शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

तुमच्या घरासमोर कार उभी करू, एकानेही टच केलं तर...; संतोष बांगर यांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2022 14:59 IST

हिंगोलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर जोरदार निशाणा साधला.

हिंगोली - बबन थोरातला पुरून उरू, आमच्या गाड्या तुमच्या घरासमोर आणून उभ्या करू. आमच्या गाडीला टच जरी करुन दाखवलं तर हाच संतोष बांगर शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिल्याशिवाय राहणार नाही अशा शब्दात कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांनी शिवसेना संपर्कप्रमुख बबन थोरात यांच्या आव्हानाला प्रतिआव्हान दिले आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर शिवसेनेचे तब्बल ४० आमदार आणि १२ खासदार शिंदे गटात सहभागी झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या गटात सर्वात शेवटी सहभागी होणारे हिंगोलीचे आमदार संतोष बांगर यांचा समावेश आहे. बांगर यांनी विधानसभेत अध्यक्षपदावेळी शिवसेनेच्या बाजूने मतदान केले. परंतु विश्वासदर्शक ठरावावेळी बांगर थेट शिंदे गटात सहभागी झाल्याने सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. विधानसभेच्या आमदारांपाठोपाठ शिवसेनेचे १२ खासदारही एकनाथ शिंदे गटात सहभागी झाले. त्यात हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील यांचाही समावेश होता. 

हिंगोलीत शिवसैनिकांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी संपर्कप्रमुख बबन थोरात यांनी बंडखोर आमदार-खासदारांवर जोरदार निशाणा साधला. बबन थोरात म्हणाले की, ज्यांच्या कार्यक्षेत्रात गद्दारांची गाडी येईल. आणि पहिली गाडी जो फोडेल त्याचा बहुमान उद्धव ठाकरेंच्या हस्ते मातोश्रीवर केला जाईल. भामट्यांना रोखण्यासाठी पुन्हा एकदा बाळासाहेबांच्या नावाचा जयघोष करावा लागेल अशा शब्दात थोरात यांनी बंडखोरांवर टीकास्त्र सोडलं. 

अलीकडेच हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरीचे शिवसेना आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांना उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला आहे. बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरुन हटवण्यात आलं आहे. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हाध्यक्ष पदावून हटवण्यात आले आहे. संतोष बांगर यांनी बंडाच्या सुरुवातीच्या दिवसांत बंडखोर आमदारांवर जोरदार टीका केली होती.

बांगर म्हणाले होते की, स्वाभिमानाने जगा, असा सल्ला बंडखोर आमदारांना दिला. तर बंडखोरांचे काही चांगले होणार नाही. त्यांना नागरिक रस्त्याने फिरू देणार नाहीत. त्यांच्यावर सडके टमाटे, अंडे फेकतील. त्यांच्या तोंडाला काळे लावतील, असेही ते जोशात बोलण्याच्या ओघात बोलून गेले. एवढेच नव्हे, तर बंडखोरांच्या बायकासुद्धा त्यांना सोडून जातील. त्यांच्या लेकरांना कोणी मुली देणार नाही. ते मुंजे राहतील, असेही म्हटले होते.  

टॅग्स :Shiv Senaशिवसेना