शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

तुमची लढाई आम्ही लढू

By admin | Updated: May 1, 2015 02:44 IST

शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.

खचू नका : संवाद पदयात्रेतून राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आवाहन गणेश देशमुख - टोंगलाबाद (जि. अमरावती)विदर्भात यापूर्वीही आलोय; पण शेतकऱ्यांची बिकट स्थिती पहिल्यांदाच बघतोय. शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.संवाद पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धामणगाव तालुक्यातील गुंजी, शहापूर, हिरापूर आणि रामगाव या गावांचे राहुल यांनी १२ कि.मी.चे अंतर पायी पार केले. त्यानंतर चांदूर तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या गावांत ते कारने दाखल झाले. राहुल यांच्या या ‘संवाद पदयात्रेला’ रणरणत्या उन्हातही प्रचंड प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्त स्वागत आणि ग्रामस्थांची गर्दी हे चित्र गावागावांत दिसून येत होते. शेतकरी दु:खाच्या गर्तेत लोटला गेला असताना शासन मदतीला येत नसल्याची भावना शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केली. शेतकरी दु:खात असेल त्यावेळी त्याला मदतीचा हात देणे, उभारी देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. तथापि, केंद्र आणि राज्य शासनाने अशा कठीण समयी वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ न करणे आणि पूर्वी मिळणारी बोनसची सुविधा स्थगित करणे या देशभरातील शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख समस्या असल्याचे राहुल म्हणाले. एकूणच हे शासन शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांचे नसून भांडवलदारांचेच असल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अ़ भा़ काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. म्हणून मी आलोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे मदतशेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन कुठल्या क्षमतेत देऊ? असे सांगत सर्वच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता नसली तरी शक्य ती मदत काँग्रेस पक्षातर्फे केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली.विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आज मी किंवा माझा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन तरी कसे देऊ. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व माझा पक्ष करेल.- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस.महापुरुषांना अभिवादनधामणगाव तालुक्याच्या गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला, हिरापूर येथे गजानन महाराजांच्या व बजरंगबलीच्या मंदिरात आणि शहापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांनी अभिवादन केले. शेतकरी संवादहिरापूरच्या बजरंगबली देवस्थानात राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी सतरंजीवर बसून संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतमालाचा भाव, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतीला पाणी आदी मुद्दे जोरकसपणे मांडले. त्यांच्या या मागण्यांकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.