शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

आम्हालाही न्याय हवाय... पीडित पुरुषांची मागणी

By admin | Updated: May 15, 2017 06:47 IST

नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही...

नम्रता फडणीस। लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : नवरा काय तर फिरायलाच नेत नाही... तो माझे ऐकतच नाही... मला तुझ्या आईवडिलांबरोबर राहायचे नाही... आपण वेगळे राहू...अशा अनेक छोट्या-मोठ्या कुरबुरी सगळ्याच घरात ऐकायला मिळतात, मात्र काही महिला हे वाद इतके विकोपाला नेतात की कौटुंबिक हिंसाचार कायद्याअंतर्गत सरळ तक्रारी करून पतीसह त्याच्या कुटुंबीयांना न्यायालयात खेचतात. समाजात महिलांच्या त्रासाला बळी पडणाऱ्या पुरुषांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, त्यांचेही म्हणणे पोलिसांनी ऐकून घ्यायला हवे, या त्यांच्या म्हणण्याकडेही दुर्लक्ष केलं जातेयं; म्हणून आता पुरुषांना हवाय महिलांप्रमाणेच स्वतंत्र कायदा! चित्रपट निर्माते अतुल तापकीर यांच्या म्हणण्यानुसार त्यांनी पत्नीच्या जाचाला कंटाळून आपली जीवनयात्रा संपवली. काही दिवसांपूर्वी पुण्यात किरण पाटील या एका उच्चशिक्षिताने आपल्या मुलीसह आत्महत्येचा मार्ग स्वीकारला, त्यांच्या पत्नीने देखील त्यांच्यासह कुटुंबीयांविरूद्ध न्यायालयात केस दाखल केली होती़ मागील महिन्यात सलील नाईक यानेही याच कारणास्तव आत्महत्येला जवळ केले. खरंच त्यांचे काय चुकले होते? आज समाजात असे अनेक पुरुष आहेत जे पत्नीने कौटुंबीक हिंसाचार कायद्यांतर्गत केलेल्या खोट्या तक्रारींचे शिकार ठरलेले आहेत. त्यामुळे पत्नीकडून पुरुषांच्या केलेल्या छळाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.वाढदिवसाला नवऱ्याने बायकोला फोन केला नाही, तिच्या मनासारखे तो वागत नाही, मग चढा पोलिसांची पायरी. या गोष्टींमुळे पत्नीकडून पतीला विनाकारण त्रास दिला जात आहे. मानसिक त्रास सहन न झाल्यामुळे समुपदेशकांकडे किंवा कोर्टातही पुरुष आसवांना वाट मोकळी करून देतो. शेवटी आत्महत्येशिवाय त्यांना गत्यंतर उरत नाही, ही वस्तुस्थिती आहे. पुरुषांचीही एक बाजू असते ती पोलिसांनी ऐकून घेतली पाहिजे. सगळेच पुरुष सारखे नसतात, याकडे पुरुष हक्क संरक्षण समितीने लक्ष वेधले आहे.