शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

डावपेचांवर आव्हाडांनी फेरले पाणी!

By admin | Updated: July 15, 2015 00:29 IST

विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी

मुंबई : विरोधी पक्षाने या आठवड्यात फक्त शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा मुद्दा उचलायचा, असा निर्णय दोघांच्या बैठकीत झाला होता. त्यानुसार अधिवेशनाच्या दोन्ही दिवशी विरोधकांनी कर्जमाफीसाठी सभागृहाचे कामकाज बंद पाडले. मात्र मंगळवारी दुपारी सगळे सदस्य तिसरे सभागृह भरवून लोकमान्य टिळकांच्या पुतळ्याजवळ बसले तेव्हा विधीमंडळाच्या पायऱ्यांवर मात्र आ. जितेंद्र आव्हाड अचानक पिशवीतून सूर्यकांता चिक्कीची पाकिटे घेऊन आले. त्यांच्या चिक्की विकण्याच्या नाट्यामुळे कर्जमाफीचा मुद्दा मागे पडला. त्यातच ही चिक्की खाऊन मेल्याचे नाटक आमदारांनी टिळकांच्या पुतळ्याजवळच केले. त्यावर काहीवेळ दबक्या आवाजात विरोधकांमध्ये चर्चा झाली आणि नंतर टिळकांना साक्षी ठेवून अभिरुप विधानसभा भरवण्याचा निर्णय झाला. त्यात पुन्हा विरोधकांनी कर्जमाफीचा मुद्दा रेटून नेला...उद्धव हमारे साथ है, ये अंदर की बात है..!ये अंदर की बात है... उद्धव हमारे साथ है... अशा घोषणा राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांनी आज देऊन गोंधळ उडवला. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केलेला असताना शिवसेनेचे नेते आणि आमदार या विषयावर गप्प होते.सभागृहाबाहेर आव्हाड यांनी उद्धव हमारे साथ है, म्हणत रान उठवले. तर खडसे यांनी उद्धव हे नेते म्हणून बोलत नाहीत तर पत्रकार म्हणून बोलतात तेव्हा त्यांच्यावर पक्षाचा शिक्का कसा मारायचा असा टोला लगावला. या सगळ्यावर शिवसेनेने मात्र मौनच पाळले.