शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
कैद्यांना मोकाट सोडणारे ठाणे मुख्यालयातील दोन पोलीस कर्मचारी बडतर्फ, पोलिस आयुक्तांचे आदेश
3
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
4
परमबीर सिंग यांच्यावर खंडणीचा आराेप करणाऱ्या बिल्डरवर फसवणूकीचा गुन्हा; अग्रवाल बंधू अटकेत
5
Video: फटाक्यांच्या आवाजानं बैल उधळला, सगळीकडे गोंधळ; गावकऱ्यांची झाली पळापळ, १ जण जखमी
6
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
7
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
8
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
9
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
10
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
11
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
12
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
13
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
14
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
15
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
16
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
17
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
18
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
19
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
20
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1

तुमची लढाई आम्ही लढू

By admin | Updated: May 1, 2015 02:44 IST

शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.

खचू नका : संवाद पदयात्रेतून राहुल गांधींचे शेतकऱ्यांना आवाहन गणेश देशमुख - टोंगलाबाद (जि. अमरावती)विदर्भात यापूर्वीही आलोय; पण शेतकऱ्यांची बिकट स्थिती पहिल्यांदाच बघतोय. शेतकऱ्यांनो खचू नका, तुमची लढाई आम्ही लढू, असे कळकळीचे आवाहन काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी शेतकऱ्यांना केले.संवाद पदयात्रेच्या निमित्ताने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. धामणगाव तालुक्यातील गुंजी, शहापूर, हिरापूर आणि रामगाव या गावांचे राहुल यांनी १२ कि.मी.चे अंतर पायी पार केले. त्यानंतर चांदूर तालुक्यातील राजना आणि टोंगलाबाद या गावांत ते कारने दाखल झाले. राहुल यांच्या या ‘संवाद पदयात्रेला’ रणरणत्या उन्हातही प्रचंड प्रतिसाद लाभला. उत्स्फूर्त स्वागत आणि ग्रामस्थांची गर्दी हे चित्र गावागावांत दिसून येत होते. शेतकरी दु:खाच्या गर्तेत लोटला गेला असताना शासन मदतीला येत नसल्याची भावना शेतकरी कुटुंबीयांनी व्यक्त केली. शेतकरी दु:खात असेल त्यावेळी त्याला मदतीचा हात देणे, उभारी देणे हे शासनाचे कर्तव्यच ठरते. तथापि, केंद्र आणि राज्य शासनाने अशा कठीण समयी वाऱ्यावर सोडल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे, असे टीकास्त्र राहुल यांनी सोडले. शेतकऱ्यांवर कर्जाचा वाढता डोंगर, शेतमालाच्या किमान आधारभूत किमतीत वाढ न करणे आणि पूर्वी मिळणारी बोनसची सुविधा स्थगित करणे या देशभरातील शेतकऱ्यांच्या तीन प्रमुख समस्या असल्याचे राहुल म्हणाले. एकूणच हे शासन शेतकरी, मजूर आणि गोरगरीबांचे नसून भांडवलदारांचेच असल्याची भावना सामान्यांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले. पत्रकार परिषदेस अ़ भा़ काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण, विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, आमदार माणिकराव ठाकरे आदी उपस्थित होते. म्हणून मी आलोआत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांना काँग्रेसतर्फे मदतशेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन कुठल्या क्षमतेत देऊ? असे सांगत सर्वच पीडित शेतकऱ्यांना मदत करण्याची क्षमता नसली तरी शक्य ती मदत काँग्रेस पक्षातर्फे केली जाईल, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी शेतकऱ्यांना दिली.विद्यमान सरकारने शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. आज मी किंवा माझा पक्ष सत्तेत नाही. त्यामुळे मी तुम्हाला आश्वासन तरी कसे देऊ. पण एक सांगतो, शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे जे करता येईल ते सर्व माझा पक्ष करेल.- राहुल गांधी, उपाध्यक्ष, काँग्रेस.महापुरुषांना अभिवादनधामणगाव तालुक्याच्या गुंजी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुतळ्याला, हिरापूर येथे गजानन महाराजांच्या व बजरंगबलीच्या मंदिरात आणि शहापूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांनी अभिवादन केले. शेतकरी संवादहिरापूरच्या बजरंगबली देवस्थानात राहुल गांधींनी शेतकऱ्यांशी सतरंजीवर बसून संवाद साधला. शेतकऱ्यांनी शेतमालाचा भाव, पीक विम्याची अंमलबजावणी, शेतकऱ्यांना पेन्शन, शेतीला पाणी आदी मुद्दे जोरकसपणे मांडले. त्यांच्या या मागण्यांकडे संवेदनशीलपणे लक्ष देण्याची ग्वाही राहुल गांधी यांनी दिली.