शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

By प्रविण खापरे | Updated: August 14, 2022 21:02 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

नागपूर - भारत हा अहिंसेचा पुजारी आहे, दुर्बलतेचा नाही. भारताच्या मनात अहिंसा आणि हातात शक्ती आहे. अमेरिका, चिन यांसारख्या शक्तीशाली राष्ट्रांना जगावर राज्य करायचे आहे. परंतु, भारताचा तो स्वभावधर्म नाही. साम्राज्यवादी हिंदूस्थान आपल्याला घडवायचा नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

काही इतिहासकार भारताचा इतिहास २४०० वर्षांचा असल्याचे मानतात. वास्तवात भारताचा इतिहास नऊ हजार वर्षांहून जुना आहे. भविष्यात भारताचा खरा इतिहास पाठ्यापुस्तकातही येईल आणि हे परिवर्तन होईस्तोवर प्रतिक्षा न करता प्रत्येक युवकाने भारताला मोठे करण्यासाठीच्या कार्यात आपले योगदान द्यावे. भारत हा ज्ञानसंपन्न असून संपूर्ण विश्वाच्या अस्तित्तवाची एकता मानणारा आहे आणि याच विचारांचा अंगीकार करत प्रत्येक युवकाने आपले कार्य उत्कृष्ट पद्धतीने आणि कुशलनेते करायचे आहे. अखंड भारताचा जप करताना काही लोक घाबरतात आणि कधी होणार, असा सवाल उपस्थित करतात. आपण घाबरणे सोडून देऊ तर भारत अखंड होणारच आहे.

देशाच्या उणिवा दाखविण्यात रस असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या हातात मायक्रोफोन असल्याने त्यांचा आवाज जास्त होतो. परंतु, सकारात्मकता पसरवणारे लोक त्याहून अधिक आहेत. आम्हाला आमच्यातील प्रांत, भाषा, जाती, पंथ, संप्रदाय, धर्म आणि सांस्कृतिक भेदांना विसरून या देशाचा स्वभाव लक्षात घेण्याची गरज आहे. या देशाच्या स्वभावानुसार आम्हाला आमचा स्वभाव बनवावा लागेल. व्यक्ती आणि देशाचा स्वभाव सारखा झाला तरच देशाला आपले लक्ष्य गाठता येईल. देशाच्या सेवेत असलेल्या निस्वार्थी लोकांची ओळख पटवून त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी नकली व्यक्ती आणि संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत यावेळी म्हणाले.

घर आणि कुटुंबानंतर आपल्या समाजासाठी आवर्जुन वेळ काढला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाची लढाई वेगवेगळ्या तऱ्हेची असली तरी ती एका दिशेने हवी. संकट आले की संपूर्ण देश एकजूट होतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण संकट येऊच नये यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत असेही भागवत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndependence Dayस्वातंत्र्य दिन