शहरं
Join us  
Trending Stories
1
'काळजी करू नका; तुम्हाला जे हवे, तेच होणार', पहलगामबाबत राजनाथ सिंह यांचे सूचक विधान
2
सीमेवर तणाव, त्यात पाकिस्तानच्या या मित्रदेशाने थेट कराचीला पाठवली युद्धनौका, कारण काय?
3
चार पैकी दोन दहशतवादी काश्मिरी, पर्यटकांशी मैत्री केली आणि..., पहलगाम हल्ल्याबाबत सर्वात मोठा गौप्यस्फोट  
4
IPL 2025 : रियान परागचा मोठा पराक्रम; ६ चेंडूवर सलग ६ षटकार मारत सेट केला नवा रेकॉर्ड
5
IND W vs SL W: श्रीलंकेच्या नीलाक्षी दा सिल्वाचं वादळी अर्धशतक; भारताचा तीन विकेट्सने पराभव
6
तेल अवीव विमानतळाजवळ क्षेपणास्त्र हल्ला; दिल्लीहून इस्रायलला जाणारे एअर इंडियाचे विमान वळवले
7
१५ दिवसांपूर्वीच दुकान सुरु केले अन् हल्ल्याच्याच दिवशी गायब झाला; पहलगाममध्ये NIA कडून एकाची चौकशी
8
'आम्हाला मित्रांची गरज आहे, उपदेश देणाऱ्यांची नाही', जयशंकर यांनी युरोपला खडसावले...
9
HSC Result 2025: १२ वीच्या निकालाची प्रतिक्षा संपली; उद्या दुपारी होणार जाहीर, कुठे व कसा पहाल? जाणून घ्या
10
KKR vs RR : मसल पॉवर रसेलनं दाखवली ताकद; फिफ्टीसह मारली गंभीरच्या खास क्बमध्ये एन्ट्री
11
House Arrest Controversy: FIR दाखल केल्यानंतर उल्लू अ‍ॅपकडून माफीनामा, म्हणाले- "आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की..."
12
वरातीहून परतत असलेली कार झाडावर आदळली, हवाई दलाच्या कर्मचाऱ्यासह चार जणांचा मृत्यू, एक जण जखमी
13
IPL 2025: आयपीएलमध्ये सर्वात जलद अर्धशतक ठोकणारे ५ कॅरेबियन खेळाडू, पाहा फोटो
14
सलग १५ तास साधला प्रसारमाध्यमांशी संवाद, पत्रकार परिषदेत या देशाच्या राष्ट्रपतींनी बनवला रेकॉर्ड
15
कल्याणमध्ये ३५ वर्षीय महिलेची इमारतीच्या १७व्या मजल्यावरून उडी; थरारक घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
16
संजय राऊतांनी घेतली भेट; फोटो शेअर करत शरद पवारांनी दिली माहिती, नेमके कारण तरी काय?
17
Ram Naik Resigns: राम नाईक यांचा मत्स्योद्योग विकास धोरण समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा
18
"लोकांनाही तेच हवं असतं, म्हणूनच...", डान्स शोच्या रिएलिटीबाबत गीता माँने स्पष्टच सांगितलं, म्हणाली...
19
भारताचा पाकिस्तानला मोठा धक्का, चिनाब नदीवरील बगलिहार धरणाचे पाणी रोखले
20
'कसौटी जिंदगी की' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार

तुमची लढाई आम्ही लढू

By admin | Updated: May 1, 2015 02:44 IST

शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.

खचू नका : संवाद पदयात्रेतून राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आवाहन गणेश देशमुख - टोंगलाबाद (जि. अमरावती)विदर्भात यापूर्वीही आलोय; पण शेतकऱ्यांची बिकट स्थिती पहिल्यांदाच बघतोय. शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.संवाद पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धामणगाव तालुक्यातील गुंजी, शहापूर, हिरापूर आणि रामगाव या गावांचे राहुल यांनी १२ कि.मी.चे अंतर पायी पार केले. त्यानंतर चांदूर तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या गावांत ते कारने दाखल झाले. राहुल यांच्या या ‘संवाद पदयात्रेला’ रणरणत्या उन्हातही प्रचंड प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्त स्वागत आणि ग्रामस्थांची गर्दी हे चित्र गावागावांत दिसून येत होते. शेतकरी दु:खाच्या गर्तेत लोटला गेला असताना शासन मदतीला येत नसल्याची भावना शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केली. शेतकरी दु:खात असेल त्यावेळी त्याला मदतीचा हात देणे, उभारी देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. तथापि, केंद्र आणि राज्य शासनाने अशा कठीण समयी वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ न करणे आणि पूर्वी मिळणारी बोनसची सुविधा स्थगित करणे या देशभरातील शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख समस्या असल्याचे राहुल म्हणाले. एकूणच हे शासन शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांचे नसून भांडवलदारांचेच असल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अ़ भा़ काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. म्हणून मी आलोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे मदतशेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन कुठल्या क्षमतेत देऊ? असे सांगत सर्वच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता नसली तरी शक्य ती मदत काँग्रेस पक्षातर्फे केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली.विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आज मी किंवा माझा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन तरी कसे देऊ. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व माझा पक्ष करेल.- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस.महापुरुषांना अभिवादनधामणगाव तालुक्याच्या गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला, हिरापूर येथे गजानन महाराजांच्या व बजरंगबलीच्या मंदिरात आणि शहापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांनी अभिवादन केले. शेतकरी संवादहिरापूरच्या बजरंगबली देवस्थानात राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी सतरंजीवर बसून संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतमालाचा भाव, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतीला पाणी आदी मुद्दे जोरकसपणे मांडले. त्यांच्या या मागण्यांकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.