असलेल्या मराठवाड्यासारख्या भागात खोलवर रुजल्याचे या घटनेने स्पष्ट झाल्यामुळे भारतीय गुप्तचर संघटना, सुरक्षा यंत्रणांबरोबरच सर्वसामान्यांनाही या कारवाईचा जोरदार ‘हादरा’ बसला होता. हा ‘हादरा’ इतका जोरदार होता की, आज ‘त्या’ घटनेच्या दहा वर्षांनंतरही अतिरेकी संघटना मराठवाड्यात परत डोके वर काढण्याची हिंमत करू शकलेल्या नाहीत. वेरूळच्या घटनेनंतर दहशतवादविरोधी पथकाने मराठवाड्यातील अतिरेक्यांची सर्व पाळेमुळे खोदून काढली होती. एक दशकानंतर पुन्हा एकदा इसिसच्या माध्यमातून अतिरेकी पाळेमुळे मराठवाड्यात रुजविण्याचा काही कट्टरवाद्यांनी प्रारंभ केला आहे; परंतु नुकताच तोही प्रयत्न एटीएसने हाणून पाडला. सुदैवाने महाराष्ट्रावरील अरिष्ट टळलेवेरूळ शस्त्रसाठा प्रकरणात पोलिसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे सुदैवाने महाराष्ट्रावरील खूप मोठे अरिष्ट टळले होते. १२ मार्च ९३ मध्ये मुंबईत झालेल्या सर्वात मोठ्या साखळी बॉम्बस्फोटात अवघ्या २३ किलो ‘आरडीएक्स’चा वापर करण्यात आला होता. या आरडीएक्समुळे मुंबईत रक्ताचे पाट वाहिले होते.शेकडो जणांचा बळी गेला होता. अनेक जण जायबंदी झाले. कोट्यवधी रुपयांची मालमत्ता बेचिराख झाली होती. अवघ्या २३ किलो आरडीएक्सने तेव्हा हाहाकार माजविला होता.इकडे ९ ते १४ मे २००६ या कालावधीत वेरूळ व परिसरात अतिरेक्यांकडून जप्त करण्यात आलेले आरडीएक्स तब्बल ४३ किलो होते. शिवाय १४ एके-४७, हजारो काडतुसे, ५० हातबॉम्ब होते. हे अतिरेकी आणि शस्त्रसाठा पकडल्या गेला नसता तर राज्यात मोठा अनर्थ घडला असता. या ४३ किलो आरडीएक्समध्ये औरंगाबादसारखी एक- दोन शहरे सहजच बेचिराख झाली असती. एटीएस, स्थानिक पोलिसांच्या कामगिरीमुळे राज्यावरील एक मोठे बालंट टळले.अतिरेक्यांच्या शोधासाठी मोठी मोहीमवेरूळमध्ये घृष्णेश्वर मंदिरासमोर सुमो सोडून अंधारात पळालेल्या तीन अतिरेक्यांच्या शोधासाठी मोठी शोधमोहीम राबविण्यात आली. तेव्हा वेरूळजवळच मोहंमद आमेर (रा. औरंगाबाद) हा अतिरेकी एटीएसच्या हाती लागला. मुजफ्फर अहेमद व अब्दुल शकील या दोघांना औरंगाबाद शहराजवळ अटक करण्यात आली. घृष्णेश्वर मंदिराजवळ अतिरेक्यांनी सोडलेल्या सुमोमध्ये त्यांच्या जीपमध्ये तब्बल ३३ किलो आरडीएक्स, ११ एके-४७ व २५०० काडतुसे असा मोठा शस्त्रसाठा सापडला. त्यानंतर एटीएसने स्फोटकाने भरलेल्या बेपत्ता झालेल्या दोन्ही कारचा शोध सुरू केला. १२ मे रोजी येवला परिसरातील अंकाईच्या डोंगरात एटीएसला स्फोटकांनी भरलेली अतिरेक्यांची आणखी एक कार सापडली. त्यातही १० किलो आरडीएक्स, ५० हातबॉम्ब, १ एक-४७ व शेकडो काडतुस असा मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा होता. मग एटीएसने स्थानिक पोलिसांच्या मदतीने विविध