शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?, उद्धव ठाकरेंचा भाजपाला टोला

By admin | Updated: February 3, 2017 07:52 IST

सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी पारदर्शकतेच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे.

 ऑनलाइन लोकमत

मुंबई, दि. 3 - मुंबई महापालिकेतील घोटाळ्यांसाठी शिवसेनेला जबाबदार ठरवून प्रचार मोहिमेतून नाकाबंदी करण्याची व्यूहरचना आखणाऱ्या भाजपा नेत्यांना केंद्रातील स्वपक्षीय नेत्यांनी गुरुवारी तोंडघशी पाडले आहे. याचाच दाखल देत आज सामना संपादकीयमधून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासहीत भाजपाचे खासदार किरीट सोमय्यांपर्यंत सर्वांचा चांगलाच समाचार घेतला आहे. 
 
'पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय?', असा उलट प्रश्नच उद्धव यांनी भाजपाला केला आहे.
सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न, असा बाण देखील उद्धव यांनी भाजपावर सोडला आहे.
 
भ्रष्टाचारावर शिवसेनेवर वारंवार हल्लाबोल करणा-या किरीट सोमय्या यांना तर उद्धव यांनी कानपिचक्या दिल्या आहेत. 
'देशातील 21 महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळ्याच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत', अशी सोमय्यांवर करण्यात आली आहे. 
 
दरम्यान, केंद्राने मुंबई मनपाला दिलेल्या पारदर्शी कारभाराच्या प्रशस्तीपत्रामुळे प्रचारात भाजपाचे मोठे अस्त्र ठरणाऱ्या या मुद्द्याची हवाच गेली आहे.
(भाजपा पडली तोंडघशी, मुंबई पालिका सर्वात पारदर्शी)
 
काय आहे नेमके सामना संपादकीयमध्ये
 
कोंबडा आमचा, सूर्यही आमचाच!
भारतीय जनता पक्षाचे काय करावे, असा प्रश्न आता महाराष्ट्रातील जनतेला पडला असेल. खासकरून त्यांच्या त्या पारदर्शकतेच्या मुद्यावरून. पण त्यांच्याच केंद्र सरकारने आता त्यांना पारदर्शक माती खायला लावली आहे. मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक की काय तसा होणार असेल तर आम्ही शिवसेनेशी युती करू अशी नवी पुडी सोडून ही मंडळी ११४ जागांचा ‘मावा’ बाहेर काढून तो चोळत बसली होती. त्यांची हाव ही नक्कीच जास्त जागांची होती आणि पारदर्शकता हा फक्त बनाव होता हे आता त्यांच्याच केंद्र सरकारने उघड केले आहे. केंद्र सरकारने केलेल्या एका सर्वेक्षणात मुंबई महानगरपालिकेचा कारभार हा स्वच्छ, पारदर्शक व उत्तम असल्याचे समोर आले. इतकेच नव्हे तर देशातील २१ महानगरपालिकांत मुंबई महानगरपालिकेने पहिला क्रमांक पटकावून सगळय़ाच बोबड्यांची थोबाडे बंद केली आहेत. पारदर्शकता व जबाबदारीच्या मुद्यांवरही मुंबई पालिका शंभर टक्के पुढेच आहे. केंद्र व राज्य सरकारचे विशेष सहाय्य नसतानाही मुंबई महानगरपालिकेने कारभाराच्या बाबतीत जे स्वच्छ यश प्राप्त केले त्याचे श्रेय मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनाही द्यावे लागेल.
 
नागरी सुविधा, रस्ते, पाणी, आरोग्य, शिक्षण या बाबतीत मुंबई महापालिकेचे काम वाखाणण्यासारखे आहे. राज्य सरकारातील राजकीय माफियागिरीच्या फालतू आरोपांची पर्वा न करता हे काम झाले. मुख्य म्हणजे सगळेच आर्थिक व्यवहार चोख म्हणजे पारदर्शक असल्याने आरोप करणाऱ्या बोबड्या माफियांवर स्वतःचाच अंगठा झिजेपर्यंत चोखत बसण्याची वेळ आली आहे. भारतीय जनता पक्ष सर्वच निर्णय ‘सर्व्हे’ आणि ‘चिंतन’ करून घेत असतो. खरे तर ‘नोटाबंदी’ निर्णयाने जनता बेजार झाल्याचे चित्र असतानाही पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या ‘सर्व्हे’त जनता त्यांच्या बाजूने असल्याचे दाखवले होते. मग मुंबई महानगरपालिकेचा कारभार पारदर्शक असल्याचे प्रशस्तिपत्र केंद्र सरकारनेच दिले आहे. प्रश्न इतकाच आहे की, पारदर्शकतेच्या बाबतीत जे काम मुंबई महानगरपालिकेने केले ते ‘स्वच्छ’ काम आमच्यावर घाणेरडे आरोप करणाऱ्यांच्या ताब्यातील महापालिका करू शकल्या नाहीत. चंदिगढ, दिल्ली, भोपाळ अशा महत्त्वाच्या शहरांतील महानगरपालिका पारदर्शकतेच्या बाबतीत अनागोंदी कारभाराचे शेण खात आहेत व मुंबईच्या तुलनेत त्यांची पारदर्शकता शेवटच्या पायरीवर आहे हे केंद्रीय अहवालातच स्पष्ट झाले आहे. भोपाळचे म्हणाल तर मध्य प्रदेशात भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे व दिल्लीवर तर स्वतः मोदी यांची हुकमत आहे.
 
मग महाराष्ट्रातील भाजप पुढाऱ्यांना अभिप्रेत पारदर्शकता तिथे का नाही? मुंबईचे ठेवा बाजूला, खुद्द मुख्यमंत्री ज्या नागपूरचे नेतृत्व करतात त्या नागपूर महानगरपालिकेचे नामोनिशाणही स्वच्छ व पारदर्शक कारभाराच्या यादीत नसावे यामागची कारणमीमांसा व चिंतन पारदर्शकतेने होणे गरजेचे आहे. स्वतः भ्रष्टाचाराच्या पानपट्टीवर बसून दुसऱ्यांवर पिचकाऱ्या टाकणे सोपे असते, पण जेव्हा पारदर्शक सत्य समोर येते तेव्हा आरोप करणाऱ्यांचीच थोबाडे रंगतात. मुंबई महानगरपालिकेवर वाकडी नजर असणारेच हे असले आरोप करू शकतात. पण कुणी कितीही घाणेरडे आरोप केले तरी मुंबईसह महाराष्ट्राची जनता त्यावर विश्वास ठेवणार नाही व आता तर तुमचेच केंद्र सरकारदेखील घाणेरडे आरोप स्वीकारायला तयार नाही. पारदर्शी कारभाराचा कोंबडा भाजपवाल्यांनी कितीही झाकायचा प्रयत्न केला तरी सूर्य उगवला आहे. कोंबडाही फितूर नाही व सूर्यही झाकोळणार नाही. आम्ही पारदर्शक आहोत, तुम्ही आहात काय? सत्तेच्या जोरावर नागडे नाचणे याला कुणी पारदर्शकता म्हणत असेल तर तो त्यांचा प्रश्न. सत्ता येते तेव्हा पाय जमिनीवर ठेवावे लागतात. काही लोक कायम हवेत तरंगत असतात. हे तरंगणे आता संपेल व गुडघ्यावर रांगणे सुरू होईल. तो दिवस लांब नाही.