शहरं
Join us  
Trending Stories
1
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
2
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
3
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
4
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
5
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
6
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
7
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
8
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
9
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
10
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
11
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
12
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
13
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
14
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा
15
Phaltan Doctor Death: पंढरपुरातून पळाला, बीडमध्ये गेला अन्...; 48 तासात PSI गोपाळ बदने कुठे कुठे लपला?
16
ऑस्ट्रेलिया दौऱ्यानंतर 'निवृत्ती'? 'सिडनीला शेवटचा निरोप...'! भारतात  परतण्यापूर्वीच रोहित शर्माची भावनिक पोस्ट
17
"सत्तेत आलो तर आम्ही वक्फ कायदा कचऱ्याच्या डब्यात फेकून देऊ..."; तेजस्वी यादव यांचे जाहीर सभेत आश्वासन
18
नशेमुळे झाला कुर्नूल बस अपघात; चूक कुणाची? बाइकस्वारांची की बस ड्रायव्हरची? खुद्द डीआयजींनीच केला खुलासा
19
पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालयात मृतदेहांची अदलाबदल, अंत्यसंस्कारही झाले, चूक कोणाची? समोर आली धक्कादायक माहिती
20
'मला थोडीशी शंका असती तरी कार्यक्रमाला आलो नसतो'; फडणवीसांनी रणजितसिंह निंबाळकरांना जाहीर सभेत स्पष्टच सांगितले

'घरी खायला नाहीये म्हणून आम्ही इथे येत नाही', सुधीर मुनगंटीवार विधानसभेत पुन्हा का भडकले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2025 20:20 IST

Sudhir Mungantiwar: भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा खिंडीत पकडले. आमदारांना बोलण्याची संधी दिली जात नसल्याच्या मुद्द्यावरून मुनगंटीवारांनी सरकारला चिमटे काढले.

Sudhir Mungantiwar: राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असून, या अधिवेशनात भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांचे नाव चांगलेच चर्चेत आहे. वेगवेगळ्या मुद्द्यांवरून मुनगंटीवार आपल्याच सरकारला खडेबोल सुनावताना दिसले. सोमवारीही मुनगंटीवारांनी आमदारांना बोलण्यास संधी दिली जात नसल्याच्या मुद्द्यावरून आक्रमक होत सरकारला चिमटे काढले. 'घरी खायला नाहीये म्हणून इथे येत नाही आम्ही', असे मुनगंटीवार म्हणाले. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

झालं असं विधानसभेतील चर्चांमध्ये महत्त्वाच्या नेत्यांना बोलण्यासाठी जास्त वेळ दिला जातो. त्यामुळे नवीन निवडून आलेल्या किंवा इतर फारशा चर्चेत नसलेल्या आमदारांना विषयांवर बोलण्याची संधी दिली मिळत नाही. हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करत विधानसभा अध्यक्षांचे लक्ष वेधण्यात आले. 

हेही वाचा >>तुम्ही काय हजामती करत होतात का?; जयंत पाटील नागपूर दंगलीवरून गृह विभागावर बरसले

काही आमदार आपले प्रश्न मांडण्यासाठी सकाळपासून रात्री ११ वाजेपर्यंत थांबतात, पण त्यांना संधी दिली जात नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. याच मुद्द्यावरून सुधीर मुनगंटीवार यांनी खडेबोल सुनावले. 

सुधीर मुनगंटीवार विधानसभेत काय बोलले?

विधानसभेत बोलताना मुनगंटीवार तालिका अध्यक्षांना म्हणाले, "अर्धा तास चर्चा जर घ्यायची नसेल, तर स्पष्टपणे सांगा ना. बसवून ठेवल्याने... कारण नसताना कामकाजात तीन-तीन तास बसवून ठेवायचे आणि मग सांगायचं अर्धा तास नाहीये. अर्धा तास चर्चा घेणार आहात की नाही?"

"चर्चा घेणार असाल, तर त्या खुर्चीवरून सत्यमेव जयते. त्या खुर्चीवरून (विधानसभा अध्यक्षांची खुर्ची) पुन्हा असत्य माहिती येऊ नये. मग रात्री एक वाजेपर्यंत बसू. पण, रात्री नऊ वाजता घाई घाईत सांगायचं", असे म्हणत मुनगंटीवारांनी नाराजी व्यक्त केली. 

इथे काय दोन हजार भत्ता घ्यायचा...

उपरोधिक सूरात मुनगंटीवार म्हणाले, "एकतर विधानभवनाचं नाव बदला, तर तेही बदलत नाहीत. आता कायद्यावर तर चर्चाच राहिली नाही. शेवटी आम्ही विषय मांडतो सर्वसामान्य, सार्वजनिक, दीन दुर्बल, शोषित, पीडित, गरीब, शेतकरी, कष्टकरी यांना न्याय देण्यासाठी. इथे काही दोन हजार रुपये भत्ता घ्यायचा... घरी काही खायला नाही म्हणून इथे येत नाही आम्ही. कामकाज होणार असेल, तर ठीक आहे. नाहीतर चालतंय तर चालूद्या गाडी; तिथे काय अडचण आहे", अशा शब्दात सुधीर मुनगंटीवारांनी आपला संताप व्यक्त केला.