शहरं
Join us  
Trending Stories
1
Porsche Car Accident: 'बाळा'च्या ब्लड सँपलची ससून रुग्णालयात अदलाबदल; ते खासगी इसम कोण?
2
नार्को टेस्ट करण्याची मागणी; दमानियांचे आव्हान अजित पवारांनी स्वीकारले, मात्र ठेवली 'ही' एक अट!
3
सांगवीत भररस्त्यात गोळ्या झाडून रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा खून 
4
27 हजार किलो स्फोटकांचा वापर; अवघ्या 6 महिन्यात मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनचा बोगदा तयार
5
सुसंस्कृत घरातल्या स्त्रियांबाबत ही भाषा?; राष्ट्रवादीच्या नेत्याच्या वक्तव्याने दमानियांचा संताप, अजितदादांना म्हणाल्या...
6
Pune Porsche case: ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. विनायक काळेंना पाठवले तत्काळ सक्तीच्या रजेवर
7
९३० लोकल फेऱ्या रद्द, प्रवाशांचे अतोनात हाल होणार; ३ दिवस जम्बो ब्लॉक
8
"कोण आहेत मणिशंकर अय्यर, आमचा संबंध नाही", 'त्या' वक्तव्यामुळे काँग्रेसने हात झटकले...
9
सोशल मीडियावर रंगला नवा वाद; 'All Eyes on Rafah' आहे तरी काय? जाणून घ्या...
10
"तब्येत बरी नसती तर…’’ पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दाव्याला नवीन पटनाईक यांनी दिलं असं प्रत्युत्तर
11
आला रे आला! पुढील २४ तासात मान्सूनची एन्ट्री; कोणत्या राज्यात कधी पाऊस कोसळणार?
12
मनातून मनुस्मृती जाळणं गरजेचं; 'ती' चूक होताच प्रकाश आंबेडकर आव्हाडांवर संतापले!
13
T20 World Cup च्या तोंडावर ICC कडून पाकिस्तानी खेळाडूंना खुशखबर; 'सूर्या'चा दबदबा कायम
14
रतन टाटांचा एक आदेश अन् 'ताज हॉटेल'मध्ये भटका कुत्रा निवांत झोप घेतो तेव्हा...
15
तिसऱ्यांदा सरकार आलं तर सर्वात पहिले कोणत्या देशात जाणार PM मोदी? परराष्ट्र मंत्रालय सेट करतंय कार्यक्रम
16
Fact Check: पाकिस्तानला ५ हजार कोटींचे कर्ज देण्याची घोषणा राहुल गांधींनी केलेलीच नाही; 'तो' मेसेज खोटा
17
₹3 चा स्टॉक असलेली कंपनी 20 फ्री शेअर वाटणार, गुंतवणूकदारांना मालामाल करणार! LIC कडे 97 लाख शेअर
18
आतापर्यंतचे सर्व ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणारे २ शिलेदार; रोहितचा 'नाना' विक्रमांवर डोळा!
19
‘’एका वर्षात नवीन पटनाईक यांची तब्येत एवढी कशी बिघडली, काही कट आहे का?’’, मोदींनी व्यक्त केली शंका
20
IndiGo कडून आता महिला प्रवाशांना फ्लाइट बुकिंगदरम्यान मिळणार खास सुविधा

आम्ही मराठवाड्याला सुजलाम् सुफलाम् करणार - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2017 12:20 PM

गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील 40 लाख लोकांना लाभ मिळाला..

औरंगाबाद, दि. 17 :  गेल्या तीन वर्षात सरकारने मराठवाड्यात विशेष लक्ष दिलं आहे. यामध्ये अन्नसुरक्षा योजनेत मराठवाड्यातील 40 लाख लोकांना लाभ मिळाला, सिंचानाचा प्रश्न सोडवण्यासाठी धरणांची कामे केली तसेच जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून साडेचार लाख हेक्टर शेतीला पाणी मिळाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मराठवाड्यातील पाण्याची समस्या कायमची दूर करण्यासाठी राज्य सरकारने योग्य ते नियोजन केलं आहे. यासाठी दमणगंगा-पिंजाळच्या माध्यमातून मराठवाड्याला 50 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणायचं आहे. यासाठी मान्यता दिली असून लवकरच एमओयूच्या माध्यमातून केंद्राकडे योजना जाईल व त्यानंतर कॅबिनेटमध्ये मंजूर होईल. आम्ही मराठवाड्याला सुजलाम सुफलाम करणार असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.सिद्धार्थ उद्यानातील स्मृतिस्तंभाच्या प्रांगणात झालेल्‍या या कार्यक्रमप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी हुतात्मा स्मृतिस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. मुक्तिसंग्रामातील हुतात्म्यांना अभिवादन केले. मुक्ती संग्रामातील शहिदांना मानवंदना दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहणही करण्यात आले.भारतमाता 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाली. पण भारतमातेचे काही पूत्र मात्र पारतंत्र्यात होते. त्यापैकी एक मराठवाडा. मराठवाड्याला स्वातंत्र्य मिळवून देणे त्याकाळात मोठे आव्हान होते. मराठवाड्यातील वीरांनी मोठा संघर्ष केला. सरदार वल्लभभाई पटेल यांच्या नेतृत्त्वाखाली मराठवाडा निजामाच्या जोखडातून मुक्त झाला. थोर वीरांमुळेच आज आपण स्वतंत्र अनुभवतो असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.