ठिकाणी छापे मारून एकापाठोपाठ या प्रकरणात औरंगाबाद, बीड येथील एकूण २२ अतिरेक्यांना अटक केली होती. त्यातील काही अतिरेकी बांगला देशमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या तयारीत होते. त्यांना बांगला देशच्या सीमेवर अटक करण्यात आली होती. एक कार अद्यापही गायबया अतिरेक्यांनी दोन कार आणि एक जीप भरून आरडीएक्स, एके- ४७, काडतुसे असा शस्त्रसाठा आणलेला होता. त्यातील दोन वाहने एटीएसच्या हाती लागली. तिसरे वाहन अद्याप सापडलेले नाही, हे विशेष. त्यातही स्फोटके आणि शस्त्रांचा मोठा साठा होता. विशेष म्हणजे बेपत्ता कारमध्ये या शस्त्रसाठ्याचा मास्टर मार्इंट असलेल्या कुख्यात अतिरेकी जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू ्रजुंदाल होता, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.मा स्ट र मा र्इं ड अबू जुंदाल आणि फय्याज कागझीया शस्त्रसाठ्याचे मास्टरमार्इंड बीड येथील जबीउद्दीन अन्सारी ऊर्फ अबू जुंदाल व फय्याज कागझी असल्याचे तपासाअंती स्पष्ट झाले होते. हे दोघेही औरंगाबादेतून एटीएसच्या ताब्यातून निसटल्यानंतर बांगलादेश मार्गे पाकिस्तानात पसार झाले होते. २०१२ मध्ये अखेर सौदी अरेबियात अबू जुंदाल पकडल्या गेला. तेथून प्रत्यार्पण करून त्याला महाराष्ट्रात आणण्यात आले. फय्याज कागझीसह चौघे फरार; नईमने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरीया शस्त्रसाठा प्रकरणातील मास्टरमार्इंड असलेला बीडचा फय्याज कागझी अद्याप हाती लागलेला नाही. त्याच्यासह या प्रकरणातील नईम ऊर्फ नम्मू (रा. औरंगाबाद), एजाज शेख, मसूद शेख (बीड) हे फरार आहेत. ते पाक व्याप्त काश्मीरमध्ये असल्याचा अंदाज गुप्तचर विभागाचा आहे. त्यांना फरार घोषित करून ‘लूक आऊट’ नोटीसही जारी करण्यात आलेल्या आहेत. आरोपी नईम याला एटीएसने काही महिन्यांपूर्वी अटक केली होती. तपासासाठी त्याला पश्चिम बंगाल येथे नेले. त्यावेळी पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. अद्याप तो सापडलेला नाही.वेरूळ प्रकरणामुळे ‘एटीएस’चा विस्तार२००६ पर्यंत राज्यात एटीएस (दहशतवादविरोधी पथक)ची केवळ एकच शाखा होती. मुंबईतील एटीएसचे पथकच राज्यभरातील कारवाईवर लक्ष ठेवायचे; परंतु वेरूळ प्रकरणानंतर अतिरेक्यांची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले अन् एटीएसचा विस्तार करणे गरजेचे आहे, याची गृहखात्याला जाण आली. त्यानंतरच प्रत्येक जिल्ह्यात दहशतवादविरोधी सेल (एटीसी)ची स्थापना करण्यात आली.शिवाय औरंगाबाद, नांदेड, पुणे, नाशिक, नागपूर या मोठ्या शहरांमध्ये स्वतंत्र दहशतवादविरोधी पथके कार्यान्वित करण्यात आली.एटीएसच्या या विस्तारामुळे अतिरेकी कारवायांचा बीमोड करण्यास मोठी मदत होत आहे, हे विशेष.