शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

आपल्याला साम्राज्यवादी हिंदूस्थान घडवायचा नाही! भारताचा खरा इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये येईलच - मोहन भागवत

By प्रविण खापरे | Updated: August 14, 2022 21:02 IST

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

नागपूर - भारत हा अहिंसेचा पुजारी आहे, दुर्बलतेचा नाही. भारताच्या मनात अहिंसा आणि हातात शक्ती आहे. अमेरिका, चिन यांसारख्या शक्तीशाली राष्ट्रांना जगावर राज्य करायचे आहे. परंतु, भारताचा तो स्वभावधर्म नाही. साम्राज्यवादी हिंदूस्थान आपल्याला घडवायचा नाही, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी आज येथे केले.

स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी रेशिमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘उत्तिष्ठ भारत’ अंतर्गत ‘भारत@ २०४७: माय व्हिजन, माय ऍक्शन’ या विषयावर डॉ. मोहन भागवत यांनी युवकांना मार्गदर्शन केले.

काही इतिहासकार भारताचा इतिहास २४०० वर्षांचा असल्याचे मानतात. वास्तवात भारताचा इतिहास नऊ हजार वर्षांहून जुना आहे. भविष्यात भारताचा खरा इतिहास पाठ्यापुस्तकातही येईल आणि हे परिवर्तन होईस्तोवर प्रतिक्षा न करता प्रत्येक युवकाने भारताला मोठे करण्यासाठीच्या कार्यात आपले योगदान द्यावे. भारत हा ज्ञानसंपन्न असून संपूर्ण विश्वाच्या अस्तित्तवाची एकता मानणारा आहे आणि याच विचारांचा अंगीकार करत प्रत्येक युवकाने आपले कार्य उत्कृष्ट पद्धतीने आणि कुशलनेते करायचे आहे. अखंड भारताचा जप करताना काही लोक घाबरतात आणि कधी होणार, असा सवाल उपस्थित करतात. आपण घाबरणे सोडून देऊ तर भारत अखंड होणारच आहे.

देशाच्या उणिवा दाखविण्यात रस असणारे अनेक लोक आहेत. त्यांच्या हातात मायक्रोफोन असल्याने त्यांचा आवाज जास्त होतो. परंतु, सकारात्मकता पसरवणारे लोक त्याहून अधिक आहेत. आम्हाला आमच्यातील प्रांत, भाषा, जाती, पंथ, संप्रदाय, धर्म आणि सांस्कृतिक भेदांना विसरून या देशाचा स्वभाव लक्षात घेण्याची गरज आहे. या देशाच्या स्वभावानुसार आम्हाला आमचा स्वभाव बनवावा लागेल. व्यक्ती आणि देशाचा स्वभाव सारखा झाला तरच देशाला आपले लक्ष्य गाठता येईल. देशाच्या सेवेत असलेल्या निस्वार्थी लोकांची ओळख पटवून त्यांना साथ दिली पाहिजे. त्यासाठी नकली व्यक्ती आणि संघटनांपासून सावध राहण्याची गरज असल्याचे डॉ. भागवत यावेळी म्हणाले.

घर आणि कुटुंबानंतर आपल्या समाजासाठी आवर्जुन वेळ काढला पाहिजे. समाजाच्या उन्नतीसाठी प्रत्येकाची लढाई वेगवेगळ्या तऱ्हेची असली तरी ती एका दिशेने हवी. संकट आले की संपूर्ण देश एकजूट होतो, हे वारंवार सिद्ध झाले आहे. पण संकट येऊच नये यासाठी एकत्रित येऊन प्रयत्न केले पाहिजेत असेही भागवत यावेळी म्हणाले.

टॅग्स :Mohan Bhagwatमोहन भागवतRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघIndependence Dayस्वातंत्र्य दिन