शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
2
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
3
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
4
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
5
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
6
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
7
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
8
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
9
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
10
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
11
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
12
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
13
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
14
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
15
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
16
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
17
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
18
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
19
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
20
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...

अन्य राज्यांमधून ५०० टन ऑक्सिजन पुरवठा पाहिजे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2021 05:52 IST

आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात सध्या १,२५० मेट्रिक टन ऑक्सिजन उत्पादीत होत असून, परराज्यातून सुमारे ३०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जात आहे. सध्याची वाढती मागणी लक्षात घेता अन्य राज्यांमधून सुमारे ५०० मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा केला जावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे करण्यात येत असल्याचे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी येथे सांगितले.

टोपे आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे पत्रकार परिषदेत म्हणाले की, राज्यात सध्या ६ लाख ८५ हजार सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील सुमारे १५ टक्के रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासू शकते, असा अंदाज आहे. राज्यात तयार होणारा १,२५० मे. टन ऑक्सिजन पूर्णपणे वैद्यकीय कारणासाठी वापरला जातो.  जामनगर, भिलाई आणि भिल्लारी येथून सुमारे ३०० मे. टन ऑक्सिजन पुरवठा महाराष्ट्राला केला जात आहे. त्यात वाढ करून ५०० मे. टन ऑक्सिजन पुरविण्याची मागणी केंद्र शासनाकडे करण्यात आली आहे.

मुख्यमंत्र्यांनीही केली चर्चामुख्यमंत्र्यांनी रेमडेसिविर उत्पादकांबरोबर चर्चा केली. त्यांनी सांगितले की, आम्हाला गरजेप्रमाणे, ६० हजार रेमडेसिविर दिले पाहिजे.

राज्यात १,५५० मे. टन ऑक्सिजनचा वापरnराज्यात अशा पद्धतीने एकूण १,५५० मे. टन ऑक्सिजनचा वापर केला जात आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग आणि संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली त्याचे वाटप केले जाते.nराज्यात सहा ठिकाणे अशी आहेत जेथे ऑक्सिजनचे उत्पादन केले जाते; मात्र त्याठिकाणी बॉटलिंग प्लांटची सुविधा नसल्याने त्याची वाहतूक करता येत नाही. त्यामुळे या सहा ठिकाणी जर ५०० बेडची सुविधा असलेले तात्पुरते रुग्णालय निर्मिती करता येणे शक्य आहे, याबाबत निर्णय घेण्यात येत आहेत.

तीन हजार खाटापेण (जेएसडब्ल्यू  ), थळ (आरसीएफ), वर्धा (लॉइड स्टील), औष्णिक विद्युत प्रकल्प असलेले खापरखेडा, पारस, परळी अशा सहा ठिकाणी ऑक्सिजन निर्मिती होत असून, त्याची शुद्धता ९८ टक्के आहे. सहा ठिकाणी प्रत्येकी ५०० खाटांचे रुग्णालय निर्माण करण्याचे नियोजन आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या